शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

शहरात केवळ १३ टक्के हरित पट्टे राहणार

By admin | Updated: May 26, 2015 01:51 IST

शहरात केवळ १३ टक्के हरित पट्टे राहणार

नाशिक : गेल्या वेळी वादग्रस्त ठरलेल्या शहर विकास आराखड्यातील काही बदल वगळले, तर सुधारित आराखड्यातही अनेक गंभीर बाबी आढळल्या आहेत. महापालिकेच्या एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत तब्बल ८७ टक्के रहिवासी दाखविण्यात आले असून, त्यामुळे हरित नाशिकची परंपरा असलेल्या शहरात केवळ १३ टक्के हरित पट्टे राहणार आहेत. विशेष म्हणजे अगोदरच्या वादग्रस्त आराखड्यातील आरक्षणे घटवून ती केवळ ४८२ इतकीच ठेवण्यात आल्याचा दावा आराखडा तयार करणाऱ्या पथकाने केला असला, तरी एक हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात लोकसुविधांचे आरक्षण टाकण्यात आले असून, त्याचा विचार केला तर तब्बल साडेसातशे हेक्टर क्षेत्रात आरक्षण राहणार आहे. याशिवाय वेगवेगळ्या मार्गांनी यापेक्षाही अधिक क्षेत्रावर आरक्षण टाकले जाणार असून, त्यामुळे गेल्यावेळे सारखीच परिस्थिती कायम राहणार आहे.शहराचे उपमहापौर गुरुमितसिंग बग्गा आणि विकास आराखड्यासंदर्भातील एक याचिकाकर्ता मोहन रानडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत यासंदर्भात आरोप केला आहे. पालिकेचे क्षेत्रफळच चुकीचे ठरविणे आणि खर्चाचा ताळमेळ नसणे, तसेच आर्थिक आणि पर्यावरण अहवालच विकास आराखड्यात नसल्याने अनेक प्रकरच्या उणिवांवर त्यांनी बोट ठेवले आहे. दोन वर्षांपूर्वी नगररचना विभागाने तयार केलेला शहर विकास आराखडा वादग्रस्त ठरला होता. शासनाने त्यातच सुधारणा करण्यासाठी नगररचना विभागाचे विभागीय सहसंचालक प्रकाश भुक्ते यांची नियुक्ती केली होती. त्यांनी सुधारणा केलेला आराखडा गेल्या शनिवारी (दि.२३) प्रसिद्ध झाला.