शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

आता ध्वज उतरवण्यावरूनही वाद

By admin | Updated: September 19, 2015 22:52 IST

पेच : ‘दिगंबर’ने उतरवला; अन्य दोन आखाड्यांची वेगळी भूमिका

नाशिक : संपूर्ण कुंभमेळा वादविवादांनी गाजल्यानंतर आता तो संपल्यावरही वादविवाद पाठ सोडायला तयार नाही. कुंभमेळ्यासाठी तिन्ही अनी आखाड्यांनी उभारलेले ध्वज उतरवण्यावरून आता नवा वाद उभा राहिला आहे. दिगंबर आखाड्याने शनिवारी सकाळीच आपला ध्वज उतरवला, तर उर्वरित दोन्ही आखाड्यांनी मात्र आपापले ध्वज कायमस्वरूपी ठेवण्याची भूमिका घेतल्याने नवा पेच निर्माण झाला आहे. कुंभमेळ्याचे शाहीस्नान जवळ आल्याची द्वाही साधू व भाविकांपर्यंत पोहोचवण्यासाठी साधूंच्या आखाड्यांमार्फत ध्वजारोहण केले जाते. त्यानुसार गेल्या १९ आॅगस्ट रोजी साधुग्राममध्ये भाजपाचे अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा रंगला.दिगंबर, निर्वाणी व निर्मोही आखाड्यांत विधिवत पूजनानंतर प्रमुख महंतांच्या हस्ते ध्वज फडकावण्यात आले. दिगंबर आखाड्याचा ध्वज पंचरंगी, निर्वाणी आखाड्याचा ध्वज लाल, तर निर्मोही आखाड्याचा ध्वज पांढऱ्या रंगाचा असून, सर्व ध्वजांवर उडत्या हनुमानाची सारखीच छबी साकारण्यात आली आहे. सदर ध्वज कुंभमेळ्याची तिन्ही शाहीस्नाने झाल्यानंतर म्हणजे साधारणत: महिनाभराने उतरवले जातील, असे त्यावेळी सांगण्यात आले होते. त्यानुसार दिगंबर आखाड्याने शुक्रवारी पर्वणी झाल्यानंतर आज सकाळी ६ वाजता आपल्या पंचरंगी ध्वजाची विधिवत पूजा करून पंचांच्या उपस्थितीत ध्वज उतरवला. दुसरीकडे निर्वाणी व निर्मोही आखाड्याने मात्र सध्या ध्वज उतरवला जाणार नसल्याचे सांगितले. नाशिक महापालिकेने सदर जागा कायमस्वरूपी आखाड्यांसाठी आरक्षित केली असल्याने ध्वज व चरणपादुका स्थायी स्वरूपात ठेवणार असल्याचे या आखाड्यातील काही महंतांनी सांगितले. तर काहींनी मात्र वर्षभरानंतर ध्वज काढणार असल्याची माहिती दिली. दिगंबर आखाड्याला प्रथा-परंपरा माहीत नसून, त्यांनी विना पूजाअर्चा ध्वज उतरवल्याची टीकाही काहींनी केली. दुसरीकडे आम्ही आमच्या परंपरेनुसार ध्वज उतरवला, कोण काय म्हणते याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही, असे दिगंबर आखाड्यातून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)