शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा होणार लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 01:24 IST

राज्य सरकारने महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमुक्तीची घोषणा केल्याने त्याचा लाभ जिल्ह्यातील सुमारे दीड लाख शेतकºयांना होणार असून, या कर्जमुक्तीचे पैसे थेट जिल्हा बॅँकेच्या खात्यात जमा होणार असल्याने नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचा भार हलका होऊन जवळपास दीड हजार कोटींचा निधी मिळण्याची शक्यता आहे.

नाशिक : राज्य सरकारने महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमुक्तीची घोषणा केल्याने त्याचा लाभ जिल्ह्यातील सुमारे दीड लाख शेतकºयांना होणार असून, या कर्जमुक्तीचे पैसे थेट जिल्हा बॅँकेच्या खात्यात जमा होणार असल्याने नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचा भार हलका होऊन जवळपास दीड हजार कोटींचा निधी मिळण्याची शक्यता आहे.राज्यातील शेतकºयांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी गेल्या पाच वर्षांपासून केली जात असून, युती सरकारच्या कालावधीत फडणवीस सरकारने छत्रपती शिवाजी स्वाभिमान कर्जमुक्ती योजना जाहीर करून शेतकºयांना दीड लाखांपर्यंतचे कर्जमाफ केले होते, परंतु या कर्जमाफी योजनेचा फारसा शेतकºयांना लाभ झाला नाही, अशा तक्रारी शेतकºयांकडून करण्यात येऊन विरोधी पक्षांनी त्याचे राजकीय भांडवल केले होते. चालूू वर्षी अवकाळी पावसामुळे खरीप पिकाचे नुकसान होऊन शेतकºयांच्या आणखी अडचणी वाढल्या त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा अग्रस्थानी होता. नवीन सरकार सत्तेवर आल्यावर शेतकºयांना कर्जमुक्त करेल, असे आश्वासन जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी दिलेले असल्यामुळे नवीन सरकार व विशेष करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडे साºयांचे लक्ष लागले होते. त्यानुसार विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी याबाबतची घोषणा केली असून, मार्च २०१५ नंतर कर्ज घेतलेल्या व ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकीत असलेल्या शेतकºयांचे सरसकट दोन लाख रुपये कर्जमुक्ती करण्याची त्यांनी घोषणा केली आहे. त्याचबरोबर ज्या शेतकºयांनी नियमितकर्ज परतफेड केली त्यांनाही प्रोत्साहन पर अनुदान देण्याचे ठरविण्यात आले आहे.सरकारच्या घोषणेनुसार नाशिक जिल्हा बँकेकडून पीककर्ज घेतलल्या एक लाख ४५ हजार शेतकºयांना त्याचा लाभ होणार असून, दोन लाखांहून अधिक कर्ज घेतलेल्या शेतकºयांची संख्या १९ हजार इतकी आहे. दोन लाखांपर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकºयांच्या कर्जमुक्तीतून जिल्हा बॅँकेला ११ हजार कोटी ८४ लाख रुपये मिळणे अपेक्षित आहे, तर दोन लाखांहून अधिक शेतकºयांनी उर्वरित कर्ज भरल्यास त्यापोटी ४२९ कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे.यापूर्वी एक लाख १३ हजार शेतक-यांना फायदायुती सरकारच्या काळात मुख्यमंत्री फडणवीस सरकारने केलेल्या दीड लाखांपर्यंतच्या कर्जमुक्तीचा जिल्ह्यातील एक लाख १३ हजार शेतकºयांना लाभ मिळाला आहे. त्यापोटी जिल्हा बॅँकेला सातशे कोटी रुपये मिळाले होते.

टॅग्स :FarmerशेतकरीBanking Sectorबँकिंग क्षेत्रGovernmentसरकार