शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

आता मनपाच्या उद्यानात होणार सेंद्रिय खत प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:19 IST

महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सोमवारी (दि. २९) यासंदर्भात आदेश दिले. स्वच्छ शहर सर्वेक्षणांतर्गत नाशिक शहराने आता स्पर्धेची तयारी ...

महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सोमवारी (दि. २९) यासंदर्भात आदेश दिले. स्वच्छ शहर सर्वेक्षणांतर्गत नाशिक शहराने आता स्पर्धेची तयारी सुरू केली आहे. यात प्रशासनाने कमीत कमी कचरा खत प्रकल्पावर यावा, यासाठी लोकसहभागातून घरगुती कचऱ्याचे निर्मूलन करण्यावर भर देण्यात येत आहे. कारखाने, हॉटेल आणि मोठ्या गृहनिर्माण संस्थांना अगोदरच अशाप्रकारे सेंद्रिय खत तयार करणे सक्तीचेच आहे. मात्र, अन्य ठिकाणी देखील अशाच प्रकारे आहे त्याच ठिकाणी पालपाचोळा आणि कचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार करण्यात येऊ शकते. नाशिकमध्ये अनेक नागरिक अशाप्रकारचे खत प्रकल्प तयार केले आहेत.

नाशिक महापालिकेच्या उद्यानात देखील अशाप्रकारे प्रत्येक उद्यानात सेंद्रिय खत तयार करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. नाशिकमध्ये महापालिकेची सुमारे साडेचारशे उद्याने आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात पालपाचोळा पडतो. तो घंटागाडीतून पाथर्डी शिवारात खत प्रकल्पावर नेऊन तेथे प्रक्रिया केली जाते. मात्र, आता आयुक्तांनी उद्यानातच खत प्रकल्प राबवण्याची सूचना केली आहे. सध्या चार उद्यानात अशाप्रकारे खत तयार केले जात आहे. आता मात्र सर्वच उद्यानात अशाप्रकारे कचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार करण्यात येेणार असल्याने त्याच खताचा झाडांसाठी उपयोग देखील केला जाणार आहे.

इन्फो..

त्याच उद्यानासाठी खताचा वापर शक्य

नाशिक महापालिकेच्या वतीने उद्यानातील पालापाचोळ्यापासून खत तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यास मदत हेाईल. तसेच त्याच उद्यानासाठी खत देखील तयार होऊ शकेल, असे आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले.