शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
3
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
4
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
5
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
6
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
7
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
8
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
9
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
10
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
11
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
12
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
13
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
14
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
15
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
16
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
17
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...

बुद्धिदात्याला वही, पेन करा अर्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 00:04 IST

चैतन्याचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांकडे जातांना पेढे, हार, फुले आणले जातात. ते वापरलेही जात नाहीत. अशा स्थितीत परिवर्तनाची चळवळ म्हणून नागरिकांनी फुले, पेढे नेण्याऐवजी बुद्धिदात्याला एक वही आणि पेन अर्पण केले, तर गरजवंत मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यास मदत होऊ शकेल! महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने हे आवाहन केले असून, या नव्या चळवळीचा प्रारंभच नाशकातून करण्यात आला आहे.

नाशिक : चैतन्याचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांकडे जातांना पेढे, हार, फुले आणले जातात. ते वापरलेही जात नाहीत. अशा स्थितीत परिवर्तनाची चळवळ म्हणून नागरिकांनी फुले, पेढे नेण्याऐवजी बुद्धिदात्याला एक वही आणि पेन अर्पण केले, तर गरजवंत मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यास मदत होऊ शकेल! महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने हे आवाहन केले असून, या नव्या चळवळीचा प्रारंभच नाशकातून करण्यात आला आहे. गणराय हा श्रद्धेचा भाग असल्याने त्याला महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीने कधीही विरोध केला नाही. मात्र तो परिवर्तनवादी व्हावा आणि लोकमान्य टिळकांनी ज्या वैचारिक प्रबोधनासाठी हा उत्सव सुरू केला, त्याचे खºया अर्थाने स्मरण व्हावे, अशी समितीची अपेक्षा आहे. बदलत्या काळात उत्सव बदलले पाहिजेत, या उद्देशाने १९९७ मध्ये चळवळीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प केला. त्यानुसार गणेशोत्सवाच्या अखेरच्या दिवशी परिसरातील नदीपात्रात जाणारे निर्माल्य बाजूला काढतानाच विसर्जित गणेशमूर्ती दान करण्याची चळवळ सुरू केली. आता ही लोकचळवळ झाली असून, त्यामुळेच आता पुढील टप्पा म्हणून बुद्धिदाता गणरायाला वही आणि पेन अर्पण करण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा शाखेचे कार्यवाह महेंद्र दातरंगे यांनी दिली. गणपतीला अर्पण करण्यासाठी नागरिक हार, फुले आणि पेढे किंवा अन्य नैवेद्य देतात. बºयाचदा खूप हार-फुले आल्याने ते वापरले जात नाहीत तसेच नैवेद्यही पडून राहतो. त्यामुळे हार-फुले किंवा नैवेद्य सर्वांनीच देण्याऐवजी जर भाविकांनी बुद्धिदात्याला वही आणि पेन अर्पण केले, तर ते आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना देता येऊ शकेल. गणराय बुद्धी देवता असल्याने बुद्धिवर्धनासाठी अशा-प्रकारचा उपक्रम आधिक संयुक्तिक ठरेल, असे दातरंगे यांनी सांगितले.उत्सव परिवर्तनशील हवेत आणि ते लोकोपयोगी ठरावेत यासाठी महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीने पूर्वीपासूनच प्रयत्न केले आहेत. समितीने श्रद्धेला कधीही हात घातला नाही. केवळ अशाप्रकारे कृतिशील उत्सव झाला तर ते पुरोगामित्वाच्या दिशेने एक पाऊल ठरेल, तसेच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना ही श्रद्धांजली ठरेल.- महेंद्र दातरंगे, जिल्हा कार्यवाह,महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समिती