शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

आता घरपट्टीच्या ठेक्याआडून पुन्हा मन्नुभाईची एन्ट्री?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:19 IST

महापालिकेच्या वतीने जकातीचे खासगीकरण करण्याचा निर्णय तत्कालीन महापालिकेत शिवसेनेने घेतला होता. त्यानंतर, बरीच भवती न भवती झाली. त्यानंतर मनसेच्या ...

महापालिकेच्या वतीने जकातीचे खासगीकरण करण्याचा निर्णय तत्कालीन महापालिकेत शिवसेनेने घेतला होता. त्यानंतर, बरीच भवती न भवती झाली. त्यानंतर मनसेच्या काळात हा ठेका अखेरीस गेला आणि त्यानंतर जकातही रद्द झाली असली, तरी त्यांनतर खासगीकरणाचे पेव फुटले आहे. अगदी व्हॉलमनपासून ते सफाई कामगारांपर्यंत खासगीकरण करण्यात आले असून, आता तर घरपट्टी आणि पाणीपट्टी आकारणी आणि वसुलीचे खासगीकरण करण्यात येणार आहे. महापालिकेत घरपट्टी आणि पाणीपट्टीची देयके देण्यासाठी अवघे ११४ कर्मचारी आहेत. महापालिकेत पाच लाख मिळकती आहेत आणि कर्मचारी अवघे ११४ असल्याने त्यांना घरोघर जाऊन देयकेही वाटणे कठीण होते. पाणीपट्टीसाठी तर मीटर रीडिंग घेऊन पुन्हा बिल देण्यासाठी जाणेही शक्य होत नाही. आता हा विभाग सक्षम करणे सोडून प्रशासनाकडून खासगीकरणाचा घाटत आहे. त्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आलेला असून, लवकरच तो महासभेवर सादर केला जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रस्ताव तयार करताना, एका नियेाजित ठेकेदाराच्या सोयीने नियम ठरविले जात असल्याची चर्चा आहे, परंतु त्याचबरोबर मिळकतींचे मूल्यांकनही करण्याचे काम ठेकेदाराला दिले जाण्याची शक्यता असून, हीच सर्वात माेठी मेख आहे. मिळकतीचे मूल्यांकन हे महापालिकेच्या हाती असणे अपेक्षित आहे. यापूर्वी महापालिकेने केलेले मूल्यांकन खूपच गाजले होते. त्यानंतर, आता तर पुन्हा असेच खासगीकरण करण्याच्या हालचाली सुरू असून, त्यामुळे महापालिकेत उलटसुलट चर्चा सुरू आहे.

इन्फो..

महापालिकेच्या काही अधिकारी आणि राजकीय नेत्यांकडून मन्नुभाई नामक बहुचर्चित ठेकेदारासाठी सर्वकाही होत असल्याची चर्चा आहे. मात्र, अद्याप असे काही ठरलेले नाही. राज्य शासनाकडून परवानगी मिळाल्यास महापालिकेच्या खासगीकरण करण्यात येणार आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.