शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बारा दिवसांत केवळ ११ मिमी पाऊस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:18 IST

हवामान खात्याकडून यंदा सरासरीपेक्षा अधिक शंभर टक्क्यांपर्यंत मान्सून बरसणार असल्याचा पूर्वअंदाज वर्तविला गेला होता. या अंदाजाने बळीराजासह सर्वांच्याच आशा ...

हवामान खात्याकडून यंदा सरासरीपेक्षा अधिक शंभर टक्क्यांपर्यंत मान्सून बरसणार असल्याचा पूर्वअंदाज वर्तविला गेला होता. या अंदाजाने बळीराजासह सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, वेळेवर मान्सूनची ‘एन्ट्री’ होऊनही अद्यापपर्यंत समाधानकारक पाऊस शहरासह जिल्ह्यात होऊ शकलेला नाही. यामुळे शेतकरी वर्गासह सर्वच धास्तावले आहेत. या वर्षी वरुणराजाने कृपादृष्टी न केल्याने कमालीची निराशा झाली आहे. पावसाच्या प्रतीक्षेत प्रत्येक जण आकाशात दाटून येणाऱ्या ढगांकडे डोळे लावून बसला आहे. शहरालगत्या खेड्यांमधील मळे भागात, तसेच तालुकास्तरावरील गावांमध्येही काही शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली आहे. यामुळे त्यांची चिंता अधिकच वाढली आहे.

या हंगामात आतापर्यंत १११.९ मिमी पाउस पडला असून, यामध्ये जूनअखेर शहरात १०१.१ मिमी इतका पाऊस झाल्याची नोंद हवामान केंद्राकडे आहे. जुलैच्या बारा दिवसांमध्ये केवळ ११ मिमी पाऊस झाला. हा आकडा मागील पाच वर्षांमधील जुलै महिन्यातील अत्यंत निराशाजनक पर्जन्यमान राहिले आहे. रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसू ही सर्वच नक्षत्रे कोरडी गेली आहेत.

--इन्फो--

सहा वर्षांचे पर्जन्यमान (मिमीमध्ये)

वर्ष - जून - जुलै

२०१४- २६.२ - ३३१.९

२०१५- १३३.८ - ११६.७

२०१६- १२.४ - ४८१.९

२०१७- २४९.४ - ४८०.३

२०१८- १४६.० - २४४.१

२०१९- १०७.६ - ४९७.०

२०२०- ३६४.० - ८२.९

--इन्फो--

मागील वर्षी जुलैमध्ये ८२ मिमी पाऊस

मागील वर्षी जुलैअखेरपर्यंत ८२ मिमी इतका पाऊस शहरात पडल्याची नोंद हवामान केंद्राकडे आहे. या वर्षी पावसाची स्थिती बघता मागील वर्षाच्या जुलैचा विक्रम तरी मोडीत निघेल का, असा प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे. गेल्या पंधरा वर्षांमध्ये जुलैमध्ये इतके कमी पर्जन्यमान शहरात कधीही नोंदविलेले गेलेले नाही. गेल्या वर्षापासून पावसाचे प्रमाण घसरल्याचे यावरून दिसून येते. पावसाने सलग दुसऱ्या वर्षी हुलकावणी दिली आहे.

---इन्फो---

जिल्ह्यात आतापर्यंत ३०८ मिमी

नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत इगतपुरी, त्र्यंबकेश्वर वगळता, अन्य तालुक्यांमध्ये समाधानकारक पर्जन्यवृष्टी झालेली दिसून येत नाही. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३०८ मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जुलैच्या बारा दिवसांमध्ये १०.६७ मिमी इतका पाऊस जिल्ह्यात पडला. यावरून शहरासह जिल्ह्यातही पावसाने जुलैमध्ये समाधानकारक हजेरी लावली नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.