शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

मोफत देऊ, पण पात्र ठरू देणार नाही

By admin | Updated: July 19, 2016 00:19 IST

कापसाचे बियाणे : कृषी, महसूल खात्यात संभ्रम

श्याम बागुल ल्ल नाशिकमोफत बियाणे देऊ, पण ते घेण्यासाठी पात्र ठरू देणार नाही, अशा जाचक अटी टाकून राज्य सरकारने जिल्ह्यातील कृषी खात्यामार्फत शेतकऱ्यांसाठी कापसाचे बियाणे उपलब्ध करून दिले असताना, त्याबाबत अनभिज्ञ असलेले महसूल खाते आता तालुक्यांकडून पात्र ठरू पाहणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती गोळा करीत असल्याने शासनाचा कारभार म्हणजे ‘आंधळं दळतंय’ असा झाला आहे. राज्य सरकारने सन २०१२-१३ व २०१३-१४ या दोन वर्षांत ज्या शेतकऱ्यांचे पीककर्ज पुनर्गठन होऊ शकलेले नाही व त्यांचे कर्ज पुनर्गठन न झाल्याने सन २०१६ साठी बॅँकांनी ज्यांना अपात्र ठरविले आहे अशा शेतकऱ्यांसाठी कापसाचे बियाणे मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या मोफत बियाणांचा लाभ देण्यासाठी ज्या काही अटी, शर्ती ठरवून दिल्या आहेत, ते पाहता शासनाच्या मोफत बियाणाचा लाभ कोणीच घेऊ शकणार नाही, अशी परिस्थिती आहे. त्यात प्रामुख्याने ज्या शेतकऱ्यांना गेल्या वर्षी म्हणजेच २०१५ मध्ये खरीप हंगामाची दुष्काळाची मदत मिळालेली आहे, अशा शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार नाही. त्याचबरोबर याच हंगामात ज्या शेतकऱ्यांना पीकविमा नुकसानभरपाई मिळाली त्यांनाही यातून वगळण्यात आले आहे, तसेच ज्या शेतकऱ्यांना २०१६ च्या खरीप हंगामासाठी पीककर्ज मिळालेले असेल त्यांनाही मोफत बियाणे देता येणार नाही. याशिवाय राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना, राष्ट्रीय तेलबिया व तेलयाड अभियानांतर्गत केंद्र व राज्य सरकारचे अनुदान मिळालेले आहे असे शेतकरीही मोफत बियाणांना पात्र ठरणार नाही. नाशिक जिल्ह्णात गेल्या वर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे जिल्ह्णातील १६३३ गावांमधील पीक पैसेवारी पन्नास पैशाहून कमी आल्याने ही सर्व गावे दुष्काळसदृश जाहीर करण्यात आली व शासनाने त्यासाठी ३५६ कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. याचाच अर्थ जिल्ह्णातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांना शासनाची मदत पोहचती झालेली असल्यामुळे कृषी खात्याने मोफत कापूस बियाण्यासाठी ठरवून दिलेल्या निकषात एकही शेतकरी बसू शकत नाही. असे असताना महसूल खात्याने मात्र सर्व तालुक्यांना पत्र पाठवून या निकषात न बसू शकणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. नाशिक जिल्ह्णासाठी शासनाने ९,९०० पाकिटे उपलब्ध करून दिली असून, ज्या शेतकऱ्यांचे सन २०१२ ते २०१४ या वर्षात पीक कर्जाचे पुनर्गठन झालेले नाही, अशांनाच मोफत कापसाचे बियाणे देण्यात येणार आहे. साधारणत: येवला, नांदगाव व मालेगाव तालुक्यातील शेतकरी यासाठी पात्र ठरू शकतील. त्यांची यादी कृषी खात्याकडे आहे.- तुकाराम जगताप, जिल्हा कृषी अधिकारी