शहरं
Join us  
Trending Stories
1
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
4
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
5
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
6
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
7
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
8
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
9
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
10
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
11
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
12
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
13
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
14
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
15
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
16
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
17
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
18
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
19
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

बारा दिवसांत केवळ ११ मिमी पाऊस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:18 IST

हवामान खात्याकडून यंदा सरासरीपेक्षा अधिक शंभर टक्क्यांपर्यंत मान्सून बरसणार असल्याचा पूर्वअंदाज वर्तविला गेला होता. या अंदाजाने बळीराजासह सर्वांच्याच आशा ...

हवामान खात्याकडून यंदा सरासरीपेक्षा अधिक शंभर टक्क्यांपर्यंत मान्सून बरसणार असल्याचा पूर्वअंदाज वर्तविला गेला होता. या अंदाजाने बळीराजासह सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, वेळेवर मान्सूनची ‘एन्ट्री’ होऊनही अद्यापपर्यंत समाधानकारक पाऊस शहरासह जिल्ह्यात होऊ शकलेला नाही. यामुळे शेतकरी वर्गासह सर्वच धास्तावले आहेत. या वर्षी वरुणराजाने कृपादृष्टी न केल्याने कमालीची निराशा झाली आहे. पावसाच्या प्रतीक्षेत प्रत्येक जण आकाशात दाटून येणाऱ्या ढगांकडे डोळे लावून बसला आहे. शहरालगत्या खेड्यांमधील मळे भागात, तसेच तालुकास्तरावरील गावांमध्येही काही शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली आहे. यामुळे त्यांची चिंता अधिकच वाढली आहे.

या हंगामात आतापर्यंत १११.९ मिमी पाउस पडला असून, यामध्ये जूनअखेर शहरात १०१.१ मिमी इतका पाऊस झाल्याची नोंद हवामान केंद्राकडे आहे. जुलैच्या बारा दिवसांमध्ये केवळ ११ मिमी पाऊस झाला. हा आकडा मागील पाच वर्षांमधील जुलै महिन्यातील अत्यंत निराशाजनक पर्जन्यमान राहिले आहे. रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसू ही सर्वच नक्षत्रे कोरडी गेली आहेत.

--इन्फो--

सहा वर्षांचे पर्जन्यमान (मिमीमध्ये)

वर्ष - जून - जुलै

२०१४- २६.२ - ३३१.९

२०१५- १३३.८ - ११६.७

२०१६- १२.४ - ४८१.९

२०१७- २४९.४ - ४८०.३

२०१८- १४६.० - २४४.१

२०१९- १०७.६ - ४९७.०

२०२०- ३६४.० - ८२.९

--इन्फो--

मागील वर्षी जुलैमध्ये ८२ मिमी पाऊस

मागील वर्षी जुलैअखेरपर्यंत ८२ मिमी इतका पाऊस शहरात पडल्याची नोंद हवामान केंद्राकडे आहे. या वर्षी पावसाची स्थिती बघता मागील वर्षाच्या जुलैचा विक्रम तरी मोडीत निघेल का, असा प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे. गेल्या पंधरा वर्षांमध्ये जुलैमध्ये इतके कमी पर्जन्यमान शहरात कधीही नोंदविलेले गेलेले नाही. गेल्या वर्षापासून पावसाचे प्रमाण घसरल्याचे यावरून दिसून येते. पावसाने सलग दुसऱ्या वर्षी हुलकावणी दिली आहे.

---इन्फो---

जिल्ह्यात आतापर्यंत ३०८ मिमी

नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत इगतपुरी, त्र्यंबकेश्वर वगळता, अन्य तालुक्यांमध्ये समाधानकारक पर्जन्यवृष्टी झालेली दिसून येत नाही. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३०८ मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जुलैच्या बारा दिवसांमध्ये १०.६७ मिमी इतका पाऊस जिल्ह्यात पडला. यावरून शहरासह जिल्ह्यातही पावसाने जुलैमध्ये समाधानकारक हजेरी लावली नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.