शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

आता लक्ष पहिल्या पर्वणीकडे!

By admin | Updated: August 20, 2015 00:08 IST

प्रशासनाची कसोटी : सूक्ष्म नियोजनावर भर देणार

नाशिक : साधुग्राममधील प्रमुख आखाड्यांचे ध्वजारोहण आटोपल्यानंतर आता सर्व शासकीय यंत्रणांचे पहिल्या पर्वणीकडे लक्ष लागले आहे. येत्या २९ आॅगस्टला पहिली पर्वणी असून नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे एकाच दिवशी सामाईक पर्वणी असल्याने प्रशासनाची खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे. बारा वर्षांनी भरणारा कुंभमेळा हे नाशिकचे वैशिष्ट्य असले तरी प्रशासनाच्या दृष्टीने ते मोठे आव्हान ठरते. यंदा तर बदललेली स्थिती, नाशिकमध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या त्यामुळे गर्दीचे नियोजन हे सर्वाधिक आव्हान ठरते.यंदा तर दहशतवादी कारवायांचेदेखील मोठे आव्हान आहे. गेल्या चार वर्षांपासून कुंभमेळ्यासाठी आराखडे तयार करणे, ते सादर करणे, आवश्यक तो बदल करणे आणि मंजुरी मिळवणे इथपासून ते आता पूर्णत्वास येत असलेल्या कामांपर्यंतचा टप्पा गाठला आहे. गेल्या १४ जुलै रोजी पुरोहित संघाच्या वतीने धर्मध्वजारोहण करण्यात आले आणि सिंहस्थ पर्वाचा प्रारंभ झाला. प्रशासनाच्या दृष्टीने ही पूर्वतयारीच होती. रामकुंड परिसरात त्याचा अनुभव आला. त्यानंतर साधुग्राममध्ये तीन प्रमुख आखाडे आणि पाचशे खालशांचे होणारे ध्वजारोहण यंदा महापालिकेने मनावर घेतल्याने मोठ्या स्वरूपात पार पडले. साधुग्राममध्ये नियोजनाची एक रंगीत तालीम यानिमित्ताने पार पडली. आता दोन टप्पे पार पडल्यानंतर आता मुख्य पर्वणीकडे लक्ष लागून आहे.तोंडावर असलेल्या या पर्वणीसाठी नाशिक शहरात अगोदरच आठ हजार पोलीस दाखल झाले आहेत. उर्वरित चार हजार पोलीस येत्या दोन ते तीन दिवसात येणार आहेत. त्याचप्रमाणे कुंभमेळा रेल्वे येण्यास प्रारंभ झाला आहे. आता पर्वणीच्या दिवशीचे माहिती केंद्र, उपचार केंद्र, तेथील माहितगार अधिकाऱ्यांची नियुक्ती, स्वयंसेवकांची मदत, त्यांच्यासाठी जागा निश्चिती करणे अशा प्रकारची अनेक सूक्ष्म कामे करण्यात येत आहे. याशिवाय अन्य खात्यांचे अधिकारीही नाशिकमध्ये येत असून तांत्रिक तसेच अन्य साधनांची चाचणी करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)