शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

तीन रेल्वेंमध्ये आता नाशिकचे पाणी भरणार

By admin | Updated: December 5, 2015 23:52 IST

मनमाडला टंचाई : पंचवटी, गोदावरी नाशिकरोडला थांबणार

मनोज मालपाणी,नाशिकरोडमनमाडला पाणीपुरवठा करणाऱ्या पालखेड धरणात पुरेसा पाणी साठा शिल्लक नसल्यामुळे मनमाडहून मुंबईला जाणाऱ्या राज्यराणी, पंचवटी व गोदावरी एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी नाशिकरोड रेल्वेस्थानकातून शुक्रवारपासून भरण्यास सुरुवात करण्यात आली आहे. कुंभमेळ्यात नवीन प्लॅटफॉर्म क्रमांक ४ येथे रेल्वेमध्ये पाणी भरण्याची सोय करण्यात आल्याने त्याचा फायदा झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यातदेखील आतापासूनच पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. कमी प्रमाणात पाऊस झाल्याने सर्वांनाच आतापासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. मनमाड परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या पालखेड धरणात पुरेसा पाणी साठा शिल्लक नसल्यामुळे पाणीकपातीचे धोरण सुरू करण्यात आले आहे. त्याचा फटका मनमाड रेल्वे स्थानकालादेखील बसण्यास सुरुवात झाली आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकरोड रेल्वेस्थानकात रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म ३ व ४ रेल्वे लाइनमध्ये रेल्वेच्या डब्यात पाणी भरण्याची पाइपलाइनची कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण केली आहे. मनमाड रेल्वेस्थानकालादेखील पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असल्याने रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार शुक्रवारी सकाळपासून मनमाडहून सुटणाऱ्या व मुंबईला जाणाऱ्या राज्यराणी, पंचवटी व गोदावरी एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांकरिता पिण्याचे पाणी नाशिकरोड रेल्वेस्थानकात भरण्यास प्रारंभ झाला आहे. नाशिकचे पिण्याचे पाणी हे रेल्वेमधील प्रवाशांना पिण्याबरोबर व रेल्वेतील शौचालयातदेखील वापरले जाणार आहे.

मनमाड रेल्वेस्थानकावर आतापासूनच पाणीकपात करण्यात आल्याने आणखी पाच-सहा महिने मेपर्यंत नाशिकरोड रेल्वेस्थानकावर राज्यराणी, पंचवटी, गोदावरी एक्स्प्रेसमध्ये पाणी भरले जाणार आहे. आगामी काही दिवसांनंतर पालखेड धरणातून जादा प्रमाणात पाणीकपात करण्यास सुरुवात केली तर रेल्वे प्रशासन आणखी काही रेल्वेंना नाशिकरोड रेल्वेस्थानकातून पाणी भरण्याची व्यवस्था करेल. त्यामुळे नाशिककरांना थोड्या जादा प्रमाणात पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रेल्वे प्रवासी, प्रशासन व नाशिककरांनीदेखील पाणी बचतीची काळजी आतापासूनच गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.