शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
2
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
3
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
4
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
5
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
6
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
7
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
8
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
9
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
10
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम
11
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
12
Sex Education: १० वर्षांखालील मुलांना लैंगिक शिक्षणाची माहिती किती आणि कशी द्यावी? 
13
"माझी पत्नी सापडली का?" पोलिसांना रोज विचारायचा; स्वत:च रचलेला हत्येचा भयंकर कट अन्...
14
"पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच घात केला, काही नवीन नाही"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
15
मुंबईच्या नालासोपारा स्टेशनवर लोकलची वाट पाहत उभे होते 'हे' सेलिब्रिटी, ओळखलंत का?
16
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
17
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
18
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
19
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
20
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे

आता धास्ती अंदाजपत्रकीय समितीच्या अहवालाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:17 IST

नाशिक : तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आलेल्या राज्य विधीमंडळाच्या अंदाजपत्रक समितीचे सदस्य शुक्रवारी सकाळी रवाना झाले असले, तरी शासकीय ...

नाशिक : तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आलेल्या राज्य विधीमंडळाच्या अंदाजपत्रक समितीचे सदस्य शुक्रवारी सकाळी रवाना झाले असले, तरी शासकीय कार्यालयांना समितीच्या अहवालाची धास्ती निर्माण झाली आहे. या दौऱ्यानंतर समिती विधीमंडळाला अहवाल सादर करणार असल्याने सर्वच शासकीय यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत. गेल्या बुधवारी सकाळी समिती सदस्य नाशिकमध्ये दाखल झाले होते. या तीनदिवसीय दौऱ्यात समितीने अनेक शासकीय कार्यालयांचा आढावा घेत झाडाझडती केली तर काही शासकीय कार्यालयांना प्रत्यक्ष भेट देत गंभीर स्वरुपाचे आक्षेप नोंदविल्यामुळे समिती कशाप्रकारे अहवाल सादर करू शकेल, याविषयीची धास्ती शासकीय कार्यालयांमध्ये दिसून आली.

शासकीय विश्रामगृहात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत समितीने अनेक आक्षेपार्ह कामांवर बोट ठेवत अधिकाऱ्यांच्या कामकाजाच्या पद्धतीवर ताशेरे ओढले तर केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीचा विनियोग करताना शासकीय कार्यालयांकडून अनावश्यक कामे घुसविल्याने स्पष्ट शब्दात नाराजीदेखील व्यक्त केली होती. विशेषत: स्मार्ट सिटीची कामे करताना मोठ्या प्रमाणात अवैध गौणखनिज उत्खनन झाल्याचा ठपका समितीने ठेवला आहे. त्यामुळे शासनाचे उत्पन्न बुडाले असल्याने याची गंभीर दखल घेण्यात आली आहे.

स्मार्ट सिटी अंतर्गत झालेली कामे खरोखरच स्मार्ट झाली आहेत का? असा प्रश्न समितीने उपस्थित करून अनेक कामांचा आढावा घेताना कामातील अनियमितता समोर आणली. स्मार्ट सिटीच्या कामांची रुपरेषा तसेच कागदपत्रांची छाननी समितीने केली असल्याने व उघडपणे दाखवलेल्या नाराजीमुळे स्मार्ट सिटीचे अधिकारीदेखील चिंतेत सापडले आहेत.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, उपनिबंधक कार्यालयातील कागदपत्रांची केेलेली पडताळणी तसेच ठक्करबाप्पा योजनेवरही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. जिल्ह्यात सुरू असलेली कामे आणि अपूर्ण योजनांबाबत सुरू असलेल्या कार्यवाहीबाबत समिती सदस्यांची चांगलीच झाडाझडती घेतली असल्याने समिती विधीमंडळाकडे सादर करणाऱ्या अहवालाबाबत शासकीय अधिकाऱ्यांना धास्ती वाटत आहे. दरम्यान, समितीकडे काही स्थानिक लोकप्रतिनिधींनी मतदार यादीतील दुबार नावांची तक्रारदेखील केली असल्याने हा सर्वात संवेदनशील मुद्दा समितीपुढे आला आहे. त्यामुळे याबाबत काय अभिप्राय दिला जातो, याबाबतही शासकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

--इन्फो--

सकाळी १० वाजताच रवाना

दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार असल्याने या बैठकीकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, सकाळी दाखल झालेली समिती अवघ्या तासभराच्या आतच रवाना झाली. बैठकीचा औपचारिक समारोप झाल्यानंतर विधीमंडळाचे सदस्य मुंबईकडे रवाना झाले.