शहरं
Join us  
Trending Stories
1
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
2
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
3
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
4
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
5
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
6
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
7
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
8
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
9
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
10
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
12
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
13
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
14
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
15
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
16
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
17
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
18
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
19
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
20
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं

कांदा उत्पादकांची पुरती वाट लावली

By admin | Updated: October 10, 2014 23:26 IST

कांदा उत्पादकांची पुरती वाट लावली

दिंडोरी : केंद्र शासनाची धोरणे शेतकरी विरोधी असल्याचे सांगून मोदी सरकारने कांदा उत्पादकांची पुरती वाट लावली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी केली.दिंडोरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. पाकिस्तान सीमेवर गोळीबार होत असून, सीमेवरील नागरिकांना निर्वासित व्हावे लागत आहे, मात्र पंतप्रधान ठोस निर्णय घेण्याऐवजी सभा घेत आहेत. हेच का ते अच्छे दिन? असा सवाल पवार यांनी केला. आपण सीमेवर कधी गेलो होते का? या पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना पवार यांनी आपण रक्षामंत्री असताना जवानांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी सियाचीनसह सर्व सीमेवर गेलो होतो, असेही सांगितले. कांदा जीवनावश्यक यादीत टाकल्यामुळे चांगला भाव मिळत नाही. टमाट्यालाही काही देशांच्या सीमाबंद केल्याने यंदा टमाट्याचे उत्पादन कमी होऊनही भाव कोसळले आहे. कापूसही आयात केल्याने कापसाचे भावही कोसळले. साखरेचे अनुदान कमी केल्याने उसाचे भावही कमी होणार आहे. यास केंद्राचे धोरण जबाबदार आहे. आता द्राक्ष निर्यातीबाबतही असेच धोरण राहणार असल्याची भीती पवार यांनी व्यक्त केली. यावेळी नरहरी झिरवाळ, कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे, डॉ. योगेश गोसावी आदि उपस्थित होते.