शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

लठ्ठपणा पूर्णपणे बरा करणे शक्य : जयश्री तोडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 01:43 IST

नाशिक : लठ्ठपणा हा शरीरासाठी धोकादायक असून, मागील दशकामध्ये लठ्ठपणा हा आजार असल्याचे सिद्ध झाले आहे.

ठळक मुद्देडॉक्टारांचे मार्गदर्शन आणि औषधोपचारासह योग्य आहार लठ्ठपणामध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर

नाशिक : लठ्ठपणा हा शरीरासाठी धोकादायक असून, मागील दशकामध्ये लठ्ठपणा हा आजार असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे वेळीच या आजारावर नियंत्रण मिळवणे आवश्यक असून, तज्ज्ञ डॉक्टारांचे मार्गदर्शन आणि औषधोपचारासह योग्य आहार आणि दैनंदिन सवयींमध्ये योग्य ते बदल घडवून आणल्यास लठ्ठपणावर पूर्णपणे मात करता येणे शक्य असल्याचे मत ओबेसिटी तज्ज्ञ डॉ. जयश्री तोडकर यांनी व्यक्त केले आहे. गोदाघाटावरील नाशिक वसंत व्याख्यानमालेत जयश्री तोडकर यांनी शुक्रवारी (दि. १८) अठरावे पुष्प गुंफले. दिवंगत उद्योजक रामनाथशेठ चांडक यांच्या स्मृतिप्रीत्यक्ष ‘करुया लठ्ठपणावर मात’ या विषयावर बोलताना तोडकर यांनी जगभरात साथीप्रमाणे फैलावत असलेल्या लठ्ठपणाविषयी माहिती देत त्यावरील उपचार व उपायांविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. लठ्ठपणामध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर असून, हा आजार साथीसारखा पसरत असल्याने लहान मुलांमधील लठ्ठपणामध्ये भारत पहिल्या क्रमांकाच्या दिशेने आगेकूच करीत असल्याचे त्यांनी सांगितले. विकसनशील व विकसित अशा दोन्ही देशांमध्येही ही समस्या दिसून येत आहे. एकेकाळी कुपोषित देश असलेल्या भारताला आता लठ्ठपणाने ग्रासले आहे. या आजाराविषयी जनजागृती निर्माण होण्याची गरज असून, ही एक चळवळ होणे गरजेचे असल्याचे मत डॉ. जयश्री तोडकर यांनी व्यक्त केले. त्यांनी माहितीपटाच्या माध्यमातून लठ्ठपणाग्रस्त व्यक्तींच्या समस्या व त्यांना येणाºया विविध अडचणींची माहिती दिली.