शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
4
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
5
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
6
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
7
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
8
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
9
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
10
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
11
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
12
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
13
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
14
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
15
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
16
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
17
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
18
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
19
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
20
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका

आता धास्ती अंदाजपत्रकीय समितीच्या अहवालाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:17 IST

नाशिक : तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आलेल्या राज्य विधीमंडळाच्या अंदाजपत्रक समितीचे सदस्य शुक्रवारी सकाळी रवाना झाले असले, तरी शासकीय ...

नाशिक : तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आलेल्या राज्य विधीमंडळाच्या अंदाजपत्रक समितीचे सदस्य शुक्रवारी सकाळी रवाना झाले असले, तरी शासकीय कार्यालयांना समितीच्या अहवालाची धास्ती निर्माण झाली आहे. या दौऱ्यानंतर समिती विधीमंडळाला अहवाल सादर करणार असल्याने सर्वच शासकीय यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत. गेल्या बुधवारी सकाळी समिती सदस्य नाशिकमध्ये दाखल झाले होते. या तीनदिवसीय दौऱ्यात समितीने अनेक शासकीय कार्यालयांचा आढावा घेत झाडाझडती केली तर काही शासकीय कार्यालयांना प्रत्यक्ष भेट देत गंभीर स्वरुपाचे आक्षेप नोंदविल्यामुळे समिती कशाप्रकारे अहवाल सादर करू शकेल, याविषयीची धास्ती शासकीय कार्यालयांमध्ये दिसून आली.

शासकीय विश्रामगृहात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत समितीने अनेक आक्षेपार्ह कामांवर बोट ठेवत अधिकाऱ्यांच्या कामकाजाच्या पद्धतीवर ताशेरे ओढले तर केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीचा विनियोग करताना शासकीय कार्यालयांकडून अनावश्यक कामे घुसविल्याने स्पष्ट शब्दात नाराजीदेखील व्यक्त केली होती. विशेषत: स्मार्ट सिटीची कामे करताना मोठ्या प्रमाणात अवैध गौणखनिज उत्खनन झाल्याचा ठपका समितीने ठेवला आहे. त्यामुळे शासनाचे उत्पन्न बुडाले असल्याने याची गंभीर दखल घेण्यात आली आहे.

स्मार्ट सिटी अंतर्गत झालेली कामे खरोखरच स्मार्ट झाली आहेत का? असा प्रश्न समितीने उपस्थित करून अनेक कामांचा आढावा घेताना कामातील अनियमितता समोर आणली. स्मार्ट सिटीच्या कामांची रुपरेषा तसेच कागदपत्रांची छाननी समितीने केली असल्याने व उघडपणे दाखवलेल्या नाराजीमुळे स्मार्ट सिटीचे अधिकारीदेखील चिंतेत सापडले आहेत.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, उपनिबंधक कार्यालयातील कागदपत्रांची केेलेली पडताळणी तसेच ठक्करबाप्पा योजनेवरही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. जिल्ह्यात सुरू असलेली कामे आणि अपूर्ण योजनांबाबत सुरू असलेल्या कार्यवाहीबाबत समिती सदस्यांची चांगलीच झाडाझडती घेतली असल्याने समिती विधीमंडळाकडे सादर करणाऱ्या अहवालाबाबत शासकीय अधिकाऱ्यांना धास्ती वाटत आहे. दरम्यान, समितीकडे काही स्थानिक लोकप्रतिनिधींनी मतदार यादीतील दुबार नावांची तक्रारदेखील केली असल्याने हा सर्वात संवेदनशील मुद्दा समितीपुढे आला आहे. त्यामुळे याबाबत काय अभिप्राय दिला जातो, याबाबतही शासकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

--इन्फो--

सकाळी १० वाजताच रवाना

दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार असल्याने या बैठकीकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, सकाळी दाखल झालेली समिती अवघ्या तासभराच्या आतच रवाना झाली. बैठकीचा औपचारिक समारोप झाल्यानंतर विधीमंडळाचे सदस्य मुंबईकडे रवाना झाले.