शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

कांदा उत्पादक शेतकरी झाला उध्वस्त....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 17:17 IST

येवला : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा भावाने निचांक गाठला असून १०० ते ४०० रुपये व सरासरी २५० रु पये प्रतीक्विंटल भाव कांद्याला मिळाला. कांदा दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा चिंतेत सापडला आहे.

ठळक मुद्देशेतकरी संघटना : शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासनाने लक्ष घालावे

येवला : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा भावाने निचांक गाठला असून १०० ते ४०० रुपये व सरासरी २५० रु पये प्रतीक्विंटल भाव कांद्याला मिळाला. कांदा दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा चिंतेत सापडला आहे.केंद्र आणि राज्य सरकार पाच राज्यातील निवडणूक प्रचारात व्यस्त असून राम मंदिर, आरक्षण विषयात ईतर पक्ष संघटना सहभागी असल्याने शेतीमाल भावाचा प्रश्न बाजूला पडला असून शेतकर्?यांच्या जीवनामरणाचा प्रश्न सरकारने त्वरित हाती घ्यावा आणि शेतकºयांनी विकलेल्या मालावर त्वरित अनुदान जाहिर करावे व फरकाची रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा करावी अशी मागणी शेतकरी संघटनेने एका निवेदनाद्वारे तहसीलदार रोहिदास वारूळे यांच्याकडे केली आहे.मागील वर्षी कांद्याला चांगला भाव मिळाला होता. आलेला पैसा चाळ बांधण्यात खर्च केला. कांदा साठवणूक केली मात्र आठ महिने कांदा साठवून आज मातीमोल भावाने कांदा विकण्याची वेळ शासनाच्या धोरणामुळे आली असल्याची चर्चा शेतकरी करत आहेत. केंद्र आणि राज्य शासनाने आयात-निर्यात धोरणात सुधारणा करून शेतकºयांना योग्य भाव मिळवून द्यावा आणि बाजारात नव्याने येत असलेल्या नविन लाल कांद्यालाही भाव मिळण्यासाठी उपाय योजना करावी. यंदा दुष्काळी परिस्थिती असताना शेतकºयांनी ठिबक सिंचन, तुषार सिंचन करून, टॅकरने पाणी विकत घेऊन कांदा जगावला. मात्र त्यालाही भाव मिळत नसल्याने शेतकºयांमधे सरकार विरोधी नाराजीची भावना व्यक्त होत आहे.अशीच परिस्थिती राहिल्यास शेतकºयांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही याची शासनाने दखल घेऊन कांदा उत्पादक शेतकºयांना उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव द्यावा अशी मागणी शेतकरी संघटनेने निवेदनात केली आहे.या प्रसंगी शेतकरी संघटनेचे नेते संतु पाटील झांबरे, बापूसाहेब पगारे, अरूण जाधव, योगेश सोमवंशी, बाळासाहेब गायकवाड, सुभाष सोनवणे, विठ्ठल वाळके, हरिभाऊ पवार, योगेश गायकवाड, संजय पाटील, मधुकर देशमुख, सतिश पाटील आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.