शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
2
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
3
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
4
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
5
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
6
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
8
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
9
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
10
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
11
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
12
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
13
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
14
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
15
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
16
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
17
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
18
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
19
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
20
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले

बाजारपेठा बंद असल्याने कांदा शेतात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:11 IST

विंचूर : लासलगाव व विंचूर बाजार आवारात मनमाड, चांदवड, येवला येथून कांदा विक्रीसाठी येत असतो. मात्र, बाजारपेठा बंद असल्याने ...

विंचूर : लासलगाव व विंचूर बाजार आवारात मनमाड, चांदवड, येवला येथून कांदा विक्रीसाठी येत असतो. मात्र, बाजारपेठा बंद असल्याने कांदा शेतात पडून आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव बघता शासनाने लॉकडाऊन लावलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा साठविण्यासाठी कांदा चाळ बनविण्यासाठी लागणारी सामग्री मिळत नसल्याने कांदा कडक उन्हात पडून आहे. त्यातच बाजार समित्याही बंद असल्याने तसेच कांदा साठवणुकीची पंचाईत झाल्याने बरेच कांदा उत्पादक अडचणीत सापडले आहेत.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच विंचूर उपबाजार आवारावर कोविडच्या पार्श्वभूमीवर लिलाव बंद ठेवण्यात आले आहेत. बहुतांश शेतकऱ्यांकडे रांगडा व लाल कांदा अद्याप शिल्लक आहे. रांगडा व लाल कांदा जास्त दिवस चांगल्या अवस्थेत टिकू शकत नसल्याने शेतकरी तो तत्काळ बाजारात आणत असतो. मात्र, बाजार समितीतील व्यवहार बंद असल्याने उन्हाळ कांद्यासह इतर शेतमाल विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध नाही. मागील महिन्यात मार्चअखेरीचे कारण पुढे करून जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्या आठ ते दहा दिवस बंद ठेवल्या. त्यामुळे हजारो क्विंटल कांदा विनाकारण पडून राहिला. त्याचा परिणाम लिलाव सुरळीत झाल्यावर आवक वाढली व कांद्याचे दर घसरले. परिणामी त्याचे नुकसान शेतकरी वर्गाला भोगावे लागले. कांदा नाशवंत आहे. अगोदरच बाजार समित्या बंद राहिल्याने मोठे नुकसान झाले आहे.

--------------------------

करपामुळे उत्पादनात घट

एकीकडे अवकाळी पाऊस व त्यामुळे कांद्यावर आलेल्या करपा रोगामुळे उत्पादनात मोठी घट निर्माण झाली. त्यामुळे कांदा उत्पादक हैराण झाले आहेत. बाजार समित्यांमधील शेतमाल खरेदी-विक्रीचे सौदे बंद राहिल्याने शेतमालाच्या प्रतीवर परिणाम होऊन शेतमालाचे दरही कमी होतात. बंदचा कालावधी संपल्यानंतर, बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतमाल एकदम विक्रीस येतो आणि आवक वाढल्यामुळे पुन्हा या शेतमालाचे दर पडतात. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांचेच नुकसान होत असते. त्यामुळे कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना करून बाजार समितीमध्ये लिलाव प्रक्रिया पूर्ववत सुरू करण्याची मागणी होत आहे.

----------------------

सरकारने हमीभावाने कांदा खरेदी करावा किंवा कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना करून बाजार समित्यांमधील लिलाव पूर्ववत सुरू करावा. नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांच्या हक्कासाठी सर्व शेतकरी संघटनांनी एकत्र येणे गरजेचे आहे.

- कुबेर जाधव, राज्य संपर्क प्रमुख, कांदा उत्पादक संघटना. (२८ कुबेर जाधव)

-----------------

पणन मंडळाच्या आदेशानुसार तीन दिवसांच्यावर समिती बंद ठेवता येत नाही. असे असताना लिलाव बंद करून कांदा उत्पादकांवर अन्यायच केला जात आहे.

- कृष्णा जाधव, उपजिल्हाध्यक्ष, प्रहार शेतकरी संघटना. (२८ कृष्णा जाधव)

--------------

शेतात पोळ करून कांदा साठवताना शेतकरी सोमनाथ घायाळ. (२८ विंचूर)