शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

गणेशोत्सवात मंडळांची संख्या घटली

By admin | Updated: September 6, 2016 01:07 IST

पाथर्डी फाटा परिसर : पोलिसांच्या कारवाईची कार्यकर्त्यांना भीती

पाथर्डी फाटा : परिसरात यावर्षी पोलिसांच्या ताठर आणि कठोर भूमिकेमुळे गणेशोत्सवात मंडळांची संख्या कमी झाल्याचे पहायला मिळत असून, गल्ली-बोळातली लहान- मोठी मंडळे कारवाईच्या धास्तीने गायब झाल्याचे चित्र आहे. याचा गणेशोत्सव शांततेत पार पडण्यासारखा चांगला परिणाम होणार असला तरी अनेक लहान मुलांची छोटी-छोटी मंडळे आणि काही कार्यकर्ते एकत्र येऊन एखादा उत्सव साजरा करताना पोलिसी कारवाईच्या भीतीने नाराज झाल्याचे समोर आले आहे. मनपा निवडणुकीच्या तोंडावर साजरा होणारा गणेशोत्सव खरे तर अधिक उत्साहात, धामधुमीत व मंडळांच्या संख्येत वाढ होऊन साजरा होईल, असे सामान्य नागरिकांना वाटत होते. काहींनी तशी तयारीही सुरू केली होती. मात्र उत्साहापूर्वी ठिकठिकाणी पोलिसांनी घेतलेल्या बैठका, त्यात मांडलेली भूमिका आणि त्यांच्या माध्यमांमधून आलेले वृत्त याचा अर्थ लावताना आपल्यावरही एखाद्या नजरचुकीने झालेल्या चुकीमुळे पोलिसांचा ससेमिरा मागे लागेल की काय ? या धास्तीने अनेकांनी या भानगडीत पडण्याचे टाळले आहे. उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांचा धाक आवश्यक असला तरी त्याचा अतिरेक होणे ही बाब चांगली नसल्याची चर्चा दबक्या आवाजात सर्वत्र ऐकायला मिळत आहे. रोज माध्यमांमधून जाहीर होणारी पोलिसांची नियमावली गणेशोत्सवासाठी कटकटीची असल्याच्या प्रतिक्रि या व्यक्त केल्या जात आहेत.या नियमावली व त्यांच्या अंमलबजावणीविषयी गणेश मंडळांचे व इतर छोट्या-छोट्या ग्रुप्सचे कार्यकर्ते जाणकारांकडे व माध्यम प्रतिनिधींकडे चौकशी करताना दिसून येतात. परिणामी प्रामाणिकपणे व शांततेत उत्सव साजरे करू इच्छिणाऱ्यांचा उत्साह व तयारीला पोलिसांच्या सध्याच्या अति ताठर भूमिकेमुळे ब्रेक लागल्याचे वातावरण प्रभाग क्र . ५२ मध्ये पहायला मिळत आहे. जी मंडळे उपद्रवी आहेत किंवा ज्यांच्याविषयी तक्र ारी आहेत त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावीच मात्र कायद्याच्या अतिरेकी धाकात सोसायट्या, गल्ल्यांमधील मुलं, महिलांच्या छोट्या-छोट्या उत्सवाला असा प्रतिबंध करणे योग्य नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.