शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

आता धास्ती अंदाजपत्रकीय समितीच्या अहवालाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:17 IST

नाशिक : तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आलेल्या राज्य विधीमंडळाच्या अंदाजपत्रक समितीचे सदस्य शुक्रवारी सकाळी रवाना झाले असले, तरी शासकीय ...

नाशिक : तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आलेल्या राज्य विधीमंडळाच्या अंदाजपत्रक समितीचे सदस्य शुक्रवारी सकाळी रवाना झाले असले, तरी शासकीय कार्यालयांना समितीच्या अहवालाची धास्ती निर्माण झाली आहे. या दौऱ्यानंतर समिती विधीमंडळाला अहवाल सादर करणार असल्याने सर्वच शासकीय यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत. गेल्या बुधवारी सकाळी समिती सदस्य नाशिकमध्ये दाखल झाले होते. या तीनदिवसीय दौऱ्यात समितीने अनेक शासकीय कार्यालयांचा आढावा घेत झाडाझडती केली तर काही शासकीय कार्यालयांना प्रत्यक्ष भेट देत गंभीर स्वरुपाचे आक्षेप नोंदविल्यामुळे समिती कशाप्रकारे अहवाल सादर करू शकेल, याविषयीची धास्ती शासकीय कार्यालयांमध्ये दिसून आली.

शासकीय विश्रामगृहात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत समितीने अनेक आक्षेपार्ह कामांवर बोट ठेवत अधिकाऱ्यांच्या कामकाजाच्या पद्धतीवर ताशेरे ओढले तर केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीचा विनियोग करताना शासकीय कार्यालयांकडून अनावश्यक कामे घुसविल्याने स्पष्ट शब्दात नाराजीदेखील व्यक्त केली होती. विशेषत: स्मार्ट सिटीची कामे करताना मोठ्या प्रमाणात अवैध गौणखनिज उत्खनन झाल्याचा ठपका समितीने ठेवला आहे. त्यामुळे शासनाचे उत्पन्न बुडाले असल्याने याची गंभीर दखल घेण्यात आली आहे.

स्मार्ट सिटी अंतर्गत झालेली कामे खरोखरच स्मार्ट झाली आहेत का? असा प्रश्न समितीने उपस्थित करून अनेक कामांचा आढावा घेताना कामातील अनियमितता समोर आणली. स्मार्ट सिटीच्या कामांची रुपरेषा तसेच कागदपत्रांची छाननी समितीने केली असल्याने व उघडपणे दाखवलेल्या नाराजीमुळे स्मार्ट सिटीचे अधिकारीदेखील चिंतेत सापडले आहेत.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, उपनिबंधक कार्यालयातील कागदपत्रांची केेलेली पडताळणी तसेच ठक्करबाप्पा योजनेवरही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. जिल्ह्यात सुरू असलेली कामे आणि अपूर्ण योजनांबाबत सुरू असलेल्या कार्यवाहीबाबत समिती सदस्यांची चांगलीच झाडाझडती घेतली असल्याने समिती विधीमंडळाकडे सादर करणाऱ्या अहवालाबाबत शासकीय अधिकाऱ्यांना धास्ती वाटत आहे. दरम्यान, समितीकडे काही स्थानिक लोकप्रतिनिधींनी मतदार यादीतील दुबार नावांची तक्रारदेखील केली असल्याने हा सर्वात संवेदनशील मुद्दा समितीपुढे आला आहे. त्यामुळे याबाबत काय अभिप्राय दिला जातो, याबाबतही शासकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

--इन्फो--

सकाळी १० वाजताच रवाना

दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार असल्याने या बैठकीकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, सकाळी दाखल झालेली समिती अवघ्या तासभराच्या आतच रवाना झाली. बैठकीचा औपचारिक समारोप झाल्यानंतर विधीमंडळाचे सदस्य मुंबईकडे रवाना झाले.