शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
6
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
7
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
8
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
9
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
10
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
11
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
12
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
13
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
14
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
15
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
16
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
17
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
18
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
19
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
20
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास

कांदा लिलाव पद्धत : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सवाल

By admin | Updated: July 28, 2016 00:06 IST

व्यापाऱ्यांनो, गोण्या परत द्याल का?

नाशिक : शेतकऱ्यांनी ४५ किलोच्या गोण्यांमध्ये कांदा भरून बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी आणावा, अशी अट जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी घातली आहे. पण धान्य व्यापाऱ्यांप्रमाणे कांदा व्यापारी शक्यतो हुक न लावता कांद्याच्या गोण्या त्यांच्या खळ्यावर उतरवून घेऊन शेतकऱ्यांना रिकाम्या गोण्या परत करतील का, असा प्रश्न जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित करीत आहेत. व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या मालाची अडत शेतकऱ्यांकडून वसुल केली जाऊ नये आणि फळे व भाजीपाला नियमनमुक्त करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर राज्यभरातील बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांनी संप पुकारला. काही ठिकाणी व्यापऱ्यांनी तीन,चार दिवसांत संप मागे घेतला तर नाशिक जिल्ह्यात तब्बल २० दिवस कांदा व्यापाऱ्यांचा संप सुरुच होता. दरम्यानच्या काळात जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तजविज म्हणून चाळींमध्ये साठविलेला कांदा सडु लागला. शासनाने अडत बंदीचा निर्णय तर घेतला पण पर्यायी व्यवस्था निर्माण न केल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला. व्यापाऱ्यांच्या संपामुळे शासनाने आपल्या निर्णयाचा पुर्णविचार करण्यासाठी समिती गठीत केली ही समिती ६ आॅगस्टला अडत धोरणाबाबत आपला निर्णय देणार आहे. तोपर्यंत कांदा लिलाव बंद न ठेवता प्रायोगिक तत्वावार ४५ किलोच्या गोणी पध्दतीने कांदा खरेदी करण्याचा निर्णय मनमाड येथे झालेल्या व्यापाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी सुरु झाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी गोणीच्या निर्णयामुळे ‘आगीतुन फुफाट्यात पडल्याची ’ भावना शेतकऱ्यांची झाली आहे. एकुण मालाच्या चार टक्के दराने कापली जाणारी अडत आणि गोणीचा खर्च यांचा विचार करता दोन्ही पध्दतीत शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. ज्युटची (बारदान) एक गोणी साधारणत: २८ ते ३० रुपयांना एक या प्रमाणे शेतकऱ्याला खरेदी करावी लागते. योग्य पध्दतीने हाताळणी केल्यास एक गोणी किमान दोनदा तरी वापरता येवु शकते याचा विचार केल्यास कांदा व्यापाऱ्यांनी धान्य व्यापाऱ्यांप्रमाणे लिलावानंतर आपल्या खळ्यावर हुक न लावता कांदा ओतुन घेउन रिकाम्या गोण्या शेतकऱ्यांना परत केल्यास शेतकऱ्यांना त्यांचा पुर्णवापर करता येऊ शकतो अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.