शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

अधिकाऱ्यांना नोटिसा

By admin | Updated: January 22, 2017 00:27 IST

मुख्य कार्यकारी अधिकारी : स्वच्छ भारत अभियान राबविण्यात कुचराई

मालेगाव : शासनाच्या स्वच्छ भारत अभियान तसेच हगणदारीमुक्त गाव योजनेत कुचराई व हलगर्जीपणा करणाऱ्या येथील पंचायत समितीच्या तिघा अधिकाऱ्यांना व ११ ग्रामसेवकांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर यांनी निलंबनाची व कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.  येथील पंचायत समितीच्या सभागृहात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंभरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांच्या उपस्थितीत स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)ची आढावा बैठक झाली. या आढावा बैठकीत स्वच्छ भारत अभियानाचा आढावा घेण्यात आला. या अभियानात जिल्ह्यात मालेगाव तालुका मागे असल्याचे समोर आले आहे. यामुळे संतप्त झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी शंभरकर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.  मालेगाव तालुक्यात १२४ ग्रामपंचायती आहेत तसेच ६८ हजार कुटुंबे आहेत. मार्चपर्यंत ५० टक्के ग्रामपंचायती हगणदारी मुक्त करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. त्यानुसार तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींमध्ये हगणदारीमुक्त अभियान राबविण्यात आले. उर्वरित ४४ ग्रामपंचायतींचे कामकाज सुधारले नसल्याचे बैठकीत उघडकीस आले. तालुक्यात आठ हजार ५०० वैयक्तीक शौचालये अद्यापही उभारले गेले नाही. वर्षअखेर केवळ दहा ग्रामपंचायतींनी उद्दीष्टे पूर्ण केली आहेत. संपूर्ण स्वच्छ अभियानात व हगणदारी मुक्त योजनेत येथील अधिकाऱ्यांनी असमाधानकारक काम केल्याचा ठपका ठेवत शंभरकर यांनी येत्या फेब्रुवारी महिनाअखेर तातडीने कामे पूर्ण केली नाही तर निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वच्छ भारत अभियानात व हगणदारी मुक्त योजनेत संपर्क अधिकाऱ्यांनीही हलगर्जीपणा केल्याचे समोर आले आहे. यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी शंभरकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी संगमनेरे यांनी गटविकास अधिकारी आनंद पिंगळे यांना संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत.  येत्या फेब्रुवारी महिना अखेर कामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत गरमागरम चर्चा झाली. या धडक कारवाईमुळे पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)