शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

आता बारा वर्षांनीच बहिष्काराची भाषा

By admin | Updated: September 19, 2015 22:41 IST

पर्वणी संपली : प्रशासनाने सोडला सुटकेचा नि:श्वास

नाशिक : वर्षभरापूर्वी सिंहस्थ कामाने वेग घेतला आणि ज्यांच्यासाठी सोयी-सुविधा करण्याचे घाटत गेले, त्यांनी किरकोळ कारणावरून थेट सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शाहीस्नानावरच बहिष्काराची भाषा केली. कधी साधू-महंतांना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप, तर कधी कामे निकृष्ट होत असल्याने कुंभमेळ्यासाठी नाशिकला न येण्याचे अस्त्र उगारले गेले. पारंपरिकता व धार्मिकतेशी निगडीत असलेल्या कुंभमेळ्यासाठी देशभरातून साधू-महंत व लाखोंनी भाविक येणार असल्याने नसत्या बदनामीच्या भीतीने प्रशासन वारंवार झुकले, तर शासनानेही साधूंपुढे गुढगे टेकले. अगदी पर्वणीच्या पूर्वसंध्येपर्यंत मेळा अधिकाऱ्यांकरवी नाकदुऱ्या काढण्याचे काम केले गेले, पर्वणी पार पडली आता कुंभमेळा गुंडाळण्याचा जसा सोपस्कार बाकी आहे, तसाच ‘शाहीस्नान नही होंगा’ या निर्वाणीच्या बहिष्काराची भाषादेखील थेट बारा वर्षांनीच कानी पडणार आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तीनही पर्वण्या भर पावसाळ्यात येत असल्यामुळे त्याच्या नियोजनात व अन्य ठिकाणच्या कुंभमेळ्याच्या नियोजनात मोठा फरक आहे, त्यातच ज्या तपोभूमीत कुंभ भरतो त्याठिकाणी जागेची अडचण असल्याने अशी जागा ताब्यात घेण्यासाठी जागामालकांची मिनतवारी करणे दर कुंभाला ठरलेले, त्यातही प्रशासनाला जागेची असलेली निकड पाहून जागामालकांकडून होणाऱ्या जास्तीच्या मोबदल्याची मागणी व तो न मिळाल्यास थेट न्यायालयात प्रकरण ढकलून कालापव्यय ठरलेला. अशा परिस्थितीतही जागा ताब्यात घेतल्यानंतर त्यावर प्रत्यक्ष कामाला सुरूवात करताना प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागली. मात्र असे कामे करताना निव्वळ विश्वासात घेतले नसल्याचे कारण पुढे करून वर्षभरापासून साधू-महंतांनी वेळोवेळी बहिष्काराची भाषा वापरून प्रशासनातील अधिकाऱ्यांची दमछाक केली. ज्या ज्यावेळी बहिष्काराची धमकी देण्यात आली, दुसऱ्याच दिवशी सारेच हादरू लागले, बैठकांवर बैठका व व्यवस्थित काम करण्याच्या आश्वासनांचा भडिमार होऊ लागला. कोपलेले साधू-महंत दुसऱ्याच क्षणी गप्पगार होऊ लागले. एकीकडे सिंहस्थ कुंभमेळ्याचे काम वेळेत पार पाडण्याचे आव्हान व दुसरीकडे साधू-महंतांची सरबराई करण्याचा हा खेळ साधारणत: वर्षभर कायम राहिला. मग कधी जागावाटपावरून रूसवा फुगवा राहिला, तर आखाडे, खालशांना पुरेशा सुविधा दिल्या नसल्याचे कारण पुढे करण्यात आले. ध्वजारोहण सोहळ्यात मानापमानामुळे बहिष्कारही टाकण्यात आला, तर आखाड्यांच्या अंतर्गत वादातूनही प्रशासनालाच वेठीस धरण्यात आले. एवढे सारे करूनही प्रशासनातील अधिकाऱ्यांनी मौन पाळून समजूतदारपणाचीच भूमिका घेतली. शुक्रवारी नाशिकच्या कुंभमेळ्याची अखेरची पर्वणी पार पडत असतानाही झालेल्या गोंधळातून शासन-प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना साधू-महंतांची मिनतवारी करावी लागली. एकदाचे स्नान आटोपले, साधू-महंत आखाड्यात परतले. आता तसे पाहिले तर त्यांच्या परतीचे वेध सुरू झाले. कुंभमेळा समाप्तीची जशी फक्त औपचारिकता बाकी राहिली तशीच त्याबरोबर थेट बारा वर्षांपर्यंत बहिष्काराची भाषाही हवेत विरली.