शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आता ध्वज उतरवण्यावरूनही वाद

By admin | Updated: September 19, 2015 22:52 IST

पेच : ‘दिगंबर’ने उतरवला; अन्य दोन आखाड्यांची वेगळी भूमिका

नाशिक : संपूर्ण कुंभमेळा वादविवादांनी गाजल्यानंतर आता तो संपल्यावरही वादविवाद पाठ सोडायला तयार नाही. कुंभमेळ्यासाठी तिन्ही अनी आखाड्यांनी उभारलेले ध्वज उतरवण्यावरून आता नवा वाद उभा राहिला आहे. दिगंबर आखाड्याने शनिवारी सकाळीच आपला ध्वज उतरवला, तर उर्वरित दोन्ही आखाड्यांनी मात्र आपापले ध्वज कायमस्वरूपी ठेवण्याची भूमिका घेतल्याने नवा पेच निर्माण झाला आहे. कुंभमेळ्याचे शाहीस्नान जवळ आल्याची द्वाही साधू व भाविकांपर्यंत पोहोचवण्यासाठी साधूंच्या आखाड्यांमार्फत ध्वजारोहण केले जाते. त्यानुसार गेल्या १९ आॅगस्ट रोजी साधुग्राममध्ये भाजपाचे अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा रंगला.दिगंबर, निर्वाणी व निर्मोही आखाड्यांत विधिवत पूजनानंतर प्रमुख महंतांच्या हस्ते ध्वज फडकावण्यात आले. दिगंबर आखाड्याचा ध्वज पंचरंगी, निर्वाणी आखाड्याचा ध्वज लाल, तर निर्मोही आखाड्याचा ध्वज पांढऱ्या रंगाचा असून, सर्व ध्वजांवर उडत्या हनुमानाची सारखीच छबी साकारण्यात आली आहे. सदर ध्वज कुंभमेळ्याची तिन्ही शाहीस्नाने झाल्यानंतर म्हणजे साधारणत: महिनाभराने उतरवले जातील, असे त्यावेळी सांगण्यात आले होते. त्यानुसार दिगंबर आखाड्याने शुक्रवारी पर्वणी झाल्यानंतर आज सकाळी ६ वाजता आपल्या पंचरंगी ध्वजाची विधिवत पूजा करून पंचांच्या उपस्थितीत ध्वज उतरवला. दुसरीकडे निर्वाणी व निर्मोही आखाड्याने मात्र सध्या ध्वज उतरवला जाणार नसल्याचे सांगितले. नाशिक महापालिकेने सदर जागा कायमस्वरूपी आखाड्यांसाठी आरक्षित केली असल्याने ध्वज व चरणपादुका स्थायी स्वरूपात ठेवणार असल्याचे या आखाड्यातील काही महंतांनी सांगितले. तर काहींनी मात्र वर्षभरानंतर ध्वज काढणार असल्याची माहिती दिली. दिगंबर आखाड्याला प्रथा-परंपरा माहीत नसून, त्यांनी विना पूजाअर्चा ध्वज उतरवल्याची टीकाही काहींनी केली. दुसरीकडे आम्ही आमच्या परंपरेनुसार ध्वज उतरवला, कोण काय म्हणते याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही, असे दिगंबर आखाड्यातून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)