शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

एकलहऱ्यातील एक संच बंद

By admin | Updated: May 7, 2017 01:32 IST

एकलहरे औष्णिक केंद्रामधील वीजनिर्मिती करणाऱ्या पाचपैकी तीन संचावर आलेल्या या प्रकल्पामध्ये सध्या दोनच संच कार्यान्वित आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राज्यभरातून वाढलेल्या विजेच्या मागणीच्या तुलनेत उपलब्धता कमी असल्याने भारनियमन सुरू करण्यात आले आहे. यास एकलहरे औष्णिक केंद्रामधील नादुरुस्त व तोकडे संचदेखील कारणीभूत ठरले आहे. वीजनिर्मिती करणाऱ्या पाचपैकी तीन संचावर आलेल्या या प्रकल्पामध्ये सध्या दोनच संच कार्यान्वित असून, दिवसाला ४२० मेगावॉट वीजनिर्मिती केली जात आहे.नाशिकमधील एकलहरे येथे असलेल्या औष्णिक विद्युत केंद्रावर सुमारे चार वर्षांपूर्वी पाच संचाद्वारे वीजनिर्मितीचे कार्य केले जात होते. यापैकी दोन संच सुमारे तीस वर्षांपेक्षा अधिक जुने झाल्यामुळे ते कालबाह्य ठरविले गेले. त्यानंतर प्रकल्पाची भिस्त तीन संचावर येऊन ठेपली. एकूण ६३० मेगावॉट वीजनिर्मिती या प्रकल्पामधून होत असे; मात्र सातत्याने होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे एक संच या उन्हाळ्यात दोनदा बंद राहिला तर दुरुस्तीसाठी पुन्हा आठवडाभरापासून संच बंद पडलेला आहे. यामुळे सध्या आठवडाभरापासून प्रतिदिनी ४२० मेगावॉट वीजनिर्मिती होत आहे. कोळशाच्या वाहतुकीचा खर्च परवडत नसल्यामुळे हा प्रकल्प स्थलांतरित करण्याच्या हालचाली शासनस्तरावर सुरू होत्या. त्यामुळे दोन संच चार वर्षांपूर्वीच बंद पडूनदेखील नवीन संच मिळू शकलेले नाहीत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी नागपूर येथे या प्रकल्पाला नवीन संच उपलब्ध करून देत पूर्ण क्षमतेने वीजनिर्मितीला चालना दिली जाईल, अशी घोषणा केली होती. यामुळे कर्मचाऱ्यांना-देखील दिलासा मिळाला होता; मात्र अद्याप नवीन संच देण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने कोणतीही पावले उचललेली नाही. त्यामुळे तीन संचांवर वीजनिर्मितीचे कार्य सुरू आहे.