शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

पाटणे परिसरात कांदा उत्पादन घटण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:13 IST

सततच्या बदलत्या रोगट वातावरणाचा फटका त्यातच मध्यंतरी अवकाळी पाऊस झाला. त्यानंतर दोन दिवस मोठ्या प्रमाणात धुके पडल्याने कांदा ...

सततच्या बदलत्या रोगट वातावरणाचा फटका त्यातच मध्यंतरी अवकाळी पाऊस झाला. त्यानंतर दोन दिवस मोठ्या प्रमाणात धुके पडल्याने कांदा पिकावर करपा रोग मोठ्या प्रमाणात वाढीस लागला. त्यामुळे यावर्षी कांद्याचे अपेक्षित उत्पादन मिळेल की नाही या चिंतेने बळीराजा धास्तावला आहे.

यावर्षी सुरुवातीला अतिवृष्टीमुळे कांद्याची रोपे खराब झाली. दुबार बियाणे टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. दोन ते तीन हजार रुपये दराने बियाणे खरेदी करून रोपे तयार करण्यात आली. कांदा लागवडीसाठी ८ ते १० हजार रुपये एकरी मजुरी, त्यातच मजुरांची टंचाई, रासायनिक खतांचे वाढलेले दर अशा एक ना अनेक समस्यांना तोंड देत बळीराजाने कांदा लागवड केली. मात्र एक महिन्यापूर्वी अवकाळी पाऊस झाल्यानंतर थंडी नाहीशी झाली. निसर्गाचा लहरीपणाचा फटका बसून करपा रोगाने मोठ्या प्रमाणात कांद्याच्या पिकावर हल्ला केला आहे. महागडी औषधे फवारणी करूनही रोगाचा प्रादुर्भाव आटोक्यात येताना दिसत नाही.

इन्फो

शेतकरी हतबल

उन्हाचा प्रकोप, विजेचा लपंडाव, भारनियमन अशा सर्व समस्यांमुळे उन्हाळ कांद्याचे अपेक्षित उत्पादन हाती लागणार नसल्याकारणाने शेतकरी हतबल झाला आहे. हजारो रुपये खर्च करूनही उत्पादन मिळेल याची शाश्वती नाही. त्यातच दिवसेंदिवस कोसळणाऱ्या कांद्याचे दराने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.