शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अधिकाऱ्यांच्या टोलवाटोलवीत रस्ता ' खड्यात'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 01:38 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर व संगमनेर या दोन तालुक्यांना जोडणाºया नांदूरशिंगोटे गावातील साडेतीन किलोमीटर रस्ता कोणत्या विभागाकडे आहेत याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या तीन ते चार वर्षापासून रस्त्याची देखभाल दुरुस्ती कोणत्याच विभागाकडून होत नसल्याने दुरावस्था झाली आहे. मात्र आधिकाऱ्यांच्या टोलवाटोलवीत रस्ता खड्यात गेला आहे.

ठळक मुद्देनांदूरशिंगोटे : गावातून जाणाºया महामार्गाची दुरावस्था,वाहनचालक त्रस्त

नांदूरशिंगोटे : सिन्नर व संगमनेर या दोन तालुक्यांना जोडणाºया नांदूरशिंगोटे गावातील साडेतीन किलोमीटर रस्ता कोणत्या विभागाकडे आहेत याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या तीन ते चार वर्षापासून रस्त्याची देखभाल दुरुस्ती कोणत्याच विभागाकडून होत नसल्याने दुरावस्था झाली आहे. मात्र आधिकाऱ्यांच्या टोलवाटोलवीत रस्ता खड्यात गेला आहे.

नाशिक - पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक -५० हा पुर्वी सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावातून जात होता. सदरचा रस्ता चौपदरीकरण होण्याअगोदर राष्ट्रीय महामार्गाकडे होता. त्यामुळे दरवर्षी रस्त्याची देखभाल दुरुस्ती होत होती. चार वर्षीपुर्वी नाशिक - पुणे महामार्गाचे सिन्नर ते खेड पर्यंत चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर गावातील रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे.

गावातून जाणाºया साडेतीन किलोमीटर रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी कोणत्या विभागाकडे मागणी करायची असा प्रश्न ग्रामपंचायत प्रशासनाला पडला आहे. हाँटेल संदीप ते यशराज पेट्रोलपंपापर्यंत बाह्यवळण रस्ता गेला असल्याने सदरचा रस्ता आपोआपच राज्य महामार्गाकडे जात असल्याचे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिका?्यांचे म्हणणे आहे. तर रस्ता चौपदरीकरण करण्यासाठी सन २०१५ -१६ मध्येच संबंधित विभागाकडे गेला असल्याने राष्ट्रीय महामार्ग विभागाचा संबंध येत नसल्याचे त्या विभागाच्या अधिकाºयांचे म्हणणे आहे.

दोन दिवसांपूर्वीच संबंधित रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रव्यवहार झाला असून याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे बांधकाम विभागाने सांगितले. नांदूरशिंगोटे गाव मध्यवर्ती ठिकाणी असल्याने तसेच परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने येथे नेहमीच वाहनांची वर्दळ असते. सिन्नर, संगमनेर, अकोला, लोणी, कोपरगाव, श्रीरामपूर आदी भागात जाण्यासाठी नांदूरशिंगोटे येथून सोयीचे असल्याने अवजड वाहनेही गावातील रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे रस्त्याची दुरावस्था होत असल्याने त्याची नियमित डागडुजी होणे गरजेचे आहे. 

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग