शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

आता अंत्यसंस्कारासाठीही आधार कार्ड सक्तीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 00:19 IST

नाशिक : केंद्र सरकारने सर्वच ठिकाणी आधार कार्ड सक्तीचे केले आहेत. परंतु एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही अंत्यसंस्कारासाठी ते सक्तीचे करण्यात आहे. या अजब फतव्यामुळे आधार कार्डाशिवाय मोक्ष नाही, अशी स्थिती निर्माण झाली असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे. यासंदर्भात जनक्षोभ लक्षात घेता सरकारने आधार कार्ड नसेल तर अर्जदाराला तसे प्रमाणपत्र देण्यास सांगावे आणि प्रमाणपत्रातील माहिती चुकीची निघाल्यास कारवाई होऊ शकते असे अवगत करण्याची सूचना देणारे पत्र मंगळवारी जारी केले आहे. त्यामुळे आधारकार्ड सादर न करणेदेखील तितकेच संकटात टाकणारे ठरले आहे.

नाशिक : केंद्र सरकारने सर्वच ठिकाणी आधार कार्ड सक्तीचे केले आहेत. परंतु एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही अंत्यसंस्कारासाठी ते सक्तीचे करण्यात आहे. या अजब फतव्यामुळे आधार कार्डाशिवाय मोक्ष नाही, अशी स्थिती निर्माण झाली असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे. यासंदर्भात जनक्षोभ लक्षात घेता सरकारने आधार कार्ड नसेल तर अर्जदाराला तसे प्रमाणपत्र देण्यास सांगावे आणि प्रमाणपत्रातील माहिती चुकीची निघाल्यास कारवाई होऊ शकते असे अवगत करण्याची सूचना देणारे पत्र मंगळवारी जारी केले आहे. त्यामुळे आधारकार्ड सादर न करणेदेखील तितकेच संकटात टाकणारे ठरले आहे.

केंद्र सरकारने आधारकार्ड योजना आणून अनेक वर्षे झाली तरी अद्यापही बहुतांशी नागरिकांकडे आधारकार्ड नाही. ज्यांच्याकडे आहे त्यांना बायोमेट्रिक म्हणजेच बोटांच्या ठशांची जुळणी होत नसल्याच्या किंवा अन्य तक्रारी आहेत. दुसरीकडे शासनाने सर्वच शासकीय योजनांसाठी आधारकार्ड सक्तीचे केले आहेच, शिवाय अमरधाममध्ये सक्तीचे केले आहेत. मृत व्यक्तीच्या नावाचे आधारकार्ड आवश्यक करण्यात आले असून, ते कार्ड नसेल तर मृत्यूचा दाखला मिळणार नाही असे सांगण्यात येते. त्यामुळे अनेक अडचणी उद््भवत आहेत. नाशिक महापालिकेच्या अमरधाममध्येही देखील आधारकार्ड सक्तीचे असून, ती माहिती न मिळाल्यास अनेक अडचणी येत आहेत. एखाद्या व्यक्तीकडे आधारकार्ड नसू शकते. त्याचप्रमाणे बाहेरगावाहूनआलेल्या व्यक्तीचे आपल्या नाशिक स्थित आप्तेष्टांकडे निधन झाल्यास त्याचे आधारकार्ड कोठून आणायचे? असा प्रश्न आहे. बेवारस मृतदेहांबाबत काय करायचे हादेखील प्रश्न आहे.यासंदर्भात, कॉँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर यांनी या आडमुठेपणामुळे मृत व्यक्तीला मृत्यूनंतरही यातना सोसाव्या लागत आहेत. आधाराकार्ड नसेल तर मृत्यूचा दाखला नंतर मिळणार नाही, असे सांगितले जात असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. आधारकार्ड नसल्याने कोठेही अंत्यसंस्कार करण्यास अडथळे आले नसलेतरी अमरधाममध्ये शोकाकूल वातावरणात असलेल्याकुटुंबीयांनी आधारकार्ड शोधत आणायचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.राज्य शासनाच्या आरोग्य सेवा संचालकांनी मंगळवारी (दि.३) काढलेल्या आदेशात मृत व्यक्तीचे आधारकार्ड नसेल तर अर्जदाराकडून तसे प्रमाणपत्र घ्यावे आणि हे प्रमाणपत्र खोटे असल्याचे आढळले, तर जन्म-मृत्यू अधिनियमानुसार गुन्हा ठरू शकतो, असे संबंधितांना सूचित करावे, असे त्यात नमूद केले आहे.आधार कार्डची सक्ती डोकेदुखी ठरवणारीनाशिक महापालिकेच्या वतीने अमरधामध्ये मृत व्यक्तीची माहिती भरून घेण्याच्या अर्जात मृत व्यक्ती दारू किंवा तत्सम उत्तेजक पदार्थांचे सेवन करीत होते काय, पानसुपारी, सिगारेट, बिडीचे व्यसन होते काय, असल्यास किती वर्षे, अशाप्रकारची माहिती भरून घेतली जाते. सरकारने २०१२ पासूनच ही माहिती आवश्यक केल्याचे सांगितले जात असले तरी अशाप्रकारे प्रश्न मृत्यूनंतर विचारून काय साध्य होणार, असा प्रश्न केला जात आहे. त्यात आता आधारकार्डाची सक्तीही डोकेदुखी वाढविणारी ठरली आहे.