शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

धरणात केवळ १८ टक्के पाणीसाठा

By admin | Updated: April 22, 2016 01:41 IST

गिरीश महाजन : सिंचन शेतीकडे वळण्याचा सल्ला

नाशिक : भविष्यात पाणीप्रश्न तीव्र होत जाणार असून, मराठवाड्याच्या धरणांमध्ये तर केवळ पावणेतीन टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळेच लातूरसारख्या मोठ्या शहराला रेल्वेने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. राज्यातील सर्व धरणांत मिळून केवळ १८ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.नाशिक येथे आयोजित खरीप हंगाम २०१६-१७च्या आढावा बैठकीत ते बोलत होते. समुद्रातील पाणी पिण्यासाठी गोड करून वापरण्याचा खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचा प्रस्ताव चांगला असला तरी तो खूप खर्चिक आहे. त्याची लगेचच अंमलबजावणी करता येणे तूर्तास अशक्य आहे. त्याऐवजी मुंबईला कोयनेतून थेट पाइपलाइनने पाणीपुरवठा करण्याबाबत सरकारने प्रयत्न सुरू केले असून, तसा प्रस्तावही तयार करण्यात येत आहे. ही योजना अस्तित्वात आल्यास मुंबईचा पाणीप्रश्न निकाली निघून वैतरणा धरणाचे पाणी नाशिकसह मराठवाड्यासाठी उपयोगात येणार आहे. निसर्गचक्र दिवसेंदिवस अवघड होत चालले असून, शेतकऱ्यांनी शाश्वत शेतीकडे वळले पाहिजे. त्यासाठी ठिबक सिंचनचा पर्याय खूपच चांगला आहे. त्यामुळे एकूण वापरातील ७५ टक्के पाण्याची बचत तर होतेच, मात्र उत्पादनही चांगले येते. पीक विम्याचे निकष बदलल्यामुळे आता शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविण्यासाठी उत्साह दाखविला आहे.(प्रतिनिधी)