शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सिन्नर तालुक्यात विविध गावांमध्ये घटतेय मोरांची संख्या पाण्यासाठी भटकंती : पाथरे बुद्रुक, मीरगाव, माळवाडी, वारेगावसह जांब नदीकाठावरील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 00:48 IST

पाथरे : मोर हा राष्ट्रीय पक्षी असून, त्याची काळजी घेणे आणि संवर्धन करणे ही आपलीही जबाबदारी आहे. अनेक दुर्मीळ पशू-पक्षी नामशेष होण्याच्या यादीत मोराचाही समावेश आहे.

पाथरे : मोर हा राष्ट्रीय पक्षी असून, त्याची काळजी घेणे आणि संवर्धन करणे ही आपलीही जबाबदारी आहे. अनेक दुर्मीळ पशू-पक्षी नामशेष होण्याच्या यादीत मोराचाही समावेश आहे. सिन्नर तालुक्यातील पाथरे बुद्रुक, मीरगाव, माळवाडी, वारेगाव परिसरात गवळण, धोधना, जांब नदीकाठावर मोरांच्या संख्येतही घट होत आहे. मोर विविध समस्यांच्या जाळ्यात अडकल्याचे चित्र या भागात पहावयास मिळत आहे. काही वर्षांपूर्वी या परिसरात मोरांची संख्या लक्षणीय होती. पर्यावरणाचा ºहास, झाडांची कत्तल, पाण्याचे दुर्भिक्ष, मानवाकडून शिकार होणे, भटक्या कुत्र्यांचे हल्ले अशा अनेक कारणांमुळे येथील मोरांच्या संख्येत घट होत आहे. एकीकडे विकास, तर दुसरीकडे नैसर्गिक संपत्तीचा ºहास असे चित्र सध्या येथे पहावयास मिळत आहे. मुळातच पावसाचे प्रमाण कमी आणि त्यातच पडलेल्या पावसाचे पाणी अडवण्यासाठीच्या उपाययोजना कमी यामुळे या वन्यजिवांना मुबलक पाणीसाठा उपलब्ध होत नाही. वन्यजीव रक्षणासाठी पाणीसाठे, वनतळे, अन्न नाही ना आश्रय ठिकाणे नाहीत. गेल्या काही वर्षांपासून तपमानात दिवसागणिक वाढ होत आहे. पाथरे येथील श्रीराम उपसा जलसिंचन योजना, वारेगाव उपसा जलसिंचन योजना, जयमल्हार उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून जेव्हा परिसरातील शेतीला आवर्तन कालव्याद्वारे पाणीपुरवठा होतो तेव्हा याकाळात मोरांना पाणी आणि गारवा मिळतो. परंतु इतर वेळेला मात्र उन्हातान्हात मोरांना भटकंती करायची वेळ येत आहे. अपुऱ्या जलसाठ्यामुळे, अन्नामुळे मोरांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे अनेक मोर मृत्युमुखी पडत आहेत. कुत्रे त्यांच्यावर हल्ला करतात तर कधी मानवी शिकार करणाºयांपासून त्यांना स्वत:चा बचाव करावा लागतो. पाण्याच्या कमतरतेमुळे मोरांची संख्या कमी होत आहे. यावर वनविभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.