शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

कांदा लिलाव पद्धत : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सवाल

By admin | Updated: July 28, 2016 00:06 IST

व्यापाऱ्यांनो, गोण्या परत द्याल का?

नाशिक : शेतकऱ्यांनी ४५ किलोच्या गोण्यांमध्ये कांदा भरून बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी आणावा, अशी अट जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी घातली आहे. पण धान्य व्यापाऱ्यांप्रमाणे कांदा व्यापारी शक्यतो हुक न लावता कांद्याच्या गोण्या त्यांच्या खळ्यावर उतरवून घेऊन शेतकऱ्यांना रिकाम्या गोण्या परत करतील का, असा प्रश्न जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित करीत आहेत. व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या मालाची अडत शेतकऱ्यांकडून वसुल केली जाऊ नये आणि फळे व भाजीपाला नियमनमुक्त करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर राज्यभरातील बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांनी संप पुकारला. काही ठिकाणी व्यापऱ्यांनी तीन,चार दिवसांत संप मागे घेतला तर नाशिक जिल्ह्यात तब्बल २० दिवस कांदा व्यापाऱ्यांचा संप सुरुच होता. दरम्यानच्या काळात जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तजविज म्हणून चाळींमध्ये साठविलेला कांदा सडु लागला. शासनाने अडत बंदीचा निर्णय तर घेतला पण पर्यायी व्यवस्था निर्माण न केल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला. व्यापाऱ्यांच्या संपामुळे शासनाने आपल्या निर्णयाचा पुर्णविचार करण्यासाठी समिती गठीत केली ही समिती ६ आॅगस्टला अडत धोरणाबाबत आपला निर्णय देणार आहे. तोपर्यंत कांदा लिलाव बंद न ठेवता प्रायोगिक तत्वावार ४५ किलोच्या गोणी पध्दतीने कांदा खरेदी करण्याचा निर्णय मनमाड येथे झालेल्या व्यापाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी सुरु झाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी गोणीच्या निर्णयामुळे ‘आगीतुन फुफाट्यात पडल्याची ’ भावना शेतकऱ्यांची झाली आहे. एकुण मालाच्या चार टक्के दराने कापली जाणारी अडत आणि गोणीचा खर्च यांचा विचार करता दोन्ही पध्दतीत शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. ज्युटची (बारदान) एक गोणी साधारणत: २८ ते ३० रुपयांना एक या प्रमाणे शेतकऱ्याला खरेदी करावी लागते. योग्य पध्दतीने हाताळणी केल्यास एक गोणी किमान दोनदा तरी वापरता येवु शकते याचा विचार केल्यास कांदा व्यापाऱ्यांनी धान्य व्यापाऱ्यांप्रमाणे लिलावानंतर आपल्या खळ्यावर हुक न लावता कांदा ओतुन घेउन रिकाम्या गोण्या शेतकऱ्यांना परत केल्यास शेतकऱ्यांना त्यांचा पुर्णवापर करता येऊ शकतो अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.