शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

सिन्नर तालुक्यात विविध गावांमध्ये घटतेय मोरांची संख्या पाण्यासाठी भटकंती : पाथरे बुद्रुक, मीरगाव, माळवाडी, वारेगावसह जांब नदीकाठावरील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 00:48 IST

पाथरे : मोर हा राष्ट्रीय पक्षी असून, त्याची काळजी घेणे आणि संवर्धन करणे ही आपलीही जबाबदारी आहे. अनेक दुर्मीळ पशू-पक्षी नामशेष होण्याच्या यादीत मोराचाही समावेश आहे.

पाथरे : मोर हा राष्ट्रीय पक्षी असून, त्याची काळजी घेणे आणि संवर्धन करणे ही आपलीही जबाबदारी आहे. अनेक दुर्मीळ पशू-पक्षी नामशेष होण्याच्या यादीत मोराचाही समावेश आहे. सिन्नर तालुक्यातील पाथरे बुद्रुक, मीरगाव, माळवाडी, वारेगाव परिसरात गवळण, धोधना, जांब नदीकाठावर मोरांच्या संख्येतही घट होत आहे. मोर विविध समस्यांच्या जाळ्यात अडकल्याचे चित्र या भागात पहावयास मिळत आहे. काही वर्षांपूर्वी या परिसरात मोरांची संख्या लक्षणीय होती. पर्यावरणाचा ºहास, झाडांची कत्तल, पाण्याचे दुर्भिक्ष, मानवाकडून शिकार होणे, भटक्या कुत्र्यांचे हल्ले अशा अनेक कारणांमुळे येथील मोरांच्या संख्येत घट होत आहे. एकीकडे विकास, तर दुसरीकडे नैसर्गिक संपत्तीचा ºहास असे चित्र सध्या येथे पहावयास मिळत आहे. मुळातच पावसाचे प्रमाण कमी आणि त्यातच पडलेल्या पावसाचे पाणी अडवण्यासाठीच्या उपाययोजना कमी यामुळे या वन्यजिवांना मुबलक पाणीसाठा उपलब्ध होत नाही. वन्यजीव रक्षणासाठी पाणीसाठे, वनतळे, अन्न नाही ना आश्रय ठिकाणे नाहीत. गेल्या काही वर्षांपासून तपमानात दिवसागणिक वाढ होत आहे. पाथरे येथील श्रीराम उपसा जलसिंचन योजना, वारेगाव उपसा जलसिंचन योजना, जयमल्हार उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून जेव्हा परिसरातील शेतीला आवर्तन कालव्याद्वारे पाणीपुरवठा होतो तेव्हा याकाळात मोरांना पाणी आणि गारवा मिळतो. परंतु इतर वेळेला मात्र उन्हातान्हात मोरांना भटकंती करायची वेळ येत आहे. अपुऱ्या जलसाठ्यामुळे, अन्नामुळे मोरांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे अनेक मोर मृत्युमुखी पडत आहेत. कुत्रे त्यांच्यावर हल्ला करतात तर कधी मानवी शिकार करणाºयांपासून त्यांना स्वत:चा बचाव करावा लागतो. पाण्याच्या कमतरतेमुळे मोरांची संख्या कमी होत आहे. यावर वनविभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.