शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

स्वराज्य हा नियोजनाचा वस्तुपाठ :  नितीन बानगुडे पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 00:18 IST

राजकारण केवळ दंडाच्या बळावर नव्हे तर बुद्धिचातुर्यावर करावे लागते हे साडेतीनशे वर्षांपूर्वी गनिमी काव्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवून दिले. नियोजन काय असते यांचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे शिवाजी महाराजांचे स्वराज्य होते, असे प्रतिपादन प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी केले.

देवळाली कॅम्प : राजकारण केवळ दंडाच्या बळावर नव्हे तर बुद्धिचातुर्यावर करावे लागते हे साडेतीनशे वर्षांपूर्वी गनिमी काव्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवून दिले. नियोजन काय असते यांचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे शिवाजी महाराजांचे स्वराज्य होते, असे प्रतिपादन प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी केले. देवळाली कॅम्प आठवडे बाजार मैदानावर शिवसेना व श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रा. बानगुडे पाटील म्हणाले की, छत्रपतींनी अठरा पगड जातींच्या लोकांना बरोबर घेऊन संघर्षातून सुराज्य स्थापन केले.शिवरायांनी पन्नास वर्षांत एकशेदहा किल्ले बांधले मात्र कोणत्याही किल्ल्याला स्वत:चे नाव दिले नाही. नियोजन हा शिवरायांचा स्थायिभाव होता म्हणूनच त्यांनी त्यांच्या सर्वाधिक लढाया रात्रीच्या वेळी लढल्या, असे त्यांनी सांगितले.यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, आमदार योगेश घोलप, युवराज गोडसे, आशा गोडसे, प्रभावती धिवरे, दिनकर पाळदे, चंद्रकांत गोडसे, संजय शिंदे, प्रमोद घुमरे, प्रकाश सुराणा, संजय गोडसे, प्रवीण पाळदे, भीमा अहेर आदी मान्यवर उपस्थित होते. शिवसेना विधानसभा संघटक हनुमंत देवकर यांनी अनाथ मुलीच्या विवाहासाठी ५० हजार रुपये मदत प्रा. बानगुडे यांच्या हस्ते देण्यात आली.जीवनगौरवने सन्मानितप्रा. बानगुडे पाटील यांच्या हस्ते महाराज बिरमानी, सदाशिव मोजाड, नामदेव गोडसे, बॅनर्जी वाघचौरे, रामचंद्र पाळदे, कौसल्या मुळाणे, डॉ. जगदीश कागदे, काशीनाथ पाळदे, शेखर पाटोळे, भाऊसाहेब मोजाड, हेमंत जोशी, संतोष जुंद्रे, वैष्णवी व प्रतीक्षा भालेराव, बाळासाहेब बोडके, राजेंद्र ठाकूर, गणेश करंजकर, ओंकार काळे, पवन बोरस्ते यांचा गौरव करण्यात आला.

टॅग्स :Nitin Banugade-Patilनितीन बानुगडे-पाटील