शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

कांदा उत्पादक शेतकरी झाला उध्वस्त....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 17:17 IST

येवला : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा भावाने निचांक गाठला असून १०० ते ४०० रुपये व सरासरी २५० रु पये प्रतीक्विंटल भाव कांद्याला मिळाला. कांदा दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा चिंतेत सापडला आहे.

ठळक मुद्देशेतकरी संघटना : शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासनाने लक्ष घालावे

येवला : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा भावाने निचांक गाठला असून १०० ते ४०० रुपये व सरासरी २५० रु पये प्रतीक्विंटल भाव कांद्याला मिळाला. कांदा दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा चिंतेत सापडला आहे.केंद्र आणि राज्य सरकार पाच राज्यातील निवडणूक प्रचारात व्यस्त असून राम मंदिर, आरक्षण विषयात ईतर पक्ष संघटना सहभागी असल्याने शेतीमाल भावाचा प्रश्न बाजूला पडला असून शेतकर्?यांच्या जीवनामरणाचा प्रश्न सरकारने त्वरित हाती घ्यावा आणि शेतकºयांनी विकलेल्या मालावर त्वरित अनुदान जाहिर करावे व फरकाची रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा करावी अशी मागणी शेतकरी संघटनेने एका निवेदनाद्वारे तहसीलदार रोहिदास वारूळे यांच्याकडे केली आहे.मागील वर्षी कांद्याला चांगला भाव मिळाला होता. आलेला पैसा चाळ बांधण्यात खर्च केला. कांदा साठवणूक केली मात्र आठ महिने कांदा साठवून आज मातीमोल भावाने कांदा विकण्याची वेळ शासनाच्या धोरणामुळे आली असल्याची चर्चा शेतकरी करत आहेत. केंद्र आणि राज्य शासनाने आयात-निर्यात धोरणात सुधारणा करून शेतकºयांना योग्य भाव मिळवून द्यावा आणि बाजारात नव्याने येत असलेल्या नविन लाल कांद्यालाही भाव मिळण्यासाठी उपाय योजना करावी. यंदा दुष्काळी परिस्थिती असताना शेतकºयांनी ठिबक सिंचन, तुषार सिंचन करून, टॅकरने पाणी विकत घेऊन कांदा जगावला. मात्र त्यालाही भाव मिळत नसल्याने शेतकºयांमधे सरकार विरोधी नाराजीची भावना व्यक्त होत आहे.अशीच परिस्थिती राहिल्यास शेतकºयांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही याची शासनाने दखल घेऊन कांदा उत्पादक शेतकºयांना उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव द्यावा अशी मागणी शेतकरी संघटनेने निवेदनात केली आहे.या प्रसंगी शेतकरी संघटनेचे नेते संतु पाटील झांबरे, बापूसाहेब पगारे, अरूण जाधव, योगेश सोमवंशी, बाळासाहेब गायकवाड, सुभाष सोनवणे, विठ्ठल वाळके, हरिभाऊ पवार, योगेश गायकवाड, संजय पाटील, मधुकर देशमुख, सतिश पाटील आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.