शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

कांदा गडगडला; शेतकºयांमध्ये नैराश्य आवक वाढली : तेराशेपर्यंत भाव खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 01:11 IST

महिनाभरापूर्वी ‘भाव’ खाऊन असलेला कांदा वाढलेल्या आवकेमुळे गडगडण्यास सुरुवात झाली असून, नवीन कांदा बाजारात येईपर्यंत तेजीच्या अपेक्षेवर असलेले शेतकरी पुन्हा एकदा नैराश्याच्या गर्तेत अडकले आहेत.

नाशिक : महिनाभरापूर्वी ‘भाव’ खाऊन असलेला कांदा वाढलेल्या आवकेमुळे गडगडण्यास सुरुवात झाली असून, नवीन कांदा बाजारात येईपर्यंत तेजीच्या अपेक्षेवर असलेले शेतकरी पुन्हा एकदा नैराश्याच्या गर्तेत अडकले आहेत. जिल्ह्याच्या बाजार समित्यांमध्ये गेल्या आठ दिवसांपासून वाढलेली आवक हेच कारण भाव गडगडण्यामागे असले तरी, पाच महिन्यांपासून साठवून ठेवलेल्या कांद्याच्या ढासळत चाललेल्या गुणवत्तेचाही त्यावर परिणाम झाला आहे.सध्या प्रतिक्विंटल रुपये १२०० ते १५०० इतक्या खालपर्यंत कांद्याचे भाव आले आहेत. त्यामुळे शेतकºयांकडून कमी भावाने खरेदी करून त्याची साठवणूक व्यापाºयांकडून करून ठेवण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने परिस्थितीवर शासकीय यंत्रणा लक्ष ठेवून आहे. कांदा पिकविणाºया राज्यांमध्ये यंदा अतिवृष्टीने थैमान घातल्याने मोठ्या प्रमाणावर कांद्याचे नुकसान झाले, परिणामी देशांतर्गत कांद्याची मागणी वाढली. त्यामुळे एप्रिल-मे महिन्यात दोनशे ते पाचशे रुपयांपर्यंत भाव गडगडल्यामुळे शेतकºयांनी कांदा चाळीतच साठवून ठेवला. शेतकºयांनी त्यावेळी घेतलेला व्यवहारी निर्णय मात्र त्यांचा फायदा करून गेला. जुलै महिन्यात कांद्याची चणचण भासू लागल्यानंतर शेतकºयांनी साठवलेला कांदा बाहेर काढला परिणामी त्याला चांगला भाव मिळाला. कांद्याची प्रमाणात आवक झाल्यामुळे व्यापाºयांनीही त्याला भाव दिला. तथापि, कांद्याचा बाजार तेजीत आला म्हटल्यावर शेतकºयांनी बाजारात धाव घेतली व नेमक्या बाजारातील सूत्र बिघडल्याने कांदा गेल्या आठवड्यापासून जितक्या झपाट्याने वर गेला तितकाच खाली कोसळण्यास सुरुवात झाली. कांद्याच्या तेजीवर सणासुदीचा आनंद द्विगुणीत करण्याच्या तयारीत असलेले शेतकरी नैराश्येत सापडले.ग्राहकांना फायदा नाहीचबाजार समितीत कांदा गडगडून निम्म्यावर आला असला तरी, त्याचा थेट फायदा ग्राहकांना होत नाही. आजही कांदा बाजारात ३० ते ३५ रुपये इतका भाव असून, दुसरीकडे कांदा पिकविणाºया शेतकºयाला मात्र या बाजारातील भाववाढीचा काहीच लाभ होत नाही.गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव वाढल्याच्या वृत्तामुळे केंद्र सरकारने देशांतर्गत बाजारभाव कमी करण्यासाठी परदेशातून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला व इजिप्तहून काही प्रमाणात कांद्याची आयातही झाली. त्यामुळे भविष्यात कांद्याला भाव मिळणार नाही अशा अनामिक भीतीपोटी जिल्ह्यातील शेतकºयांनी साठवलेला कांदा बाहेर काढला. प्रचंड आवक झाल्यामुळे कांद्याला १२०० ते १७०० इतकाच भाव मिळाला, त्यातही कांद्याचा दर्जा पाहून व्यापाºयांनी भाव ठरविण्यास सुरुवात केली आहे.