शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कांद्याला फुटले कोंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 00:18 IST

लोहोणेर : आज ना उद्या भाव वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी चाळीत सांभाळून ठेवलेल्या उन्हाळी कांद्याची आयुष्य मर्यादा संपत आल्याने ...

ठळक मुद्देसदर कांदे आता बाहेर फेकण्याची वेळ

लोहोणेर : आज ना उद्या भाव वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी चाळीत सांभाळून ठेवलेल्या उन्हाळी कांद्याची आयुष्य मर्यादा संपत आल्याने या कांद्याला कोंब फुटले आहेत. तर काही ठिकाणी या कांद्यानी पाणी सोडण्यास सुरुवात केली असून, यामुळे चाळीतील कांदा आता शेतकरीवर्गाने बाहेर फेकण्यास सुरुवात केली आहे. कसमादे पट्ट्यातील कळवण, देवळा या तालुक्यात हे चित्र सर्वत्र दिसत आहे.उन्हाळी कांद्याची सर्वसाधारण पणे नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात लागण केली जाते. सदर कांदा हा साधारण चार महिन्यांनंतर काढला जातो. उन्हाळ कांदा हा नगदी पीक म्हणून ओळखले जाते. या पिकावरच शेतकºयांचे आर्थिक गणित अवलंबून असते. दीपावलीच्या आधी शेतकरी हा कांदा विक्रीसाठी चाळणीतून बाहेर काढीत असतो; मात्र यावर्षी योग्य भाव न मिळाल्याने यावेळी शेतकºयांनी उशिरा कांदा विक्रीसाठी बाहेर काढण्याचा निर्णय घेतला; मात्र यावर्षी कांद्याला योग्य भाव न मिळाल्याने वर्षाचा कालावधी उलटत आला तरी भाव मिळत नसल्याने कांदा चाळीत सडत पडला आहे. या कांद्याची आयुष्य मर्यादा संपत आली त्यामुळे या कांद्याला आता चाळीतच कोंब फुटले असून काही ठिकाणी तर कांदा खराब झाल्यामुळे कांद्याच्या चाळीतून पाणी बाहेर पडत आहे. यामुळे हा खराब कांदा बाहेर फेकण्याची वेळ आता या शेतकºयांवर आली आहे.

आज ना उद्या कांद्याला भाव मिळेल या आशेने चाळीत कांदा सांभाळून ठेवला; मात्र या कांद्याला आता कोंब फुटले असून, सदर कांदे आता बाहेर फेकण्याची वेळ आली आहे.- सुनील देवरे,कांदा उत्पादक शेतकरी.