शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
6
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
7
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
8
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
9
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
10
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
11
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
12
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
13
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
14
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
15
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
16
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
17
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
18
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
19
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
20
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला

किरकोळ बाजारात कांद्याचे भाव जास्तच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 00:04 IST

नाशिक : जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांदा व्यापाºयांनी लिलाव बंद पाडल्यानंतर लिलाव पुन्हा सुरू झाले असले तरी कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. परंतु, कांद्याच्या कमी झालेल्या भावाचा फायदा ग्राहकांना मात्र होताना दिसत नाही. किरकोळ बाजारात अजूनही कांदा १८ ते २० रुपये प्रतिकिलोने विकला जात असून, मध्यस्थांच्या नफेखोरीमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळत नसल्याचा आरोप ग्राहकांकडून होत आहे.

नाशिक : जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांदा व्यापाºयांनी लिलाव बंद पाडल्यानंतर लिलाव पुन्हा सुरू झाले असले तरी कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. परंतु, कांद्याच्या कमी झालेल्या भावाचा फायदा ग्राहकांना मात्र होताना दिसत नाही. किरकोळ बाजारात अजूनही कांदा १८ ते २० रुपये प्रतिकिलोने विकला जात असून, मध्यस्थांच्या नफेखोरीमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळत नसल्याचा आरोप ग्राहकांकडून होत आहे.जिल्ह्यातील कांदा व्यापाºयांवर आयकर विभागाचे छापे पडल्यानंतर गेल्या आठवड्यात तीन दिवस कांदा लिलाव बंद राहिल्याने कांदा उत्पादकांसमोर साठवणुकीचा माल विक्रीची समस्या निर्माण झाली होती. परंतु, जिल्हाधिकाºयांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर सोमवारपासून बहुतांश बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव पूर्ववत सुरू झाले. मात्र, काही बाजारांमध्ये व्यापाºयांनी लिलावांमध्ये अल्प प्रमाणात सहभाग घेतल्याने कांद्याचे दर घसरले असून, सरासरी अकराशे ते चौदाशे रुपये प्रतिक्विंटल दराने कांद्याचे लिलाव झाले. बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात एवढ्या मोठ्या प्रमाणात घसरण होऊनही किरकोळ बाजारात कांदा १८ ते २० रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. कांद्याच्या भावामध्ये एवढी वाढ केवळ मध्यस्थांच्या नफेखोरीमुळे होत असल्याचा आरोप किरकोळ विक्रेते व ग्राहकांनी केला आहे. सध्या लिलावात चौदाशे रुपये प्रतिक्विंटलपर्यंत कांदा विकला जात असला तरी मध्यस्थांकडून कांदा किरकोळ व्यापाºयांपर्यंत येईपर्यंत १७ ते १९ रुपयांपर्यंत पडतो. त्यामुळे ग्राहकांना १८ ते २० रुपयांपर्यंत कांद्याची विक्री करावी लागते.-अनूप जैन,किरकोळ भाजीविक्रेता कांद्याचे भाव अधिक होते तेव्हा कांदा घेताना विचार करावा लागत होता. परंतु आता कांद्याचे भाव घसरले असले तरी किरकोळ खरेदी करताना किलोमागे २० ते २२ रुपये मोजावे लागतात. त्यामुळे कांद्याचे भाव कमी होऊनही ग्राहकांना दिलासा मिळत नसेल तर सरकारने मध्यस्थांवर योग्य कारवाई करून यंत्रणेत सुधारणा घडवून आणण्याची गरज आहे.-साधना जोशी, गृहिणी, नाशिक