शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

आता अंत्यसंस्कारासाठीही आधार कार्ड सक्तीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 00:19 IST

नाशिक : केंद्र सरकारने सर्वच ठिकाणी आधार कार्ड सक्तीचे केले आहेत. परंतु एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही अंत्यसंस्कारासाठी ते सक्तीचे करण्यात आहे. या अजब फतव्यामुळे आधार कार्डाशिवाय मोक्ष नाही, अशी स्थिती निर्माण झाली असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे. यासंदर्भात जनक्षोभ लक्षात घेता सरकारने आधार कार्ड नसेल तर अर्जदाराला तसे प्रमाणपत्र देण्यास सांगावे आणि प्रमाणपत्रातील माहिती चुकीची निघाल्यास कारवाई होऊ शकते असे अवगत करण्याची सूचना देणारे पत्र मंगळवारी जारी केले आहे. त्यामुळे आधारकार्ड सादर न करणेदेखील तितकेच संकटात टाकणारे ठरले आहे.

नाशिक : केंद्र सरकारने सर्वच ठिकाणी आधार कार्ड सक्तीचे केले आहेत. परंतु एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही अंत्यसंस्कारासाठी ते सक्तीचे करण्यात आहे. या अजब फतव्यामुळे आधार कार्डाशिवाय मोक्ष नाही, अशी स्थिती निर्माण झाली असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे. यासंदर्भात जनक्षोभ लक्षात घेता सरकारने आधार कार्ड नसेल तर अर्जदाराला तसे प्रमाणपत्र देण्यास सांगावे आणि प्रमाणपत्रातील माहिती चुकीची निघाल्यास कारवाई होऊ शकते असे अवगत करण्याची सूचना देणारे पत्र मंगळवारी जारी केले आहे. त्यामुळे आधारकार्ड सादर न करणेदेखील तितकेच संकटात टाकणारे ठरले आहे.

केंद्र सरकारने आधारकार्ड योजना आणून अनेक वर्षे झाली तरी अद्यापही बहुतांशी नागरिकांकडे आधारकार्ड नाही. ज्यांच्याकडे आहे त्यांना बायोमेट्रिक म्हणजेच बोटांच्या ठशांची जुळणी होत नसल्याच्या किंवा अन्य तक्रारी आहेत. दुसरीकडे शासनाने सर्वच शासकीय योजनांसाठी आधारकार्ड सक्तीचे केले आहेच, शिवाय अमरधाममध्ये सक्तीचे केले आहेत. मृत व्यक्तीच्या नावाचे आधारकार्ड आवश्यक करण्यात आले असून, ते कार्ड नसेल तर मृत्यूचा दाखला मिळणार नाही असे सांगण्यात येते. त्यामुळे अनेक अडचणी उद््भवत आहेत. नाशिक महापालिकेच्या अमरधाममध्येही देखील आधारकार्ड सक्तीचे असून, ती माहिती न मिळाल्यास अनेक अडचणी येत आहेत. एखाद्या व्यक्तीकडे आधारकार्ड नसू शकते. त्याचप्रमाणे बाहेरगावाहूनआलेल्या व्यक्तीचे आपल्या नाशिक स्थित आप्तेष्टांकडे निधन झाल्यास त्याचे आधारकार्ड कोठून आणायचे? असा प्रश्न आहे. बेवारस मृतदेहांबाबत काय करायचे हादेखील प्रश्न आहे.यासंदर्भात, कॉँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर यांनी या आडमुठेपणामुळे मृत व्यक्तीला मृत्यूनंतरही यातना सोसाव्या लागत आहेत. आधाराकार्ड नसेल तर मृत्यूचा दाखला नंतर मिळणार नाही, असे सांगितले जात असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. आधारकार्ड नसल्याने कोठेही अंत्यसंस्कार करण्यास अडथळे आले नसलेतरी अमरधाममध्ये शोकाकूल वातावरणात असलेल्याकुटुंबीयांनी आधारकार्ड शोधत आणायचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.राज्य शासनाच्या आरोग्य सेवा संचालकांनी मंगळवारी (दि.३) काढलेल्या आदेशात मृत व्यक्तीचे आधारकार्ड नसेल तर अर्जदाराकडून तसे प्रमाणपत्र घ्यावे आणि हे प्रमाणपत्र खोटे असल्याचे आढळले, तर जन्म-मृत्यू अधिनियमानुसार गुन्हा ठरू शकतो, असे संबंधितांना सूचित करावे, असे त्यात नमूद केले आहे.आधार कार्डची सक्ती डोकेदुखी ठरवणारीनाशिक महापालिकेच्या वतीने अमरधामध्ये मृत व्यक्तीची माहिती भरून घेण्याच्या अर्जात मृत व्यक्ती दारू किंवा तत्सम उत्तेजक पदार्थांचे सेवन करीत होते काय, पानसुपारी, सिगारेट, बिडीचे व्यसन होते काय, असल्यास किती वर्षे, अशाप्रकारची माहिती भरून घेतली जाते. सरकारने २०१२ पासूनच ही माहिती आवश्यक केल्याचे सांगितले जात असले तरी अशाप्रकारे प्रश्न मृत्यूनंतर विचारून काय साध्य होणार, असा प्रश्न केला जात आहे. त्यात आता आधारकार्डाची सक्तीही डोकेदुखी वाढविणारी ठरली आहे.