शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
'AB फॉर्म'चा झोल केला! भाजपच्या बंडखोर उमेदवाराने पक्षालाच गंडवलं, अमित साटमांचे थेट अधिकाऱ्यालाच पत्र
3
सिगरेट, पान मसाला, तंबाखू महागणार, नवीन कर आणि सेस लागू होणार; १ फेब्रुवारीपासून किंमत वाढणार? जाणून घ्या
4
आजपासून 'भारत टॅक्सी'ची सुरुवात; स्वस्त प्रवास अन् 'नो सर्ज प्रायसिंग'ने प्रवाशांना मिळणार दिलासा
5
दोन वर्षांत १४ लाख पाकिस्तान्यांनी देश सोडला! कारण काय?
6
१ वर्षासाठी एफडीमध्ये १ लाख रुपये गुंतवून तुम्हाला किती परतावा मिळेल? कोणत्या बँकेत किती रिटर्न, पाहा
7
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
8
दूधात मिसळलं नळाचं पाणी, तेच ठरलं विष; ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू, १० वर्षांनी झालेला मुलगा
9
नवे वर्ष २०२६: आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी या वर्षात करा 'हे' ५ उपाय!
10
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
11
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
12
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
13
शिंदेसेनेच्या २, उद्धवसेना, काँग्रेसच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज रद्द, ७१९ उमेदवार रिंगणात
14
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
15
तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...?
16
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
17
अर्ज छाननीचाही ‘रात्रीस खेळ चाले’; मुंबईत १६७ अर्ज बाद, भाईंदरमध्ये ६०० अर्ज वैध
18
'धुरंधर'च्या यशानंतरही रणवीर सिंह गायब? आता दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'पाजी खूप...'
19
बंडखोरी, नाराजी शमविण्यासाठी ठाकरे बंधूंचे नेते आता मैदानात
20
LPG Price Hike: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येत दीड पटीने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:11 IST

नाशिक : जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत शुक्रवारी (दि. २) सुमारे दीडपटीने वाढ झाली असून, नवीन बाधित संख्या दोनशेचा आकडा ...

नाशिक : जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत शुक्रवारी (दि. २) सुमारे दीडपटीने वाढ झाली असून, नवीन बाधित संख्या दोनशेचा आकडा ओलांडून २०१ वर पोहोचली आहे तर २३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, दिवसभरात चार नागरिकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात नवीन कोरोना रुग्णांचे प्रमाण सुमारे पंधरवड्यानंतर पुन्हा दोनशेपार पोहोचले आहे. या रुग्णसंख्येत गत दोन आठवड्यांपासून नवीन बाधित संख्या सातत्याने शंभर ते दीडशे रुग्णांदरम्यानच रहात होती. मात्र, त्यात शुक्रवारी अचानकपणे वाढ झाल्याने जिल्ह्याच्या दृष्टीने हा सूचक इशारा आहे. जिल्ह्यात काही विवाह सोहळ्यांना गर्दी होऊ लागल्याचे चित्र दिसत असतानाच बाधितांमध्ये दिसणाऱ्या वाढीला धोक्याचा इशारा मानून यंत्रणेला निर्धारित नियमांच्या अंमलबजावणीवर पुन्हा लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. जिल्ह्यात शुक्रवारी गेलेल्या चार बळींमुळे आतापर्यंतच्या बळींची संख्या ८३५८ वर पोहोचली आहे.

इन्फोे

प्रलंबित अहवाल पुन्हा हजारावर

पूर्वीच्या तुलनेत बाधितांच्या अहवालांचे प्रमाण मिळण्याचा वेग मंदावला आहे. त्यामुळेच प्रलंबित अहवालांची संख्या ११९२ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक ग्रामीणचे ५८९, नाशिक मनपाचे २७४, तर मालेगाव मनपाचे ३२९ अहवाल प्रलंबित आहेत तर जिल्ह्यात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ९७.२७ वर पोहोचले आहे.