शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बारा दिवसांत केवळ ११ मिमी पाऊस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:18 IST

हवामान खात्याकडून यंदा सरासरीपेक्षा अधिक शंभर टक्क्यांपर्यंत मान्सून बरसणार असल्याचा पूर्वअंदाज वर्तविला गेला होता. या अंदाजाने बळीराजासह सर्वांच्याच आशा ...

हवामान खात्याकडून यंदा सरासरीपेक्षा अधिक शंभर टक्क्यांपर्यंत मान्सून बरसणार असल्याचा पूर्वअंदाज वर्तविला गेला होता. या अंदाजाने बळीराजासह सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, वेळेवर मान्सूनची ‘एन्ट्री’ होऊनही अद्यापपर्यंत समाधानकारक पाऊस शहरासह जिल्ह्यात होऊ शकलेला नाही. यामुळे शेतकरी वर्गासह सर्वच धास्तावले आहेत. या वर्षी वरुणराजाने कृपादृष्टी न केल्याने कमालीची निराशा झाली आहे. पावसाच्या प्रतीक्षेत प्रत्येक जण आकाशात दाटून येणाऱ्या ढगांकडे डोळे लावून बसला आहे. शहरालगत्या खेड्यांमधील मळे भागात, तसेच तालुकास्तरावरील गावांमध्येही काही शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली आहे. यामुळे त्यांची चिंता अधिकच वाढली आहे.

या हंगामात आतापर्यंत १११.९ मिमी पाउस पडला असून, यामध्ये जूनअखेर शहरात १०१.१ मिमी इतका पाऊस झाल्याची नोंद हवामान केंद्राकडे आहे. जुलैच्या बारा दिवसांमध्ये केवळ ११ मिमी पाऊस झाला. हा आकडा मागील पाच वर्षांमधील जुलै महिन्यातील अत्यंत निराशाजनक पर्जन्यमान राहिले आहे. रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसू ही सर्वच नक्षत्रे कोरडी गेली आहेत.

--इन्फो--

सहा वर्षांचे पर्जन्यमान (मिमीमध्ये)

वर्ष - जून - जुलै

२०१४- २६.२ - ३३१.९

२०१५- १३३.८ - ११६.७

२०१६- १२.४ - ४८१.९

२०१७- २४९.४ - ४८०.३

२०१८- १४६.० - २४४.१

२०१९- १०७.६ - ४९७.०

२०२०- ३६४.० - ८२.९

--इन्फो--

मागील वर्षी जुलैमध्ये ८२ मिमी पाऊस

मागील वर्षी जुलैअखेरपर्यंत ८२ मिमी इतका पाऊस शहरात पडल्याची नोंद हवामान केंद्राकडे आहे. या वर्षी पावसाची स्थिती बघता मागील वर्षाच्या जुलैचा विक्रम तरी मोडीत निघेल का, असा प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे. गेल्या पंधरा वर्षांमध्ये जुलैमध्ये इतके कमी पर्जन्यमान शहरात कधीही नोंदविलेले गेलेले नाही. गेल्या वर्षापासून पावसाचे प्रमाण घसरल्याचे यावरून दिसून येते. पावसाने सलग दुसऱ्या वर्षी हुलकावणी दिली आहे.

---इन्फो---

जिल्ह्यात आतापर्यंत ३०८ मिमी

नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत इगतपुरी, त्र्यंबकेश्वर वगळता, अन्य तालुक्यांमध्ये समाधानकारक पर्जन्यवृष्टी झालेली दिसून येत नाही. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३०८ मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जुलैच्या बारा दिवसांमध्ये १०.६७ मिमी इतका पाऊस जिल्ह्यात पडला. यावरून शहरासह जिल्ह्यातही पावसाने जुलैमध्ये समाधानकारक हजेरी लावली नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.