शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

ग्रामीण भागात देशी गायींची संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 23:40 IST

ग्रामीण भागात गायी गव्हारे बंद झाल्याने गावरान (देशी) गायींची संख्या घटत चालली आहे. परिणामी शेतकामांसाठी बैलांची संख्या कमी होऊन शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होणार आहे. गोशाळेसह शेतकऱ्यांना गावरान गायी पालनासाठी शासकीय योजना सुरू करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.

ठळक मुद्देमालेगाव । गो-पालन योजना शासनाने सुरू करण्याची मागणी

अमृत कळमकर ।खडकी : ग्रामीण भागात गायी गव्हारे बंद झाल्याने गावरान (देशी) गायींची संख्या घटत चालली आहे. परिणामी शेतकामांसाठी बैलांची संख्या कमी होऊन शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होणार आहे. गोशाळेसह शेतकऱ्यांना गावरान गायी पालनासाठी शासकीय योजना सुरू करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेती हा नागरिकांचा मुख्य व्यवसाय आहे. बहुतांश रहिवास ग्रामीण भागात आहे. खेडी विकसित झाली तरच देशाच्या विकासाचा मंत्र महात्मा गांधींनी दिला आहे, मात्र खेडी व ग्रामीण भाग वाढत्या शहरीकरणामुळे ओस पडू लागली आहेत. रोजगार संधी उपलब्ध करून देणे, शेतीपूरक व्यवसायांना प्राधान्य दिले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती जैसे थे आहे.सांस्कृतिक वारसा लाभलेला ग्रामीण भाग जुन्या पद्धती विसरत असल्याने वडिलोपार्जित शेतीसारखा मोठी संपत्तीचा ठेवा आधारित व अंधातरीच राहताना दिसत आहे. ग्रामीण भागात शेती प्रमुख व्यवसाय असल्याने खेडी गजबजलेली दिसत होती. सायंकाळी रानातून गावाकडे येणारी गुरे आनंदाला भुरळ घालताना सध्या दिसत नाही.ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबाकडे किमान दहा जनावरे होती, त्यात ग्रामीण गायींची संख्या पाचच्यावर असे. गायी रानात नेऊन चारण्यासाठी गायक्या होता. गावातील एक-दोन तरुण आपला रोजगार व उदरनिर्वाहासाठी गायी चारत असे. गायींच्या शेणाची संपत्ती व राखाईत म्हणून धान्य मोबदला किंवा पैसे स्वरूपात मदत दिली जात असे, मात्र हे गुराखी गायकेच नसल्याने गायी पाळणे बंद झाले आहे. ग्रामीण भागातील अशा गुराख्यांना मानधनपर योजना सुरू करण्यासाठी संबंधित लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मोठ्या कुटुंबात गायीच्या दुधाची रेलचेल असल्याने भाजीची चिंता गृहिणींना जाणवत नसे, मात्र लहान बाळ व तरुणाई सुदृढ आरोग्यपूर्ण होती. यामुळे आरोग्यही फार तंदुरुस्त राहिलेले नाही. आरोग्याचे प्रश्न भेडसावत आहेत.सेंद्रिय शेतीचा ट्रेंड विकसित होत असला तरी त्यासाठी पूरक खते मात्र लोप पावत आहे. शेणखत सेंद्रीसाठी महत्त्वपूर्ण घटक आहे. शेतकºयांनी रासायनिक खतांचा वापर करून शेतीचा कस कमी झाला आहे. पोत सुधारण्यासाठी शेणखताची गरज मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. रासायनिक खतांना अनुदान देण्यापेक्षा गायीचे रान फुलविणे महत्त्वाचे आहे. फवारणीयुक्त भाजीपाला, अन्नधान्य, फळे, फुले यामुळे उत्पादन वाढले असले तरी त्याचे पोषणयुक्त घटक कमी झाले आहे. वाढते उत्पादन घातक औषधांनी आरोग्याला अपायकारक आहे. उत्पादन काढूनही आपले उत्पादन निर्यातक्षम बनविण्यासाठी रासायनिक खते व औषधे वापर कमी करून सेंद्रिय शेतीला प्राधान्य देण्यासाठी उपयुक्त जीव संवर्धन करून त्यांचे पोषण करणे शेती जिवंत ठेवण्यासाठी फलदायी ठरणार आहे. दुग्ध व्यवसाय विकसित होत असला तरी जर्सी गायींना प्राधान्य योजना सुरू आहे, मात्र गायींचा उपयोग फक्त दुधासाठीच होत आहे.गायीच्या दुधाला वाढती मागणीग्रामीण भागात गावरान गायींचे दूध व शेणखताला मोठ्या प्रमाणात मागणी असते. रानात गावरान गायींचा वावर मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकºयांनी वावर ही शेतीची कल्पना अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे, तरच शेती व माती वाचणार आहे. गावरान गायीच्या राखामुळे गुराख्यांना रोजगार मिळणार आहे. तसेच सेंद्रिय शेतीमुळे प्रोत्साहन मिळून भविष्यातील आरोग्याचे प्रश्न सुटून तरुणांची सुदृढता वाढणार आहे.

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचार