शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

महावितरणच्या अधिकाºयांना डांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:33 IST

आडगाव शिवारात गेल्या महिनाभरापासून एक-दोन नव्हे तर तब्बल तेरा तेरा तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने संतप्त ग्रामस्थांच्या भावनांचा उद्रेक झाला आणि त्यांनी गुुरुवारी (दि.५) सकाळी वीज वितरण कंपनीच्या दोन अधिकाºयांना कार्यालयात डांबून कुलूप लावून घेतले तसेच ठिय्या आंदोलन केले.

पंचवटी : आडगाव शिवारात गेल्या महिनाभरापासून एक-दोन नव्हे तर तब्बल तेरा तेरा तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने संतप्त ग्रामस्थांच्या भावनांचा उद्रेक झाला आणि त्यांनी गुुरुवारी (दि.५) सकाळी वीज वितरण कंपनीच्या दोन अधिकाºयांना कार्यालयात डांबून कुलूप लावून घेतले तसेच ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा संतप्त नागरिकांनी घेतल्याने आडगावात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, चार दिवसांत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.आडगाव शिवारात गेल्या महिनाभरापासून सकाळ, सायंकाळ वीजपुरवठा खंडित होत आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी प्रभागाच्या महिला लोकप्रतिनिधीला घेराव घातला होता तसेच वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी व अधिकाºयांना गावबंदीचा इशाराही दिला होता. तरीही विजेचा लपंडाव सुरूच असल्याने ग्रामस्थांच्या संयमाचा बांध फुटला. गुरुवारी सकाळीच महिलांनी महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढला व त्यानंतर ग्रामस्थ आंदोलनात उतरले. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे मुलांच्या अभ्यासात व्यत्यय येत असून, शेतीची कामे खोळंबली जात आहे. वारंवार तक्र ारी करूनही वीज वितरण कंपनी दखल घेत नाही शिवाय आडगाव सोडून अन्य भागांत वीजपुरवठा सुरळीत असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले व त्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले, तर काहींनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात घुसले. यावेळी तेथे अतिरिक्त कार्यकारी अभियंता भारंबे व सहायक अभियंता मनीष पगार आदी दोघे उपस्थित होेते. त्यांच्याकडून समाधानकारक आश्वासन न मिळाल्याने त्यांना तेथेच डांबले. घटनेचे वृत्त कळताच महावितरण कंपनीच्या अधिकाºयांनी तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र ग्रामस्थ ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. संतप्त ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांना घेराव घातला व वारंवार वीज पुरवठा खंडित का होतो याची विचारणा करून महावितरणाच्या विरोधात घोषणाबाजी केली. जोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने आडगावात काहीकाळ तणावाचे वातावरण पसरले होते. या आंदोलनात नगरसेवक, शेकडो ग्रामस्थ व सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. सदरचा प्रकार महावितरणाच्या वरिष्ठ कार्यालयास कळाल्यांनतर तेथे अन्य अधिकारी तोडगा काढण्यासाठी पाठविण्यात आले.