शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

आता आमचा जथ्था निघालाय, भुकेचे बॅनर खांद्यावर घेऊन

By admin | Updated: September 25, 2016 01:03 IST

मोर्चा : मराठा समाजाच्या स्थितीचे कवितेतून वर्णन

नाशिक : येथील तपोवन पासून निघालेल्या मराठा क्रांती मोर्चामध्ये विविध व्यावसायिकांबरोबरच समाजातील साहित्यिकांनी आपला सहभाग नोंदविला़ केवळ सहभाग नोंदवून हे साहित्यिक थांबले नाहीत तर त्यांनी आपल्या प्रसंगाला साजेशा कवितांद्वारे शेतकरी व मराठा समाजातील वेदनांना वाट मोकळी करून दिली़ आता आमच्या डोक्यात, पुस्तकं पेटवतायत मशालीउडीद, कुळीद पेरला वावरात, तरी क्रांतीचीच उगवतात गाणीगळून पडताय हातातले टाळ, मुठी होताय भालेनासलेल्या रक्ताचे कदाचित, उद्या वाहतील नदी-नालेआता आमचा जथ्था निघालाय, भुकेचे बॅनर खांद्यावर घेऊनदिल्लीच्या तख्ताला आव्हान द्यायलाफास घेऊन मरण्यापेक्षा, लढता-लढता सरणावर जायला़़़!- कवी संदीप जगताप यांनी आपल्या भुईभोग या कवितासंग्रहातील ‘जथ्था’ ही प्रसंगानुरूप कविता सादरकेली़ त्यानंतर लासलगाव येथील कवी प्रशांत केंदळे यांनी मराठा समाजातील आर्थिक स्थिती नाजूक असलेल्या गरीब कुणबी शेतकऱ्याची व्यथा मांडली़ त्यामध्ये एकीकडे बापजाद्याची दौलत नाही, तर दुसरीकडे सधनतेचा शिक्का असल्याने आरक्षणही मिळत नाही़ जो कुणबी दिवस-रात्र शेतामध्ये घाम गाळतो, मातीला फुलवतो त्याला न्याय कधी मिळणार असा सवाल त्यांनी पुढील कवितेतून केला़ ‘त्याच्या बापजाद्याची नव्हती अशी काही दौलतअन् त्याच्या जातीलाही मिळत नव्हती सवलत सांगा कधी न्याय मिळेल,कुणब्याच्या जातीलाज्याने घाम गाळला, फुलवलं या मातीला!’चांदवड येथील कवी विष्णू थोरे यांनी आपल्या कवितेतून शेतकरी आत्महत्त्येवर प्रकाशझोत टाकला़ अन्नदाता शेतकरी हा आत्महत्त्या करू लागलाय तर त्याच्या मरणावर टपलेल्या सरकारी यंत्रणा, सावकार अन् सरकार यासारखे लाखो दलाल इथे तयार झाल्याचे त्यांनी आपल्या कवितेतून सांगितले़ ‘कुणी जुंपले हे आत्महत्त्येचे घोडेआमचेच टांगे उलाल झालेआमच्या मरणावर टपलेलेलाखो इथे दलाल झाले’तपोवनापासून लाखोंच्या संख्येने निघालेल्या या मराठा मूक मोर्चात रवींद्र मालुंजकर, राजेंद्र सोमवंशी, सयाजी पगार, राजेंद्र उगले आदी कवीदेखील सहभागी झाले होते़ (प्रतिनिधी)