शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

तीन रेल्वेंमध्ये आता नाशिकचे पाणी भरणार

By admin | Updated: December 5, 2015 23:52 IST

मनमाडला टंचाई : पंचवटी, गोदावरी नाशिकरोडला थांबणार

मनोज मालपाणी,नाशिकरोडमनमाडला पाणीपुरवठा करणाऱ्या पालखेड धरणात पुरेसा पाणी साठा शिल्लक नसल्यामुळे मनमाडहून मुंबईला जाणाऱ्या राज्यराणी, पंचवटी व गोदावरी एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी नाशिकरोड रेल्वेस्थानकातून शुक्रवारपासून भरण्यास सुरुवात करण्यात आली आहे. कुंभमेळ्यात नवीन प्लॅटफॉर्म क्रमांक ४ येथे रेल्वेमध्ये पाणी भरण्याची सोय करण्यात आल्याने त्याचा फायदा झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यातदेखील आतापासूनच पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. कमी प्रमाणात पाऊस झाल्याने सर्वांनाच आतापासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. मनमाड परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या पालखेड धरणात पुरेसा पाणी साठा शिल्लक नसल्यामुळे पाणीकपातीचे धोरण सुरू करण्यात आले आहे. त्याचा फटका मनमाड रेल्वे स्थानकालादेखील बसण्यास सुरुवात झाली आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकरोड रेल्वेस्थानकात रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म ३ व ४ रेल्वे लाइनमध्ये रेल्वेच्या डब्यात पाणी भरण्याची पाइपलाइनची कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण केली आहे. मनमाड रेल्वेस्थानकालादेखील पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असल्याने रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार शुक्रवारी सकाळपासून मनमाडहून सुटणाऱ्या व मुंबईला जाणाऱ्या राज्यराणी, पंचवटी व गोदावरी एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांकरिता पिण्याचे पाणी नाशिकरोड रेल्वेस्थानकात भरण्यास प्रारंभ झाला आहे. नाशिकचे पिण्याचे पाणी हे रेल्वेमधील प्रवाशांना पिण्याबरोबर व रेल्वेतील शौचालयातदेखील वापरले जाणार आहे.

मनमाड रेल्वेस्थानकावर आतापासूनच पाणीकपात करण्यात आल्याने आणखी पाच-सहा महिने मेपर्यंत नाशिकरोड रेल्वेस्थानकावर राज्यराणी, पंचवटी, गोदावरी एक्स्प्रेसमध्ये पाणी भरले जाणार आहे. आगामी काही दिवसांनंतर पालखेड धरणातून जादा प्रमाणात पाणीकपात करण्यास सुरुवात केली तर रेल्वे प्रशासन आणखी काही रेल्वेंना नाशिकरोड रेल्वेस्थानकातून पाणी भरण्याची व्यवस्था करेल. त्यामुळे नाशिककरांना थोड्या जादा प्रमाणात पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रेल्वे प्रवासी, प्रशासन व नाशिककरांनीदेखील पाणी बचतीची काळजी आतापासूनच गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.