शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
3
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
4
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
5
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
6
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
7
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
8
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
9
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
10
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
12
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
13
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
14
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
15
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
16
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
17
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
18
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
19
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
20
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय

कांदा गडगडला; शेतकºयांमध्ये नैराश्य आवक वाढली : तेराशेपर्यंत भाव खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 01:11 IST

महिनाभरापूर्वी ‘भाव’ खाऊन असलेला कांदा वाढलेल्या आवकेमुळे गडगडण्यास सुरुवात झाली असून, नवीन कांदा बाजारात येईपर्यंत तेजीच्या अपेक्षेवर असलेले शेतकरी पुन्हा एकदा नैराश्याच्या गर्तेत अडकले आहेत.

नाशिक : महिनाभरापूर्वी ‘भाव’ खाऊन असलेला कांदा वाढलेल्या आवकेमुळे गडगडण्यास सुरुवात झाली असून, नवीन कांदा बाजारात येईपर्यंत तेजीच्या अपेक्षेवर असलेले शेतकरी पुन्हा एकदा नैराश्याच्या गर्तेत अडकले आहेत. जिल्ह्याच्या बाजार समित्यांमध्ये गेल्या आठ दिवसांपासून वाढलेली आवक हेच कारण भाव गडगडण्यामागे असले तरी, पाच महिन्यांपासून साठवून ठेवलेल्या कांद्याच्या ढासळत चाललेल्या गुणवत्तेचाही त्यावर परिणाम झाला आहे.सध्या प्रतिक्विंटल रुपये १२०० ते १५०० इतक्या खालपर्यंत कांद्याचे भाव आले आहेत. त्यामुळे शेतकºयांकडून कमी भावाने खरेदी करून त्याची साठवणूक व्यापाºयांकडून करून ठेवण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने परिस्थितीवर शासकीय यंत्रणा लक्ष ठेवून आहे. कांदा पिकविणाºया राज्यांमध्ये यंदा अतिवृष्टीने थैमान घातल्याने मोठ्या प्रमाणावर कांद्याचे नुकसान झाले, परिणामी देशांतर्गत कांद्याची मागणी वाढली. त्यामुळे एप्रिल-मे महिन्यात दोनशे ते पाचशे रुपयांपर्यंत भाव गडगडल्यामुळे शेतकºयांनी कांदा चाळीतच साठवून ठेवला. शेतकºयांनी त्यावेळी घेतलेला व्यवहारी निर्णय मात्र त्यांचा फायदा करून गेला. जुलै महिन्यात कांद्याची चणचण भासू लागल्यानंतर शेतकºयांनी साठवलेला कांदा बाहेर काढला परिणामी त्याला चांगला भाव मिळाला. कांद्याची प्रमाणात आवक झाल्यामुळे व्यापाºयांनीही त्याला भाव दिला. तथापि, कांद्याचा बाजार तेजीत आला म्हटल्यावर शेतकºयांनी बाजारात धाव घेतली व नेमक्या बाजारातील सूत्र बिघडल्याने कांदा गेल्या आठवड्यापासून जितक्या झपाट्याने वर गेला तितकाच खाली कोसळण्यास सुरुवात झाली. कांद्याच्या तेजीवर सणासुदीचा आनंद द्विगुणीत करण्याच्या तयारीत असलेले शेतकरी नैराश्येत सापडले.ग्राहकांना फायदा नाहीचबाजार समितीत कांदा गडगडून निम्म्यावर आला असला तरी, त्याचा थेट फायदा ग्राहकांना होत नाही. आजही कांदा बाजारात ३० ते ३५ रुपये इतका भाव असून, दुसरीकडे कांदा पिकविणाºया शेतकºयाला मात्र या बाजारातील भाववाढीचा काहीच लाभ होत नाही.गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव वाढल्याच्या वृत्तामुळे केंद्र सरकारने देशांतर्गत बाजारभाव कमी करण्यासाठी परदेशातून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला व इजिप्तहून काही प्रमाणात कांद्याची आयातही झाली. त्यामुळे भविष्यात कांद्याला भाव मिळणार नाही अशा अनामिक भीतीपोटी जिल्ह्यातील शेतकºयांनी साठवलेला कांदा बाहेर काढला. प्रचंड आवक झाल्यामुळे कांद्याला १२०० ते १७०० इतकाच भाव मिळाला, त्यातही कांद्याचा दर्जा पाहून व्यापाºयांनी भाव ठरविण्यास सुरुवात केली आहे.