शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

ग्रामीण भागात देशी गायींची संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 23:40 IST

ग्रामीण भागात गायी गव्हारे बंद झाल्याने गावरान (देशी) गायींची संख्या घटत चालली आहे. परिणामी शेतकामांसाठी बैलांची संख्या कमी होऊन शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होणार आहे. गोशाळेसह शेतकऱ्यांना गावरान गायी पालनासाठी शासकीय योजना सुरू करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.

ठळक मुद्देमालेगाव । गो-पालन योजना शासनाने सुरू करण्याची मागणी

अमृत कळमकर ।खडकी : ग्रामीण भागात गायी गव्हारे बंद झाल्याने गावरान (देशी) गायींची संख्या घटत चालली आहे. परिणामी शेतकामांसाठी बैलांची संख्या कमी होऊन शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होणार आहे. गोशाळेसह शेतकऱ्यांना गावरान गायी पालनासाठी शासकीय योजना सुरू करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेती हा नागरिकांचा मुख्य व्यवसाय आहे. बहुतांश रहिवास ग्रामीण भागात आहे. खेडी विकसित झाली तरच देशाच्या विकासाचा मंत्र महात्मा गांधींनी दिला आहे, मात्र खेडी व ग्रामीण भाग वाढत्या शहरीकरणामुळे ओस पडू लागली आहेत. रोजगार संधी उपलब्ध करून देणे, शेतीपूरक व्यवसायांना प्राधान्य दिले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती जैसे थे आहे.सांस्कृतिक वारसा लाभलेला ग्रामीण भाग जुन्या पद्धती विसरत असल्याने वडिलोपार्जित शेतीसारखा मोठी संपत्तीचा ठेवा आधारित व अंधातरीच राहताना दिसत आहे. ग्रामीण भागात शेती प्रमुख व्यवसाय असल्याने खेडी गजबजलेली दिसत होती. सायंकाळी रानातून गावाकडे येणारी गुरे आनंदाला भुरळ घालताना सध्या दिसत नाही.ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबाकडे किमान दहा जनावरे होती, त्यात ग्रामीण गायींची संख्या पाचच्यावर असे. गायी रानात नेऊन चारण्यासाठी गायक्या होता. गावातील एक-दोन तरुण आपला रोजगार व उदरनिर्वाहासाठी गायी चारत असे. गायींच्या शेणाची संपत्ती व राखाईत म्हणून धान्य मोबदला किंवा पैसे स्वरूपात मदत दिली जात असे, मात्र हे गुराखी गायकेच नसल्याने गायी पाळणे बंद झाले आहे. ग्रामीण भागातील अशा गुराख्यांना मानधनपर योजना सुरू करण्यासाठी संबंधित लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मोठ्या कुटुंबात गायीच्या दुधाची रेलचेल असल्याने भाजीची चिंता गृहिणींना जाणवत नसे, मात्र लहान बाळ व तरुणाई सुदृढ आरोग्यपूर्ण होती. यामुळे आरोग्यही फार तंदुरुस्त राहिलेले नाही. आरोग्याचे प्रश्न भेडसावत आहेत.सेंद्रिय शेतीचा ट्रेंड विकसित होत असला तरी त्यासाठी पूरक खते मात्र लोप पावत आहे. शेणखत सेंद्रीसाठी महत्त्वपूर्ण घटक आहे. शेतकºयांनी रासायनिक खतांचा वापर करून शेतीचा कस कमी झाला आहे. पोत सुधारण्यासाठी शेणखताची गरज मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. रासायनिक खतांना अनुदान देण्यापेक्षा गायीचे रान फुलविणे महत्त्वाचे आहे. फवारणीयुक्त भाजीपाला, अन्नधान्य, फळे, फुले यामुळे उत्पादन वाढले असले तरी त्याचे पोषणयुक्त घटक कमी झाले आहे. वाढते उत्पादन घातक औषधांनी आरोग्याला अपायकारक आहे. उत्पादन काढूनही आपले उत्पादन निर्यातक्षम बनविण्यासाठी रासायनिक खते व औषधे वापर कमी करून सेंद्रिय शेतीला प्राधान्य देण्यासाठी उपयुक्त जीव संवर्धन करून त्यांचे पोषण करणे शेती जिवंत ठेवण्यासाठी फलदायी ठरणार आहे. दुग्ध व्यवसाय विकसित होत असला तरी जर्सी गायींना प्राधान्य योजना सुरू आहे, मात्र गायींचा उपयोग फक्त दुधासाठीच होत आहे.गायीच्या दुधाला वाढती मागणीग्रामीण भागात गावरान गायींचे दूध व शेणखताला मोठ्या प्रमाणात मागणी असते. रानात गावरान गायींचा वावर मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकºयांनी वावर ही शेतीची कल्पना अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे, तरच शेती व माती वाचणार आहे. गावरान गायीच्या राखामुळे गुराख्यांना रोजगार मिळणार आहे. तसेच सेंद्रिय शेतीमुळे प्रोत्साहन मिळून भविष्यातील आरोग्याचे प्रश्न सुटून तरुणांची सुदृढता वाढणार आहे.

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचार