शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

साहित्य संमेलनासाठी आता नगरसेवकांच्या निधीवर गंडांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:16 IST

नाशिक- कोरोनामुळे आधीत आर्थिक संकटात असलेल्या महापालिकेवर साहित्य संमेलनासाठी ५० लाख रूपयांचा बोजा टाकण्यात आल्याने नगरसेवकांत अस्वस्थता आहे. त्यातच ...

नाशिक- कोरोनामुळे आधीत आर्थिक संकटात असलेल्या महापालिकेवर साहित्य संमेलनासाठी ५० लाख रूपयांचा बोजा टाकण्यात आल्याने नगरसेवकांत अस्वस्थता आहे. त्यातच आता पालकमंत्र्यांनी नगरसेवकांनी निधी द्यावा असे आवाहन केल्याने आणखीनच संकट उभे राहीले आहे. महापालिकेच्या निवडणुका तोंडावर त्यातच नागरी कामांसाठीच निधी नसल्याने कर्ज काढण्याची वेळ आली आहेत. त्यात आता नगरसेवकांचा हक्काचा निधी जाण्याची वेळ आल्याने अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

येत्या २६ ते २८ मार्चच्या दरम्यान नाशिक शहरात अखील भारतीय मराठी साहित्य संमेलन हेाणार आहे. या संमेलनाचे नाशिककरांच्या वतीने स्वागत हेात असले तरी त्याचा खर्च महापालिकेच्या आणि नगरसेेवकांच्या निधी मारला जातोय की काय अशी शंका आहे. या संमेलनासाठी नाशिक महापालिकेने ५० लाख रूपयांची मागणी आयोजकांनी केली आहे. मुळात राज्य सरकारने संमेलनासाठी ५० लाख रूपयांचा निधी अगोदरच घोषित केला आहे. त्यात महापालिकेने आणखी ५० लाख रूपये देण्याची गरज आहे काय असा प्रश्न केल जात आहे. मुळात महापालिकेच्या अधिनियमातील तरतुदीनुसार कोणत्या संस्थेला आर्थिक मदत करण्यासाठी जास्तीत जास्त तीन लाख रूपयांचाच निधी देण्याची मर्यादा आहे. त्यापेक्षा अधिक रक्कम कोणत्याही संस्थेला द्यायची झाल्यास त्यासाठी राज्य शासनाची परवानगी घ्यावी लागते. त्यानंतरच ती रक्कम अदा केली जाते. परंतु सध्या राज्य शासनाने जरी महापालिकेला जरी निधी देण्यास संमती दिली तरी महापालिकेची आर्थिक स्थिती तशी नाही. नाशिक महापालिकेची २३२ कोटी रूपयांची घरपट्टी थकीत आहे तर ७९ कोटी रूपयांची पाणी पट्टी थकीत आहे. ती वसूल करता करता महापालिकेस मेटाकुटीस आली आहे. त्यामुळे महापालिकेला कर वसुलीसाठी सक्ती करता येत नाही आणि दुसरीकडे साहित्य संमेलनासाठी ५० लाख रूपये देण्याचा प्रस्ताव आहे.

या प्रस्तावावर निर्णय होत नाही तोच पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आता नगरसेवकांना देखील निधी देण्याचे आवाहन बुधवारी (दि.१०) केल्याने नाशिक महापालिकेत अस्वस्थतेचे वारे वाहु लागले आहेत. पालकमंत्री या नात्याने भुजबळ यांच्या निर्णयाला थेट विरोध करता येत नसल्याने अनेकांची अडचण झाली आहे.

केाट...

नगरसेवकांचा स्वेच्छाधिकार निधी साहित्य संमेलनाला वापरता येणार नाही. तो प्रभागातच वापरण्याची तरतूद आहे. मात्र, संमेलनासाठी निधी देता येऊ शकेल. आयोजकांच्या मागणीनुसार तो देता येणे शक्य नाही. कारण नाशिक महापालिका ही मुंबई महापालिकेसारखी मोठी संस्था नाही की राज्य सरकारसारखे स्रोत नाही. परंतु चांगला सन्मानजनक निधी दिला पाहिजे. त्यासाठी महासभेने निर्णय घेतल्यास राज्य शासनाकडे पाठवून विशेष बाब म्हणून मंजुरी घेता येईल.

- कैलास जाधव, आयुक्त, महापालिका

इन्फो...

संमेलनासाठी किती रक्कम द्यावी याबाबत नगरसेवकांत एकमत नाही. अनेकांचा विरोध असला तरी खुले पणाने बेालता येत नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे येत्या १८ फेब्रुवारीस महासभेत प्रस्ताव मांडून त्यानुसार निर्णय घेतला जाणार आहे.