शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

कांद्याची अर्थव्यवस्था उद््ध्वस्त

By admin | Updated: October 10, 2014 23:49 IST

कांद्याची अर्थव्यवस्था उद््ध्वस्त

मनमाड : कांद्याच्या बाबतीत आम्ही काहीही निर्णय घेतला नाही, असे म्हणणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनेच कांद्याची अर्थव्यवस्था उद््ध्वस्त केली असल्याची घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना केला़ राष्ट्रवादी कॉँग्रेसचे येवला व नांदगाव मतदारसंघातील उमेदवार छगन भुजबळ व पंकज भुजबळ यांच्या प्रचारार्थ मनमाड येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. व्यासपीठावर छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, तालुका अध्यक्ष बापूसाहेब कवडे, पंकज भुजबळ, विजयश्री चुंभळे, तुकाराम दिघोळे, मधुकर हिरे, गंगाधर बिडगर, साहेबराव पाटील आदि उपस्थित होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली.गावित व पाचपुते यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांनीच त्यांच्यासाठी पायघड्या घातल्या. आमच्याकडे असताना ते भ्रष्टाचारी होते तुमच्याकडे आल्यानंतर संत कसे झाले,असा टोलाही त्यांनी भाजपाला लगावला. दसऱ्याच्या दिवशी सरसंघचालकांचे भाषण दूरदर्शनवरून दाखवल्याच्या प्रकाराबद्दल बोलताना ते म्हणाले की हे सरकार मुठभर लोकांच्या हिताची जपणूक करणारे आहे. त्याच दिवशी नागपूर येथे सुरू असलेल्या दीक्षाभूमीवरील कार्यक्रमाचे महत्त्व दूरदर्शनला वाटले नसल्याची टीका त्यांनी केली. सभेला मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता़ मनमाड पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता़ (वार्ताहर)