शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बाजारपेठा बंद असल्याने कांदा शेतात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:11 IST

विंचूर : लासलगाव व विंचूर बाजार आवारात मनमाड, चांदवड, येवला येथून कांदा विक्रीसाठी येत असतो. मात्र, बाजारपेठा बंद असल्याने ...

विंचूर : लासलगाव व विंचूर बाजार आवारात मनमाड, चांदवड, येवला येथून कांदा विक्रीसाठी येत असतो. मात्र, बाजारपेठा बंद असल्याने कांदा शेतात पडून आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव बघता शासनाने लॉकडाऊन लावलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा साठविण्यासाठी कांदा चाळ बनविण्यासाठी लागणारी सामग्री मिळत नसल्याने कांदा कडक उन्हात पडून आहे. त्यातच बाजार समित्याही बंद असल्याने तसेच कांदा साठवणुकीची पंचाईत झाल्याने बरेच कांदा उत्पादक अडचणीत सापडले आहेत.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच विंचूर उपबाजार आवारावर कोविडच्या पार्श्वभूमीवर लिलाव बंद ठेवण्यात आले आहेत. बहुतांश शेतकऱ्यांकडे रांगडा व लाल कांदा अद्याप शिल्लक आहे. रांगडा व लाल कांदा जास्त दिवस चांगल्या अवस्थेत टिकू शकत नसल्याने शेतकरी तो तत्काळ बाजारात आणत असतो. मात्र, बाजार समितीतील व्यवहार बंद असल्याने उन्हाळ कांद्यासह इतर शेतमाल विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध नाही. मागील महिन्यात मार्चअखेरीचे कारण पुढे करून जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्या आठ ते दहा दिवस बंद ठेवल्या. त्यामुळे हजारो क्विंटल कांदा विनाकारण पडून राहिला. त्याचा परिणाम लिलाव सुरळीत झाल्यावर आवक वाढली व कांद्याचे दर घसरले. परिणामी त्याचे नुकसान शेतकरी वर्गाला भोगावे लागले. कांदा नाशवंत आहे. अगोदरच बाजार समित्या बंद राहिल्याने मोठे नुकसान झाले आहे.

--------------------------

करपामुळे उत्पादनात घट

एकीकडे अवकाळी पाऊस व त्यामुळे कांद्यावर आलेल्या करपा रोगामुळे उत्पादनात मोठी घट निर्माण झाली. त्यामुळे कांदा उत्पादक हैराण झाले आहेत. बाजार समित्यांमधील शेतमाल खरेदी-विक्रीचे सौदे बंद राहिल्याने शेतमालाच्या प्रतीवर परिणाम होऊन शेतमालाचे दरही कमी होतात. बंदचा कालावधी संपल्यानंतर, बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतमाल एकदम विक्रीस येतो आणि आवक वाढल्यामुळे पुन्हा या शेतमालाचे दर पडतात. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांचेच नुकसान होत असते. त्यामुळे कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना करून बाजार समितीमध्ये लिलाव प्रक्रिया पूर्ववत सुरू करण्याची मागणी होत आहे.

----------------------

सरकारने हमीभावाने कांदा खरेदी करावा किंवा कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना करून बाजार समित्यांमधील लिलाव पूर्ववत सुरू करावा. नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांच्या हक्कासाठी सर्व शेतकरी संघटनांनी एकत्र येणे गरजेचे आहे.

- कुबेर जाधव, राज्य संपर्क प्रमुख, कांदा उत्पादक संघटना. (२८ कुबेर जाधव)

-----------------

पणन मंडळाच्या आदेशानुसार तीन दिवसांच्यावर समिती बंद ठेवता येत नाही. असे असताना लिलाव बंद करून कांदा उत्पादकांवर अन्यायच केला जात आहे.

- कृष्णा जाधव, उपजिल्हाध्यक्ष, प्रहार शेतकरी संघटना. (२८ कृष्णा जाधव)

--------------

शेतात पोळ करून कांदा साठवताना शेतकरी सोमनाथ घायाळ. (२८ विंचूर)