शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

रोजगारासाठी एक हजार जणांनी केली नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:19 IST

नाशिक : लॉकडाऊनमुळे रोजगाराच्या संधी कमी झालेल्या आहेत. असलेले रोजगार बंद झाले तर अनेकांना नोकरीवरून कमी करण्यात आले. त्यामुळे ...

नाशिक : लॉकडाऊनमुळे रोजगाराच्या संधी कमी झालेल्या आहेत. असलेले रोजगार बंद झाले तर अनेकांना नोकरीवरून कमी करण्यात आले. त्यामुळे रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुण-तरुणींनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे धाव घेतली आहे. या केंद्राच्या माध्यमातून का होईना रोजगाराची संधी मिळेल या अपेक्षेने केंद्रात मोठ्या प्रमाणात तरुणांनी नावे नोंदविली जात आहेत.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडून तरुणांना रोजगाराभिमुख व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली जाते. अनेक खासगी कंपन्यांकडून येथील पात्रताधारकांची यादी मागविली जाते. तसेच या केंद्राच्या माध्यमातूनदेखील खासगी आस्थापनांची माहिती घेतली जाते. जेणे करून नोकरीची संधी उपलब्ध असलेल्या ठिकाणी नोंदणीकृत उमेदवारांना संधी मिळू शकेल. फार मोठ्या प्रमाणात नसली तरी काही तरुण-तरुणींना नोकरीची संधीदेखील मिळून जाते.

--इन्फो--

कोणत्या महिन्यात किती नोंदणी

जानेवारी : ---- तरुण----------- तरुणी

फेब्रुवारी : ------ तरुण --------- तरुणी

मार्च : --------- तरुण ---------- तरुणी

एप्रिल : -------- तरुण ---------- तरुणी

मे : -------- तरुण --------- तरुणी

जून : ------- तरूण --------- तरुणी

जुलै : -------- तरुण ----- तरुणी

ऑगस्ट : --------- तरुण -------- तरुणी

--इन्फो--

अनेकांनी पकडली मुंबई, पुण्याची वाट

१) पुणे आणि मुंबई शहरात नोकरीच्या मिळणाऱ्या संधी लक्षात घेऊन अनेक तरुण-तरुणी या मोठ्या शहरांकडे वळतात.

२) नावे नोंदविल्यानंतरही अनेकांना वेळेत नोकरीची संधी मिळाली नाही, तर असे उमेदवार नोकरीनिमित्ताने आपले शहर सोडतात.

३) पुण्यात आयटी इंडस्ट्री तर मुंबईत रोजगाराची संधी असल्याने असंख्य तरुण-तरुणी या शहरांमध्ये नोकरी शोधतात.

--इन्फो--

महाराष्ट्र राज्याने सन २००० मध्ये रोजगार आणि स्वयंरोजगाराबाबत घोषित केलेल्या धोरणानुसार सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगार योजने प्रीत्यर्थ आवश्यक तो निधी देण्याची जबाबदारी राज्य शासनाने घेतली. रोजगार व स्वयंरोजगार योजनांमुळे योग्य लाभार्थ्यांना खरोखरच लाभ होण्यासाठी या योजना सुलभ आणि पारदर्शीपणे राबविणे आवश्यक आहे. स्वयंरोजगारासाठी सामान्यपणे कोणतीही व्यक्ती सहसा प्रवृत्त होत नाही; कारण त्या व्यक्तीस भविष्यात आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्याची खात्री वाटत नाही. स्वयंरोजगाराकरिता सामान्यपणे समाजात अनुकूल बदल घडवून आणावयाचे असतील तर स्वयंरोजगार करणाऱ्यास भविष्यकाळासाठी आर्थिक स्थैर्याची शाश्वती देण्याची आवश्यकता आहे. या अनुषंगाने राज्यातील बेरोजगार उमेदवारांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासन विविध विभागांतर्गत महामंडळामार्फत उमेदवारांना स्वयंरोजगाराकरिता कर्ज उपलब्ध करून देते.