शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

शरीर पोषणासाठी पडावे सर्वांच्या मुखी सकस अन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 00:53 IST

आहार अभ्यासकांचे मत : प्रत्येक जिवाला मिळावे चांगले भोजन मुकुंद बाविस्कर। नाशिक : ‘अन्न हे पूर्ण ब्रह्म’ असे म्हणतात ते अगदी सार्थ आहे. प्रत्येक मनुष्यप्राण्याला जीवन जगण्यासाठी तीन मूलभूत गरजांपैकी एक म्हणजे अन्न होय. शरीरातील मूलभूत घटक म्हणजे पेशी. या पेशी जिवंत राहण्यासाठी पोषण लागते. ग्लुकोज, अमिनो, आम्ले, मेदाम्ले, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, आयोडीन, जीवनसत्त्व असे घटक लागतात. हे सर्व घटक आपण अन्नातूनच मिळवतो. म्हणून अन्नाचा व आरोग्याचा खरे तर जीवनाशी अतिशय जवळचा संबंध आहे, त्यासाठी प्रत्येकालाच योग्य भोजन मिळायला हवे, असे मत आहारतज्ज्ञ त्याचप्रमाणे सामाजिक अभ्यासक व्यक्त करतात.

आहार अभ्यासकांचे मत : प्रत्येक जिवाला मिळावे चांगले भोजन

मुकुंद बाविस्कर।नाशिक : ‘अन्न हे पूर्ण ब्रह्म’ असे म्हणतात ते अगदी सार्थ आहे. प्रत्येक मनुष्यप्राण्याला जीवन जगण्यासाठी तीन मूलभूत गरजांपैकी एक म्हणजे अन्न होय. शरीरातील मूलभूत घटक म्हणजे पेशी. या पेशी जिवंत राहण्यासाठी पोषण लागते. ग्लुकोज, अमिनो, आम्ले, मेदाम्ले, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, आयोडीन, जीवनसत्त्व असे घटक लागतात. हे सर्व घटक आपण अन्नातूनच मिळवतो. म्हणून अन्नाचा व आरोग्याचा खरे तर जीवनाशी अतिशय जवळचा संबंध आहे, त्यासाठी प्रत्येकालाच योग्य भोजन मिळायला हवे, असे मत आहारतज्ज्ञ त्याचप्रमाणे सामाजिक अभ्यासक व्यक्त करतात.१६ आॅक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न व कृ षी संघटनेची स्थापना करण्यात आली. हा दिवस दरवर्षी ‘जागतिक अन्न दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. जगात आजही सुमारे ८० कोटी लोकांना उपाशी रहावे लागते. ही संख्या येत्या दहा वर्षांत निम्म्यावर आणायचा निर्धार बहुसंख्य राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर केला आहे. संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केलेल्या सहस्त्रकोत्तर विकास ध्येयांमध्ये याचा समावेश आहे. पर्यावरणाचा ºहास न करता जगभरातील लोकांना पुरेसे अन्न उपलब्ध करण्याचे आव्हान जगातील सर्व प्रगत राष्ट्रांपुढे आहे. अनेक शतकांपासून आरोग्य व रोग यांचा अन्नाशी संबंध आहे, हे मानवाला ज्ञात आहे. खरे तर माणसाचा सर्व इतिहास म्हणजे अन्न मिळविण्यासाठी त्याने केलेल्या संघर्षाचा इतिहास मानला जातो. आदिमानव सुरुवातीला प्राण्यांची शिकार करून त्यांचे कच्चे मांस खायचा. त्यानंतर तो शेती करायला लागला. प्राणी पाळायला लागला. त्यामुळे अन्नात विविध वस्तू समाविष्ट झाल्या. अन्न शिजवणे, टिकवणे तसेच त्यावर प्रक्रिया करण्याच्या अनेक पद्धतींचा शोध लागत गेला. आधुनिक काळात मानवाचा आहार वैविध्यपूर्ण झाला असून, पोषणाचे शास्त्रसुद्धा विकसित झाले आहे.आपल्या देशात पोषणाशी संबंधित अनेक आरोग्य समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहेत. मातेच्या कुपोषणामुळे कुपोषित बालके जन्माला येतात. तर दुसरीकडे फास्टफूडची क्रेझ वाढल्याने खात्यापित्या घरातील मुले लठ्ठ होण्याचे प्रमाण वाढले असून, त्यातून अनेक आजार निर्माण होत असल्याचेही वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. काय खावे, काय खाऊ नयेआरोग्य व आहार तज्ज्ञांच्या मतानुसार प्रत्येक व्यक्तीने आरोग्यपूर्ण जगण्यासाठी समतोल व चौरस आहार घ्यावा.दैनंदिन आहारात २५ टक्के मेद पदार्थ घ्यावेत.कर्बोदकांचा वापर वाढवावा.दररोज ५ ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये.दैनंदिन आहारात २० टक्के प्रथिने असावीत.शीतपेये, केचअप, तेलकट, तूपकट पदार्थ टाळावेत.जीवनसत्त्वयुक्त पालेभाज्या व फळे खावेत.बेकरीचे पदार्थ व फास्टफूड टाळावेत.