शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

आदिवासी लाभार्थींची वाढणार संख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 00:26 IST

नाशिक : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाºया आदिवासी योजनांसाठी आवश्यक असलेल्या जातप्रमाणपत्राचा अडथळा आता दूर झाला असून, केवळ जातीच्या दाखल्यावर त्यांना जिल्हा परिषदेच्या आदिवासी योजनांसाठी अर्ज करता येणार आहे. यामुळे यापुढील काळात आदिवासी विभागातील लाभार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जातप्रमाणपत्राच्या अटीमुळे लाभार्थींचे प्रमाण काहीसे कमी झाले होते.

ठळक मुद्देअडसर दूर : जातपडताळणीची अट शिथिलजिल्हा परिषदेच्या आदिवासी योजनांसाठी अर्ज करता येणार

नाशिक : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाºया आदिवासी योजनांसाठी आवश्यक असलेल्या जातप्रमाणपत्राचा अडथळा आता दूर झाला असून, केवळ जातीच्या दाखल्यावर त्यांना जिल्हा परिषदेच्या आदिवासी योजनांसाठी अर्ज करता येणार आहे. यामुळे यापुढील काळात आदिवासी विभागातील लाभार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जातप्रमाणपत्राच्या अटीमुळे लाभार्थींचे प्रमाण काहीसे कमी झाले होते.जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आदिवासींसाठी राबविण्यात येणाºया अनेक योजनांसाठी राज्य शासनाने जात प्रमाणपत्र पडताळणीची अट घातली होती. परंतु अनेकांकडे जात पडताळणीचे प्रमाणपत्रच उपलब्ध नसल्याने आदिवासी योजनांसाठीचे अर्ज करण्याचे प्रमाणे कमी झाले होते. या जाचक अटींमुळे आदिवासी बांधव योजनांपासून दुरावत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आदिवासी नेत्यांनी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा आणि मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतलीहोती.आदिवासी भागातील एस.सी, एस.टी. संवर्गातील नागरिकांना जातीचे दाखले देण्यात आले असले तरी जातप्रमाणपत्र पडताळणीचे दाखले केवळ निवडणूक आणि शैक्षणिक कामासाठीच देण्याची तरतूद आहे. त्यामुळे योजनांसाठी पडताळणीचे दाखलेच दिले जात नसल्याने आदिवासी बांधवांपुढे मोठी अडचण निर्माण झाली होती.शासनाच्या महत्त्वकांक्षी विहीर खोदण्याच्या योजनेसाठीही यामुळे अर्ज करण्याची संख्या अवघे दहा टक्के इतकीच होती. सदर बाब शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर आता जात प्रमाणपत्राची अट शिथिल करण्यात आली असून, तसा अद्यादेश शासनाने गेल्या शनिवारी काढला. त्यानुसार आता शाळा सोडल्याचा दाखला किंवा कुटुंबातील रक्ताच्या नात्यातील प्रमाणपत्र ग्राह्ण धरण्यात येणार आहे. त्यामुळे आदिवासी योजनेच्या मागील अडसर दूर झाल्याने यापुढील काळात योजनेसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. लाभार्थी वंचितजिल्हा परिषदेच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना विहीर बांधण्यासाठी देण्यात येणाºया आर्थिक लाभासाठी अर्ज केलेल्यांची प्रकरणे फेटाळण्यात आल्याने अनेकांचा हिरमोड झाला होता, तर प्रमाणपत्र योजनेच्या कामासाठी मिळत नसल्यानेदेखील मोठी अडचण निर्माण झाली होती. आता जात प्रमाणपत्राची अट शिथिल करण्यात आल्यामुळे योजनेपासून वंचित राहिलोल्यांना दिलासा मिळणार आहे. यापूर्वी या योजनेसाठी अर्ज केलेल्यांची प्रकरणेदेखील ग्राह्ण धरली जाणार आहेत.