शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

शरीर पोषणासाठी पडावे सर्वांच्या मुखी सकस अन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 00:53 IST

आहार अभ्यासकांचे मत : प्रत्येक जिवाला मिळावे चांगले भोजन मुकुंद बाविस्कर। नाशिक : ‘अन्न हे पूर्ण ब्रह्म’ असे म्हणतात ते अगदी सार्थ आहे. प्रत्येक मनुष्यप्राण्याला जीवन जगण्यासाठी तीन मूलभूत गरजांपैकी एक म्हणजे अन्न होय. शरीरातील मूलभूत घटक म्हणजे पेशी. या पेशी जिवंत राहण्यासाठी पोषण लागते. ग्लुकोज, अमिनो, आम्ले, मेदाम्ले, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, आयोडीन, जीवनसत्त्व असे घटक लागतात. हे सर्व घटक आपण अन्नातूनच मिळवतो. म्हणून अन्नाचा व आरोग्याचा खरे तर जीवनाशी अतिशय जवळचा संबंध आहे, त्यासाठी प्रत्येकालाच योग्य भोजन मिळायला हवे, असे मत आहारतज्ज्ञ त्याचप्रमाणे सामाजिक अभ्यासक व्यक्त करतात.

आहार अभ्यासकांचे मत : प्रत्येक जिवाला मिळावे चांगले भोजन

मुकुंद बाविस्कर।नाशिक : ‘अन्न हे पूर्ण ब्रह्म’ असे म्हणतात ते अगदी सार्थ आहे. प्रत्येक मनुष्यप्राण्याला जीवन जगण्यासाठी तीन मूलभूत गरजांपैकी एक म्हणजे अन्न होय. शरीरातील मूलभूत घटक म्हणजे पेशी. या पेशी जिवंत राहण्यासाठी पोषण लागते. ग्लुकोज, अमिनो, आम्ले, मेदाम्ले, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, आयोडीन, जीवनसत्त्व असे घटक लागतात. हे सर्व घटक आपण अन्नातूनच मिळवतो. म्हणून अन्नाचा व आरोग्याचा खरे तर जीवनाशी अतिशय जवळचा संबंध आहे, त्यासाठी प्रत्येकालाच योग्य भोजन मिळायला हवे, असे मत आहारतज्ज्ञ त्याचप्रमाणे सामाजिक अभ्यासक व्यक्त करतात.१६ आॅक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न व कृ षी संघटनेची स्थापना करण्यात आली. हा दिवस दरवर्षी ‘जागतिक अन्न दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. जगात आजही सुमारे ८० कोटी लोकांना उपाशी रहावे लागते. ही संख्या येत्या दहा वर्षांत निम्म्यावर आणायचा निर्धार बहुसंख्य राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर केला आहे. संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केलेल्या सहस्त्रकोत्तर विकास ध्येयांमध्ये याचा समावेश आहे. पर्यावरणाचा ºहास न करता जगभरातील लोकांना पुरेसे अन्न उपलब्ध करण्याचे आव्हान जगातील सर्व प्रगत राष्ट्रांपुढे आहे. अनेक शतकांपासून आरोग्य व रोग यांचा अन्नाशी संबंध आहे, हे मानवाला ज्ञात आहे. खरे तर माणसाचा सर्व इतिहास म्हणजे अन्न मिळविण्यासाठी त्याने केलेल्या संघर्षाचा इतिहास मानला जातो. आदिमानव सुरुवातीला प्राण्यांची शिकार करून त्यांचे कच्चे मांस खायचा. त्यानंतर तो शेती करायला लागला. प्राणी पाळायला लागला. त्यामुळे अन्नात विविध वस्तू समाविष्ट झाल्या. अन्न शिजवणे, टिकवणे तसेच त्यावर प्रक्रिया करण्याच्या अनेक पद्धतींचा शोध लागत गेला. आधुनिक काळात मानवाचा आहार वैविध्यपूर्ण झाला असून, पोषणाचे शास्त्रसुद्धा विकसित झाले आहे.आपल्या देशात पोषणाशी संबंधित अनेक आरोग्य समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहेत. मातेच्या कुपोषणामुळे कुपोषित बालके जन्माला येतात. तर दुसरीकडे फास्टफूडची क्रेझ वाढल्याने खात्यापित्या घरातील मुले लठ्ठ होण्याचे प्रमाण वाढले असून, त्यातून अनेक आजार निर्माण होत असल्याचेही वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. काय खावे, काय खाऊ नयेआरोग्य व आहार तज्ज्ञांच्या मतानुसार प्रत्येक व्यक्तीने आरोग्यपूर्ण जगण्यासाठी समतोल व चौरस आहार घ्यावा.दैनंदिन आहारात २५ टक्के मेद पदार्थ घ्यावेत.कर्बोदकांचा वापर वाढवावा.दररोज ५ ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये.दैनंदिन आहारात २० टक्के प्रथिने असावीत.शीतपेये, केचअप, तेलकट, तूपकट पदार्थ टाळावेत.जीवनसत्त्वयुक्त पालेभाज्या व फळे खावेत.बेकरीचे पदार्थ व फास्टफूड टाळावेत.