शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
6
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
9
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
10
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
12
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
13
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
14
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
15
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
16
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
17
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
20
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...

..आता जंगलांवर चोख ‘वॉच’

By admin | Updated: April 10, 2016 00:14 IST

..आता जंगलांवर चोख ‘वॉच’

.नाशिक : जंगलामध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी व वनक्षेत्रपालांच्या गस्त पथकाला सुरक्षितता प्रदान करण्यासाठी राज्य सरकारने नाशिक वनविभागाला एकूण चौदा ‘पेट्रोलिंग जीप’ उपलब्ध करून दिल्या आहेत. जंगल परिसरातील गैरप्रकार रोखणे वन कर्मचाऱ्यांना सोपे होणार आहे. शहराच्या वनखात्यामध्ये अकरा विशेष वाहने दाखल झाली असून, तीन वाहने अहमदनगरला देण्यात आली आहे. त्यामुळे आता जंगलांवर आता वनक्षेत्रपालांच्या गस्त पथकाचा चोख ‘वॉच’ राहणार आहे.जंगलातील वृक्षतोड, तस्करी, वन्यजिवांची शिकार, वनऔषधींची चोरी, वणवे पेटविणे आदि गैरप्रकारांना आळा बसावा आणि वन कर्मचाऱ्यांना चोखपणे सुरक्षित गस्त घालता यावी, यासाठी मागील अनेक वर्षांपासून वनविभागाकडून शासनाकडे पाठपुरावा केला जात होता. अखेर वन मंत्रालयाकडून नाशिक वनवृत्त हद्दीसाठी एकूण १४ वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यापैकी अकरा नाशिक वनविभागाला, तर तीन जीप अहमदनगर वनविभागाला देण्यात आल्या आहेत. ही वाहने केवळ तालुक्याच्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या वनक्षेत्रपालांनाच वापरता येणार आहेत. शासनाकडून अद्याप केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच वाहने उपलब्ध करून देण्यात आली होती; मात्र आदिवासी भागात तालुक्याच्या ठिकाणी जंगलावर करडी नजर ठेवणाऱ्या वनक्षेत्रपाल, वनरक्षकांना गस्तीसाठीही वाहने वनविभागाकडे नव्हती. त्यामुळे अनेकदा जंगलांच्या भागात गस्त घालताना गस्त पथकाला तस्करांच्या हल्ल्यांनाही तोंड द्यावे लागत होते. दरम्यान, हल्लेखोरांच्या हल्ल्यात वनपाल, वनरक्षक जखमी झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. एकूणच जंगलातील गस्तीसाठी सुसज्ज वाहन नसल्यामुळे वन कर्मचाऱ्यांसह जंगलांचीही सुरक्षा ऐरणीवर आली होती. (प्रतिनिधी)