शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

दीड लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा होणार लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 01:24 IST

राज्य सरकारने महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमुक्तीची घोषणा केल्याने त्याचा लाभ जिल्ह्यातील सुमारे दीड लाख शेतकºयांना होणार असून, या कर्जमुक्तीचे पैसे थेट जिल्हा बॅँकेच्या खात्यात जमा होणार असल्याने नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचा भार हलका होऊन जवळपास दीड हजार कोटींचा निधी मिळण्याची शक्यता आहे.

नाशिक : राज्य सरकारने महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमुक्तीची घोषणा केल्याने त्याचा लाभ जिल्ह्यातील सुमारे दीड लाख शेतकºयांना होणार असून, या कर्जमुक्तीचे पैसे थेट जिल्हा बॅँकेच्या खात्यात जमा होणार असल्याने नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचा भार हलका होऊन जवळपास दीड हजार कोटींचा निधी मिळण्याची शक्यता आहे.राज्यातील शेतकºयांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी गेल्या पाच वर्षांपासून केली जात असून, युती सरकारच्या कालावधीत फडणवीस सरकारने छत्रपती शिवाजी स्वाभिमान कर्जमुक्ती योजना जाहीर करून शेतकºयांना दीड लाखांपर्यंतचे कर्जमाफ केले होते, परंतु या कर्जमाफी योजनेचा फारसा शेतकºयांना लाभ झाला नाही, अशा तक्रारी शेतकºयांकडून करण्यात येऊन विरोधी पक्षांनी त्याचे राजकीय भांडवल केले होते. चालूू वर्षी अवकाळी पावसामुळे खरीप पिकाचे नुकसान होऊन शेतकºयांच्या आणखी अडचणी वाढल्या त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा अग्रस्थानी होता. नवीन सरकार सत्तेवर आल्यावर शेतकºयांना कर्जमुक्त करेल, असे आश्वासन जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी दिलेले असल्यामुळे नवीन सरकार व विशेष करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडे साºयांचे लक्ष लागले होते. त्यानुसार विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी याबाबतची घोषणा केली असून, मार्च २०१५ नंतर कर्ज घेतलेल्या व ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकीत असलेल्या शेतकºयांचे सरसकट दोन लाख रुपये कर्जमुक्ती करण्याची त्यांनी घोषणा केली आहे. त्याचबरोबर ज्या शेतकºयांनी नियमितकर्ज परतफेड केली त्यांनाही प्रोत्साहन पर अनुदान देण्याचे ठरविण्यात आले आहे.सरकारच्या घोषणेनुसार नाशिक जिल्हा बँकेकडून पीककर्ज घेतलल्या एक लाख ४५ हजार शेतकºयांना त्याचा लाभ होणार असून, दोन लाखांहून अधिक कर्ज घेतलेल्या शेतकºयांची संख्या १९ हजार इतकी आहे. दोन लाखांपर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकºयांच्या कर्जमुक्तीतून जिल्हा बॅँकेला ११ हजार कोटी ८४ लाख रुपये मिळणे अपेक्षित आहे, तर दोन लाखांहून अधिक शेतकºयांनी उर्वरित कर्ज भरल्यास त्यापोटी ४२९ कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे.यापूर्वी एक लाख १३ हजार शेतक-यांना फायदायुती सरकारच्या काळात मुख्यमंत्री फडणवीस सरकारने केलेल्या दीड लाखांपर्यंतच्या कर्जमुक्तीचा जिल्ह्यातील एक लाख १३ हजार शेतकºयांना लाभ मिळाला आहे. त्यापोटी जिल्हा बॅँकेला सातशे कोटी रुपये मिळाले होते.

टॅग्स :FarmerशेतकरीBanking Sectorबँकिंग क्षेत्रGovernmentसरकार