शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूर धरणातून दीड हजार क्युसेक पाणी प्रवाहित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:14 IST

नााशिक : गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात पाऊस बरसत असल्याने रविवारी सकाळी गंगापूर धरणातून ५५३ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत ...

नााशिक : गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात पाऊस बरसत असल्याने रविवारी सकाळी गंगापूर धरणातून ५५३ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असताना दुपारनंतर पावसाचा जोर वाढत गेल्याने हजार क्युसेकने विसर्ग वाढविण्यात आला. त्यामुळे सायंकाळी धरणातून १५०० क्युसेक वेगाने पाणी गोदावरीत प्रवाहित झाले. त्यामुळे गोदावरी नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्ह्यात जवळपास सर्वदूर पावसाला सुरुवात झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. पावसाची संततधार सुरू असल्याने पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढल्यामुळे धरणांची पाणीपातळी वाढलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास पाच धरणांमधून सकाळपासून विसर्ग केला जात असून, गंगापूरसह दारणा आणि कडवा येथूून होणारा विसर्ग सायंकाळनंतर आणखी वाढविण्यात आला.

गंगापूर धरणक्षेत्रात पाऊस सुरू झाला असला तरी समूहातील गौतमी, काश्यपी धरणाच्या पाणीपातळीत अपेक्षित वाढ झालेली नसल्याने गंगापूर धरणातून विसर्ग केला जात नव्हता. आता समूहातील धरणांची पातळीदेखील वाढल्याने गंगापूर धरणातून रविवारी सकाळपासूनच विसर्गला सुरुवात करण्यात आली. मागीलवर्षी या महिन्यात गंगापूर धरणातून जवळपास दोन हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ आली होती. यंदा मागीलवर्षीच्या तुलनेत विसर्ग कमी असण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीपातळीत वाढ होत आहे.

दरम्यान, इगतपुरी तालुक्यात पावसाचा जोर वाढल्याने दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येत आहे. रविवारी दुपारी १२ वाजल्यापासून दारणासह कडवा, आळंदी, वालदेवी , नांदुरमध्यमेश्वर तसेच गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सकाळच्या सुमारास दारणामधून १००६०, कडवामधून १६९६, आळंदीमधून ३० , वालदेवी धरणातून १८३ , नांदुरमध्यमेश्वर येथून १३,४२७, तर गंगापूर धरणातून ५५३ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यानंतर मात्र त्यात वाढ होत गेली. इगतपुरी तालुक्यात पावसाचा जोर वाढत असल्याने दुपारी तीन वाजल्यानंतर दारणा धरणातून होणारा विसर्ग १२ हजार ७८८ क्युसेक इतका करण्यात आला. कडवा धरण क्षेत्रात दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्याने सांडवा विसर्ग सायंकाळी २२०० क्युकेक इतका करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

धरणांमधून विसर्ग सुरू झाल्याने नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास रात्री उशिरापर्यंत पाण्याचा विसर्ग वाढविला जाण्याचीदेखील शक्यता आहे. मागीलवर्षी गंगापूर धरणातून जवळपास दोन हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ आली होती. पावसाचा जोर कायम राहिल्यास यंदा यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सायंकाळपर्यंत धरणक्षेत्रात जवळपास २० मि.मी. पावसाची नोंद झाली.