शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

रोजगारासाठी एक हजार जणांनी केली नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:19 IST

नाशिक : लॉकडाऊनमुळे रोजगाराच्या संधी कमी झालेल्या आहेत. असलेले रोजगार बंद झाले तर अनेकांना नोकरीवरून कमी करण्यात आले. त्यामुळे ...

नाशिक : लॉकडाऊनमुळे रोजगाराच्या संधी कमी झालेल्या आहेत. असलेले रोजगार बंद झाले तर अनेकांना नोकरीवरून कमी करण्यात आले. त्यामुळे रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुण-तरुणींनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे धाव घेतली आहे. या केंद्राच्या माध्यमातून का होईना रोजगाराची संधी मिळेल या अपेक्षेने केंद्रात मोठ्या प्रमाणात तरुणांनी नावे नोंदविली जात आहेत.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडून तरुणांना रोजगाराभिमुख व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली जाते. अनेक खासगी कंपन्यांकडून येथील पात्रताधारकांची यादी मागविली जाते. तसेच या केंद्राच्या माध्यमातूनदेखील खासगी आस्थापनांची माहिती घेतली जाते. जेणे करून नोकरीची संधी उपलब्ध असलेल्या ठिकाणी नोंदणीकृत उमेदवारांना संधी मिळू शकेल. फार मोठ्या प्रमाणात नसली तरी काही तरुण-तरुणींना नोकरीची संधीदेखील मिळून जाते.

--इन्फो--

कोणत्या महिन्यात किती नोंदणी

जानेवारी : ---- तरुण----------- तरुणी

फेब्रुवारी : ------ तरुण --------- तरुणी

मार्च : --------- तरुण ---------- तरुणी

एप्रिल : -------- तरुण ---------- तरुणी

मे : -------- तरुण --------- तरुणी

जून : ------- तरूण --------- तरुणी

जुलै : -------- तरुण ----- तरुणी

ऑगस्ट : --------- तरुण -------- तरुणी

--इन्फो--

अनेकांनी पकडली मुंबई, पुण्याची वाट

१) पुणे आणि मुंबई शहरात नोकरीच्या मिळणाऱ्या संधी लक्षात घेऊन अनेक तरुण-तरुणी या मोठ्या शहरांकडे वळतात.

२) नावे नोंदविल्यानंतरही अनेकांना वेळेत नोकरीची संधी मिळाली नाही, तर असे उमेदवार नोकरीनिमित्ताने आपले शहर सोडतात.

३) पुण्यात आयटी इंडस्ट्री तर मुंबईत रोजगाराची संधी असल्याने असंख्य तरुण-तरुणी या शहरांमध्ये नोकरी शोधतात.

--इन्फो--

महाराष्ट्र राज्याने सन २००० मध्ये रोजगार आणि स्वयंरोजगाराबाबत घोषित केलेल्या धोरणानुसार सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगार योजने प्रीत्यर्थ आवश्यक तो निधी देण्याची जबाबदारी राज्य शासनाने घेतली. रोजगार व स्वयंरोजगार योजनांमुळे योग्य लाभार्थ्यांना खरोखरच लाभ होण्यासाठी या योजना सुलभ आणि पारदर्शीपणे राबविणे आवश्यक आहे. स्वयंरोजगारासाठी सामान्यपणे कोणतीही व्यक्ती सहसा प्रवृत्त होत नाही; कारण त्या व्यक्तीस भविष्यात आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्याची खात्री वाटत नाही. स्वयंरोजगाराकरिता सामान्यपणे समाजात अनुकूल बदल घडवून आणावयाचे असतील तर स्वयंरोजगार करणाऱ्यास भविष्यकाळासाठी आर्थिक स्थैर्याची शाश्वती देण्याची आवश्यकता आहे. या अनुषंगाने राज्यातील बेरोजगार उमेदवारांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासन विविध विभागांतर्गत महामंडळामार्फत उमेदवारांना स्वयंरोजगाराकरिता कर्ज उपलब्ध करून देते.