शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

पाटणे परिसरात कांदा उत्पादन घटण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:13 IST

सततच्या बदलत्या रोगट वातावरणाचा फटका त्यातच मध्यंतरी अवकाळी पाऊस झाला. त्यानंतर दोन दिवस मोठ्या प्रमाणात धुके पडल्याने कांदा ...

सततच्या बदलत्या रोगट वातावरणाचा फटका त्यातच मध्यंतरी अवकाळी पाऊस झाला. त्यानंतर दोन दिवस मोठ्या प्रमाणात धुके पडल्याने कांदा पिकावर करपा रोग मोठ्या प्रमाणात वाढीस लागला. त्यामुळे यावर्षी कांद्याचे अपेक्षित उत्पादन मिळेल की नाही या चिंतेने बळीराजा धास्तावला आहे.

यावर्षी सुरुवातीला अतिवृष्टीमुळे कांद्याची रोपे खराब झाली. दुबार बियाणे टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. दोन ते तीन हजार रुपये दराने बियाणे खरेदी करून रोपे तयार करण्यात आली. कांदा लागवडीसाठी ८ ते १० हजार रुपये एकरी मजुरी, त्यातच मजुरांची टंचाई, रासायनिक खतांचे वाढलेले दर अशा एक ना अनेक समस्यांना तोंड देत बळीराजाने कांदा लागवड केली. मात्र एक महिन्यापूर्वी अवकाळी पाऊस झाल्यानंतर थंडी नाहीशी झाली. निसर्गाचा लहरीपणाचा फटका बसून करपा रोगाने मोठ्या प्रमाणात कांद्याच्या पिकावर हल्ला केला आहे. महागडी औषधे फवारणी करूनही रोगाचा प्रादुर्भाव आटोक्यात येताना दिसत नाही.

इन्फो

शेतकरी हतबल

उन्हाचा प्रकोप, विजेचा लपंडाव, भारनियमन अशा सर्व समस्यांमुळे उन्हाळ कांद्याचे अपेक्षित उत्पादन हाती लागणार नसल्याकारणाने शेतकरी हतबल झाला आहे. हजारो रुपये खर्च करूनही उत्पादन मिळेल याची शाश्वती नाही. त्यातच दिवसेंदिवस कोसळणाऱ्या कांद्याचे दराने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.