शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी, कर्मचार्‍यांची शर्थ मतमोजणीत अव्वल : मुदतीत निकाल

By admin | Updated: May 17, 2014 00:41 IST

नाशिक : मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण त्यापाठोपाठ मतदानप्रक्रिया ते मतमोजणी अशा जवळपास तीन महिने चाललेल्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत अखेरच्या दिवशीही शासकीय यंत्रणा अव्वल ठरली. निवडणूक आयोगाने मतमोजणीचे बदललेले निकष पाहता, दुपारी चार वाजेपर्यंत मतमोजणीची प्रक्रिया सुरू राहण्याची व्यक्त होणारी शंका यंत्रणेने फोल ठरवत, दुपारी साडेबारा वाजताच काम हातावेगळे करून मोकळे झाले.

नाशिक : मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण त्यापाठोपाठ मतदानप्रक्रिया ते मतमोजणी अशा जवळपास तीन महिने चाललेल्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत अखेरच्या दिवशीही शासकीय यंत्रणा अव्वल ठरली. निवडणूक आयोगाने मतमोजणीचे बदललेले निकष पाहता, दुपारी चार वाजेपर्यंत मतमोजणीची प्रक्रिया सुरू राहण्याची व्यक्त होणारी शंका यंत्रणेने फोल ठरवत, दुपारी साडेबारा वाजताच काम हातावेगळे करून मोकळे झाले. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी सुमारे एक हजाराहून अधिक कर्मचारी व अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली होती. सकाळी सहा वाजताच या कर्मचार्‍यांना मतमोजणी स्थळी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते, तर अधिकारी वर्ग पहाटे पाच वाजताच पोहोचले होते. बरोबर आठ वाजता मतमोजणी कर्मचार्‍यांना गोपनीयतेची शपथ दिल्यानंतर मोजणीला सुरुवात झाली. क्षणाचीही उसंत न घेता, जवळपास २२ फेर्‍यांची मोजणी जलदगतीने व विना अडथळा त्यांनी चार तासांत पार पाडली. विशेष म्हणजे मतमोजणी करताना मतदान यंत्रात बिघाड अथवा ते सुरू न होण्याचे प्रकार घडण्याची धास्ती घेतलेल्या यंत्रणेला अशा प्रकारे कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागले नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांपासूनच यंत्रणा कामाला लागली होती. मतदार याद्यांचे पुनरीक्षण, घरोघरी जाऊन मतदारांचा शोध, फोटो ओळखपत्राचे वाटप, नवीन मतदारांची नोंद यांसारख्या विविध पातळ्यांवर काम करतानाच, मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण, मतदारांना घरोघरी जाऊन मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करण्याचे कामही यंत्रणेला करावे लागले. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीही जवळपास २३ हजार कर्मचार्‍यांनी लोकशाहीत आपले योगदान दिले होते. त्यानंतर मात्र मतमोजणीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी २२ दिवसांचा कालावधी हाती असला तरी, मतपेट्यांची सुरक्षितता, मोजणीची व्यवस्था या सार्‍या बाबींची पूर्तता करतानाच दररोज स्ट्रॉँग रूमला हजेरी लावण्याचा दंडकही अधिकार्‍यांनी पाळला. या संपूर्ण प्रक्रियेवर जिल्हाधिकारी विलास पाटील, अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, रघुनाथ गावडे, औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी रामदास खेडकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गीतांजली बाविस्कर, निवासी उपजिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रमेश मिसाळ, नीलेश जाधव, वासंती माळी, रत्नमाला चौरे, तहसीलदार गणेश राठोड, सुचेता भामरे आदिंनी जातीने लक्ष ठेवले. बारा वाजता मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून या अधिकार्‍यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला व मुदतीपूर्व निवडणुकीचा निकाल लावला.