शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
4
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
5
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
6
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
7
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
8
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
9
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
10
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
11
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
12
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
13
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
14
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
15
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
16
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
17
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
18
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
19
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
20
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त

चित्रकला परीक्षेसाठी विद्यार्थी संख्येत दुपटीने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:39 IST

दहावीच्या परीक्षेच्या निकालात चित्रकलेच्या ग्रेड परीक्षांचे गुण एकूण टक्केवारीत घेण्यात येणार असल्याच्या शासनाच्या निर्णयामुळे यावर्षीच्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षांना राज्यभरात दुपटीने विद्यार्थी संख्या वाढली असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी राज्यभरातून सुमारे चार लाख विद्यार्थी या परीक्षांना बसले होते, तर यावर्षी सुमारे सात लाख विद्यार्थी या परीक्षा देत असल्याची माहिती राज्य कला संचालनालयाचे प्रभारी परीक्षा नियंत्रक सुरेश पवार यांनी दिली.

साहेबराव अहिरे ।पाथर्डी फाटा : दहावीच्या परीक्षेच्या निकालात चित्रकलेच्या ग्रेड परीक्षांचे गुण एकूण टक्केवारीत घेण्यात येणार असल्याच्या शासनाच्या निर्णयामुळे यावर्षीच्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षांना राज्यभरात दुपटीने विद्यार्थी संख्या वाढली असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी राज्यभरातून सुमारे चार लाख विद्यार्थी या परीक्षांना बसले होते, तर यावर्षी सुमारे सात लाख विद्यार्थी या परीक्षा देत असल्याची माहिती राज्य कला संचालनालयाचे प्रभारी परीक्षा नियंत्रक सुरेश पवार यांनी दिली. राज्य शासन अलीकडे शिक्षण क्षेत्रात नवनवे प्रयोग करताना व तसे नियम करून ते अमलात आणताना दिसून येत आहे. अशातलाच एक प्रयोग म्हणजे चित्रकलेच्या ग्रेड परीक्षांचे गुण दहावीच्या एकूण टक्केवारीत ग्राह्य धरण्याचा आहे. मार्च २०१७ च्या परीक्षेत हा नियम लागू करण्यात आला होता. मात्र त्याच्या  मलबजावणीतल्या गोंधळामुळे पालक व विद्यार्थ्यांपर्यंत तो नीट पोहचला नाही. मात्र चालू शैक्षणिक वर्षात त्याची उपयुक्तता शिक्षक, शाळा, विद्यार्थी व पालकांच्या चांगलीच लक्षात आली आहे. चित्रकला विषयाच्या राज्य शासनाच्या कला संचालनालयामार्फत एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट अशा दोन परीक्षा घेतल्या जातात. त्यातील इंटरमिजिएट परीक्षेला विद्यार्थ्यांना सी ग्रेड मिळाल्यास पाच गुण, बी ग्रेड मिळाल्यास पंधरा गुण त्या विद्यार्थ्याच्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत मिळालेल्या एकूण गुणांमध्ये अधिकचे म्हणून मिळविले जाणार आहेत. ज्याचा फायदा विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढून पुढच्या शैक्षणिक प्रवेशासाठी होणार आहे. ही बाब लक्षात आल्याने यावर्षी सुमारे पंचेचाळीस टक्के अधिक विद्यार्थी राज्यभरातून या परीक्षांना प्रविष्ट झाले आहेत.  २१ सप्टेंबरपासून सदर परीक्षा राज्यभर सुरू झाली असून, रविवारी (दि.२४) परीक्षेचे शेवटचे पेपर होणार आहेत. अलीकडच्या काही वर्षांत दहावीच्या निकालात विद्यार्थ्यांची फुगलेली टक्केवारी पाहून व त्यावर सर्वत्र झालेली टीका लक्षात घेता शासनाने पुढील वर्षांपासून भाषा विषयाचे तोंडी परीक्षांचे शाळांकडे असलेले गुण रद्द करून पूर्ण शंभर गुणांची परीक्षा घेण्याचे धोरण अवलंबले आहे. मात्र दुसरीकडे चित्रकलेचे गुण ग्राह्य धरण्याच्या धोरणामुळे शासन या ना त्याप्रकारे विद्यार्थ्यांची टक्केवारी फुगविण्याचाच प्रयत्न करीत असल्याचा सवाल उपस्थित होत आहे.  एकीकडे चित्रकला विषयाच्या ग्रेड परीक्षांचे गुण दहावीच्या टक्केवारीत धरण्याचे धोरण राबविणे सुरू केल्याने चित्रकला शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये समाधान असले तरी त्या विषयाच्या तासिका कमी करण्यात आल्याने सर्वत्र नाराजीचे वातावरण आहे. शासन चित्रकलेच्या गुणांना व विषयाला महत्त्व देताना तासिका का कमी करताय हे मात्र गूढ आहे.