शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

महावितरणच्या अधिकाºयांना डांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:33 IST

आडगाव शिवारात गेल्या महिनाभरापासून एक-दोन नव्हे तर तब्बल तेरा तेरा तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने संतप्त ग्रामस्थांच्या भावनांचा उद्रेक झाला आणि त्यांनी गुुरुवारी (दि.५) सकाळी वीज वितरण कंपनीच्या दोन अधिकाºयांना कार्यालयात डांबून कुलूप लावून घेतले तसेच ठिय्या आंदोलन केले.

पंचवटी : आडगाव शिवारात गेल्या महिनाभरापासून एक-दोन नव्हे तर तब्बल तेरा तेरा तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने संतप्त ग्रामस्थांच्या भावनांचा उद्रेक झाला आणि त्यांनी गुुरुवारी (दि.५) सकाळी वीज वितरण कंपनीच्या दोन अधिकाºयांना कार्यालयात डांबून कुलूप लावून घेतले तसेच ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा संतप्त नागरिकांनी घेतल्याने आडगावात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, चार दिवसांत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.आडगाव शिवारात गेल्या महिनाभरापासून सकाळ, सायंकाळ वीजपुरवठा खंडित होत आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी प्रभागाच्या महिला लोकप्रतिनिधीला घेराव घातला होता तसेच वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी व अधिकाºयांना गावबंदीचा इशाराही दिला होता. तरीही विजेचा लपंडाव सुरूच असल्याने ग्रामस्थांच्या संयमाचा बांध फुटला. गुरुवारी सकाळीच महिलांनी महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढला व त्यानंतर ग्रामस्थ आंदोलनात उतरले. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे मुलांच्या अभ्यासात व्यत्यय येत असून, शेतीची कामे खोळंबली जात आहे. वारंवार तक्र ारी करूनही वीज वितरण कंपनी दखल घेत नाही शिवाय आडगाव सोडून अन्य भागांत वीजपुरवठा सुरळीत असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले व त्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले, तर काहींनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात घुसले. यावेळी तेथे अतिरिक्त कार्यकारी अभियंता भारंबे व सहायक अभियंता मनीष पगार आदी दोघे उपस्थित होेते. त्यांच्याकडून समाधानकारक आश्वासन न मिळाल्याने त्यांना तेथेच डांबले. घटनेचे वृत्त कळताच महावितरण कंपनीच्या अधिकाºयांनी तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र ग्रामस्थ ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. संतप्त ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांना घेराव घातला व वारंवार वीज पुरवठा खंडित का होतो याची विचारणा करून महावितरणाच्या विरोधात घोषणाबाजी केली. जोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने आडगावात काहीकाळ तणावाचे वातावरण पसरले होते. या आंदोलनात नगरसेवक, शेकडो ग्रामस्थ व सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. सदरचा प्रकार महावितरणाच्या वरिष्ठ कार्यालयास कळाल्यांनतर तेथे अन्य अधिकारी तोडगा काढण्यासाठी पाठविण्यात आले.