शहरं
Join us  
Trending Stories
1
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
2
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
3
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
4
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
5
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
6
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
7
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
8
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
9
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
10
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
11
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
12
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
13
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
14
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
15
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
16
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
17
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
18
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
19
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
20
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले

चाळीत साठवून ठेवलेला कांदा शेळ्या-मेंढ्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 17:17 IST

पाटोदा : दिवाळीपूर्वी आठ-नऊ रु पये किलो दराने विक्र ी होणारा उन्हाळ कांदा सध्या एक-दीड रु पये किलोपेक्षाही कमी भावात विकावा लागत असल्याने व वाहतुकीचा, मजुरीचा खर्चही खिशातून द्यावा लागत असल्याने येथील शेतकरी पोपट जाधव यांनी चाळीत साठवून ठेवलेला कांदा शेळ्या-मेंढ्यांना खाऊ घातला आहे.

ठळक मुद्देकांदा निर्यात केली जात नसल्याने बाजारभावात कांदा मातीमोल दरात विकावा लागत आहे,

पाटोदा : दिवाळीपूर्वी आठ-नऊ रु पये किलो दराने विक्र ी होणारा उन्हाळ कांदा सध्या एक-दीड रु पये किलोपेक्षाही कमी भावात विकावा लागत असल्याने व वाहतुकीचा, मजुरीचा खर्चही खिशातून द्यावा लागत असल्याने येथील शेतकरी पोपट जाधव यांनी चाळीत साठवून ठेवलेला कांदा शेळ्या-मेंढ्यांना खाऊ घातला आहे.भाव वाढतील या आशेवर जाधव यांनी आठ-दहा महिन्यांपासून तीनशे क्विंटल कांदा साठवून ठेवला होता. दिवाळीपूर्वी त्यांनी त्यातील पन्नास क्विंटल कांदा मार्केटला विकला असता त्यांना आठ-नऊ रु पये किलो दराने भाव मिळाला. यानंतर कांद्याचे दर दरदिवशी कमी कमी होऊन कांदा हा मातीमोल भावात म्हणजे एक रु पया किलोने विकला जात आहे. कांदा चाळीतून गाडीत भरण्यासाठी तसेच वाहतूक खर्च सुमारे तीन हजार रु पये येत असल्याने मजुरांचे पैसे घरातून द्यावे लागत असल्याने जाधव यांनी आपल्या चाळीत साठवून ठेवलेला सुमारे दीडशे क्विंटल कांदा परिसरातील चारा-पाण्याच्या शोधात आलेल्या मेंढपाळ बांधवांच्या शेळ्या-मेंढ्यांना खाऊ घालत आहे.-----------------------------सरकार हे कोणत्याही पक्षाचे असू द्या ते शेतकऱ्यांच्या विरोधातच आहे. मते घेईपर्यंत त्यांना शेतकरी दिसतो ज्याप्रमाणे कांद्याचे भाव वाढल्यानंतर शासन कांदा आयात करून गरज भागवतो त्याप्रमाणे भाव कमी झाल्यावर कांदा निर्यात केली जात नसल्याने बाजारभावात कांदा मातीमोल दरात विकावा लागत आहे, यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहे. शेतकºयांचा कांदा कमीत कमी पाच रु पये किलोने विकला जावा.- पोपट जाधव, शेतकरी, पाटोदा (25पाटोदाकांदा)