शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

कांदा उत्पादक चिंतित

By admin | Updated: May 20, 2016 00:25 IST

भावात घसरण : उत्पादन खर्चही निघत नसल्याने हवालदिल

येवला : राज्यात कांद्याचे भाव पुन्हा एकदा गडगडले असून, कांदा भावात झालेल्या घसरणीमुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने जिल्ह्यातील कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत. शासनाने तत्काळ उपाययोजना केली नाही तर कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहाणार नाही. येवला बाजार समितीत कांद्याची आवक चार हजार क्विंटल झाली. आवक स्थिर असून, बुधवारी कांद्याचे बाजारभाव ३०० ते ८०० रु पये प्रतिक्विंटल होते. सरासरी ६०० रुपये क्विंटल भाव मिळाला. गेल्या दीड महिन्यापासून घसरलेला भाव कांद्याचे उत्पादन अधिक वाढल्याने बुधवारी आणखी १०० रु पयांनी घसरले. गुरुवारी येवला कांदा बाजार आवारात २०० ते ८०० प्रतिक्विंटल भाव होते. प्रतिक्विंटल सरासरी ५५० रुपये क्विंटल भाव मिळाला. त्यामुळे उत्पादकांत मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होत आहे. कमालीच्या घसरलेल्या कांदा भावाने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. कांद्यासह आम्हालाही बुरे दिन आल्याची प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत.कृषी मूल्य आयोगाची भाव ठरवण्याची पद्धती कांद्याच्या बाबत का मूग गिळून बसली आहे. कांदा उत्पादन खर्च फिटत नसताना शेतकऱ्यांना विकावा लागतो. याबाबत मात्र केंद्र शासन काहीच बोलत नाही. (वार्ताहर)