शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

शेतकऱ्यांचे पैसे थांबविण्याच्या सूचना

By admin | Updated: May 11, 2017 00:21 IST

नांदगाव : दिलेल्या धनादेशांचे पेमेंट थांबविण्याच्या सूचना बँकेला देऊन अडवणूक केली जात असल्याचा प्रकार व्यापारी करत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव : आपणच दिलेल्या धनादेशांचे पेमेंट थांबविण्याच्या सूचना बँकेला देऊन अडवणूक केली जात असल्याचा प्रकार येथील बाजार समितीचे मान्यताप्राप्त खरेदीदार व्यापारी करत असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. आर्थिक जिकिरीस आलेले शेतकरी, परत आलेले चेक घेऊन व्यापारी व बाजार समितीचे उंबरठे झिजवत आहेत.पिंप्राळे येथील शेतकरी निवृत्ती व्हडगळ यांचा लाल कांदा एका कंपनीने दि. ३ मार्च रोजी खरेदी केला. कांद्याच्या रकमेपोटी १२८८७ रूपये इतक्या रकमेचा दि. ६ मार्चचा येवला शाखेतील एका बॅँकेचा धनादेश दिला. व्हडगळ यांनी त्यांच्या स्टेट बँकेच्या खात्यात तो जमा केला. सुमारे दोन महिन्यांनी २ मे रोजी बँकेने सदर धनादेशाच्या बदल्यात रक्कम देण्याचे तो देणाऱ्यानेच थांबविण्यात आले आहे, असे कळवून तो परत दिला. व्हडगळ यांच्यासारखे अनेक शेतकरी आहेत त्यांचे लाखो रु पये या कंपनीकडे असल्याच्या तक्र ारी बाजार समितीकडे करण्यात आलेल्या आहेत.शहरात राष्ट्रीयीकृत व सहकारी बँका आहेत. असे असताना बाहेर गावच्या (नांदगावमध्ये शाखा नसलेल्या) बँकेच्या शाखेचे चेक देण्यात आले. एकीकडे धनादेश दिले पण त्याचवेळी पेमेंट अदा करू नये अशा सूचना बँकेस देण्यात आल्याचे दिसून येते. यापूर्वी खात्यावर रक्कम नसल्याने धनादेश वटत नसल्याचे प्रकार झाले. या पार्श्वभूमीवर देय रकमा लांबविण्याचा वरील नवा फंडा उदयास आला आहे. ओंकारजी ट्रेडिंग कंपनीचे मायानंद पाटील व बाणेश्वर कृषी सेवा केंद्राचे दयानंद पाटील या अ वर्ग खरेदीदारांना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अमोल खैरनार यांनी तत्काळ पेमेंट अदा करावे अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, अशा नोटिसा बजावल्या आहेत. तसेच परवाना कायमचा रद्द का करण्यात येऊ नये अशी विचारणा केली आहे.नोटाबंदीमुळे शेतकरी वर्गाची अडवणूक होऊ नये म्हणून बाजार समितीने आरटीजीएस/एनईएफटीने खरेदीदारांनी पेमेंट करावे ,असा प्रयत्न सभापती तेज कवडे व संचालक मंडळाने यांनी केला होता. परंतु राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकांनी या प्रस्तावास नकारात्मक प्रतिसाद दिल्याने आता जिल्हा निबंधकांनी वरिष्ठ पातळीवरून हस्तक्षेप करावा, असा समितीचा प्रयत्न सुरु आहे.