शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनासाठी मागविल्या १६३ गटांच्या हरकती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:12 IST

गतवर्षी केंद्र सरकारकडून मनमाड-इगतपुरी नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी येथील शेतकऱ्यांना नोटिसा प्राप्त झाल्यानंतर भूसंपादनास शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध झाला ...

गतवर्षी केंद्र सरकारकडून मनमाड-इगतपुरी नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी येथील शेतकऱ्यांना नोटिसा प्राप्त झाल्यानंतर भूसंपादनास शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध झाला होता. याबाबत शेतकऱ्यांमध्ये अजूनही नाराजीचे सूर उमटत असतानाच गेल्या १५ जून रोजी राज्य शासनाने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग (राज्यमार्ग विशेष -२) साठी पूर्व भागातील जमिनी संपादित करण्याची जारी केलेली अधिसूचना इगतपुरी-त्रयंबकेश्वरचे उपविभागीय अधिकारी तथा भूमि संपादन अधिकारी तेजस चव्हाण यांनी प्रसिद्धीमाध्यमात प्रकाशित केली आहे. त्यानुसार आजपासून २१ दिवसांच्या आत संपादित केल्या जाणाऱ्या शेतजमीन मालकाकडून स्वीकारल्या जाणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून अनेक तर्क वितर्क व्यक्त केले जात आहे. याबाबत अनेक शेतकरी भूमिहीन होणार असल्याने त्यांनी शासनाच्या या जुलमी भूसंपादन प्रक्रियेस जोरदार विरोध करणार असल्याचे सांगितले आहे.

इगतपुरी तालुक्यातील जवळपास ९० टक्के जमिनीपैकी ५४ हजार हेक्टर जमिनी याआधीच शासनाने विविध प्रकल्पांसाठी संपादित केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एकीकडे शासनस्तरावर शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या उपाययोजना अंमलात आणल्या जात असतांना दुसरीकडे शासन याच शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा घाट घालत असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले. व्हिटीसी फाटा ते साकूर हा रस्ता मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या जोड रस्त्याच्या कामासाठी ज्यांचे १६३ गट जाणार आहेत. त्या जमिनीचे भाव गगनाला भिडलेले असल्यामुळे आपापल्या शेतजमिनी संबंधित शेत मालक जमीन संपादनाच्या विरोधात आहेत. जर शासन बळजबरीने संपादन करणार असेल तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा साकूर येथील शेतकरी तुकाराम सहाणे यांनी दिला आहे.

"प्राथमिक माहितीनुसार २५० कोटी रुपयांचा हा समृद्धी महामार्गाला जोडणारा रस्ता आहे. या बांधकामावर १६२.७ कोटी रुपये खर्च होणार असून, उर्वरित खर्च भूसंपादनावर होणार आहे. या रस्त्यावर ४ मोठे पूल, ३ लहान पूल, तर ३७ पाइप मोऱ्या असून, दोन मोठे व १५ लहान चौक असणार आहे. या रस्त्यासाठी ४०.७३ हेक्टर जमिनीची गरज असून, पैकी २३.१३ हेक्टर जमीन उपलब्ध असून, १७.६० हेक्टर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. या रस्त्यामुळे घोटी-सिन्नर, नाशिक-मुंबई तसेच समृद्धी महामार्ग हे तीन महामार्ग एकमेकांना जोडले जाणार आहेत.

इन्फो...

गावनिहाय संपादित केले जाणारे गट

गावे गटांची संख्या

नांदूरवैद्य - ३२

बेलगाव कुऱ्हे -२४

गोंदे दुमाला - १०

वाडिवऱ्हे - ०३

कुऱ्हेगाव - ०२

साकूर - ६९

कोट...

आज साकूर ते व्हिटीसी फाटा दरम्यान होणाऱ्या समृद्धी महामार्ग जोडरस्त्यासाठी शासन शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करणार असून, या जमिनींचे दर गगनाला भिडले आहेत. सदर जमिनी प्रकल्पांसाठी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध कायम असून, शासनाने जबरदस्तीने शेतकऱ्यांकडून जमिनी संपादित केल्यास परिसरातील शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध केला जाऊन प्रसंगी आंदोलन केले जाईल.

- तुकाराम सहाणे, शेतकरी, साकूर

कोट...

सदर जमिनीत दारणा धरणाच्या पायथ्याशी मुलाचे छोटेसे हाॅटेल असून, दुसऱ्या ठिकाणी एसएमबीटी हॉस्पिटलला भाडेतत्त्वावर जमीन दिलेली आहे. या दोन जमिनींवर उदरनिर्वाह चालत असल्यामुळे जर ही शेवटची शिल्लक राहिलेली जमीनच अधिग्रहित होणार असल्यावर जगायचे कसे? असा प्रश्न उभा टाकला आहे.

- किसन सहाणे, माजी सैनिक, साकूर

फोटो - २५ समृद्धी

250721\25nsk_10_25072021_13.jpg

समृद्धी महामार्ग