शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

दीड लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा होणार लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 01:24 IST

राज्य सरकारने महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमुक्तीची घोषणा केल्याने त्याचा लाभ जिल्ह्यातील सुमारे दीड लाख शेतकºयांना होणार असून, या कर्जमुक्तीचे पैसे थेट जिल्हा बॅँकेच्या खात्यात जमा होणार असल्याने नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचा भार हलका होऊन जवळपास दीड हजार कोटींचा निधी मिळण्याची शक्यता आहे.

नाशिक : राज्य सरकारने महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमुक्तीची घोषणा केल्याने त्याचा लाभ जिल्ह्यातील सुमारे दीड लाख शेतकºयांना होणार असून, या कर्जमुक्तीचे पैसे थेट जिल्हा बॅँकेच्या खात्यात जमा होणार असल्याने नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचा भार हलका होऊन जवळपास दीड हजार कोटींचा निधी मिळण्याची शक्यता आहे.राज्यातील शेतकºयांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी गेल्या पाच वर्षांपासून केली जात असून, युती सरकारच्या कालावधीत फडणवीस सरकारने छत्रपती शिवाजी स्वाभिमान कर्जमुक्ती योजना जाहीर करून शेतकºयांना दीड लाखांपर्यंतचे कर्जमाफ केले होते, परंतु या कर्जमाफी योजनेचा फारसा शेतकºयांना लाभ झाला नाही, अशा तक्रारी शेतकºयांकडून करण्यात येऊन विरोधी पक्षांनी त्याचे राजकीय भांडवल केले होते. चालूू वर्षी अवकाळी पावसामुळे खरीप पिकाचे नुकसान होऊन शेतकºयांच्या आणखी अडचणी वाढल्या त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा अग्रस्थानी होता. नवीन सरकार सत्तेवर आल्यावर शेतकºयांना कर्जमुक्त करेल, असे आश्वासन जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी दिलेले असल्यामुळे नवीन सरकार व विशेष करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडे साºयांचे लक्ष लागले होते. त्यानुसार विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी याबाबतची घोषणा केली असून, मार्च २०१५ नंतर कर्ज घेतलेल्या व ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकीत असलेल्या शेतकºयांचे सरसकट दोन लाख रुपये कर्जमुक्ती करण्याची त्यांनी घोषणा केली आहे. त्याचबरोबर ज्या शेतकºयांनी नियमितकर्ज परतफेड केली त्यांनाही प्रोत्साहन पर अनुदान देण्याचे ठरविण्यात आले आहे.सरकारच्या घोषणेनुसार नाशिक जिल्हा बँकेकडून पीककर्ज घेतलल्या एक लाख ४५ हजार शेतकºयांना त्याचा लाभ होणार असून, दोन लाखांहून अधिक कर्ज घेतलेल्या शेतकºयांची संख्या १९ हजार इतकी आहे. दोन लाखांपर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकºयांच्या कर्जमुक्तीतून जिल्हा बॅँकेला ११ हजार कोटी ८४ लाख रुपये मिळणे अपेक्षित आहे, तर दोन लाखांहून अधिक शेतकºयांनी उर्वरित कर्ज भरल्यास त्यापोटी ४२९ कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे.यापूर्वी एक लाख १३ हजार शेतक-यांना फायदायुती सरकारच्या काळात मुख्यमंत्री फडणवीस सरकारने केलेल्या दीड लाखांपर्यंतच्या कर्जमुक्तीचा जिल्ह्यातील एक लाख १३ हजार शेतकºयांना लाभ मिळाला आहे. त्यापोटी जिल्हा बॅँकेला सातशे कोटी रुपये मिळाले होते.

टॅग्स :FarmerशेतकरीBanking Sectorबँकिंग क्षेत्रGovernmentसरकार