शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
2
“वाह फडणवीस वाह, एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार”
3
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
4
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
5
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
6
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
7
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
8
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
9
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
10
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
11
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
12
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
13
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
14
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
15
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
16
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
17
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
18
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
19
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
20
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण

मोफत देऊ, पण पात्र ठरू देणार नाही

By admin | Updated: July 19, 2016 01:58 IST

कापसाचे बियाणे : कृषी, महसूल खात्यात संभ्रम

 श्याम बागुल  नाशिकमोफत बियाणे देऊ, पण ते घेण्यासाठी पात्र ठरू देणार नाही, अशा जाचक अटी टाकून राज्य सरकारने जिल्ह्यातील कृषी खात्यामार्फत शेतकऱ्यांसाठी कापसाचे बियाणे उपलब्ध करून दिले असताना, त्याबाबत अनभिज्ञ असलेले महसूल खाते आता तालुक्यांकडून पात्र ठरू पाहणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती गोळा करीत असल्याने शासनाचा कारभार म्हणजे ‘आंधळं दळतंय’ असा झाला आहे. राज्य सरकारने सन २०१२-१३ व २०१३-१४ या दोन वर्षांत ज्या शेतकऱ्यांचे पीककर्ज पुनर्गठन होऊ शकलेले नाही व त्यांचे कर्ज पुनर्गठन न झाल्याने सन २०१६ साठी बॅँकांनी ज्यांना अपात्र ठरविले आहे अशा शेतकऱ्यांसाठी कापसाचे बियाणे मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या मोफत बियाणांचा लाभ देण्यासाठी ज्या काही अटी, शर्ती ठरवून दिल्या आहेत, ते पाहता शासनाच्या मोफत बियाणाचा लाभ कोणीच घेऊ शकणार नाही, अशी परिस्थिती आहे. त्यात प्रामुख्याने ज्या शेतकऱ्यांना गेल्या वर्षी म्हणजेच २०१५ मध्ये खरीप हंगामाची दुष्काळाची मदत मिळालेली आहे, अशा शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार नाही. त्याचबरोबर याच हंगामात ज्या शेतकऱ्यांना पीकविमा नुकसानभरपाई मिळाली त्यांनाही यातून वगळण्यात आले आहे, तसेच ज्या शेतकऱ्यांना २०१६ च्या खरीप हंगामासाठी पीककर्ज मिळालेले असेल त्यांनाही मोफत बियाणे देता येणार नाही. याशिवाय राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना, राष्ट्रीय तेलबिया व तेलयाड अभियानांतर्गत केंद्र व राज्य सरकारचे अनुदान मिळालेले आहे असे शेतकरीही मोफत बियाणांना पात्र ठरणार नाही. नाशिक जिल्ह्णात गेल्या वर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे जिल्ह्णातील १६३३ गावांमधील पीक पैसेवारी पन्नास पैशाहून कमी आल्याने ही सर्व गावे दुष्काळसदृश जाहीर करण्यात आली व शासनाने त्यासाठी ३५६ कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. याचाच अर्थ जिल्ह्णातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांना शासनाची मदत पोहचती झालेली असल्यामुळे कृषी खात्याने मोफत कापूस बियाण्यासाठी ठरवून दिलेल्या निकषात एकही शेतकरी बसू शकत नाही. असे असताना महसूल खात्याने मात्र सर्व तालुक्यांना पत्र पाठवून या निकषात न बसू शकणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.