शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

नांदगाव नगर परिषदेकडून व्यावसायिकांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:35 IST

रेल्वे गेट बंद झाल्याने, रेल्वेने तयार करून दिलेल्या पर्यायी भुयारी मार्गातील अरुंद रस्त्याचा त्रास काही महिन्यांपासून सहन करणाऱ्या शहरवासीयांना ...

रेल्वे गेट बंद झाल्याने, रेल्वेने तयार करून दिलेल्या पर्यायी भुयारी मार्गातील अरुंद रस्त्याचा त्रास काही महिन्यांपासून सहन करणाऱ्या शहरवासीयांना नगर परिषदेने अखेर दिलासा देणारे पाऊल उचलून मटण मार्केटमधील व्यावसायिकांना सात दिवसांच्या आत ओटे/गाळे रिकामे करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत.

प्रशासनाने दिलेल्या मुदतीत गाळे खाली करून न दिल्यास नगर परिषदेमार्फत कायदेशीर मार्गाचा अवलंब करून सदर ओटे/गाळे निष्कासित करण्याची कारवाई करण्यात येईल व होणाऱ्या परिणामास आपणच जबाबदार राहाल असे मुख्याधिकारी पंकज गोसावी यांनी बजावलेल्या नोटिसीत म्हटले आहे. रेल्वे गेट बंद झाल्याने रेल्वे प्रशासनाने बांधून दिलेला भुयारी बोगदा अरुंद व वाहतुकीच्या दृष्टीने गैरसोयीचा झाला आहे. नागरिकांना या बोगद्यातून ये- जा करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत आंदोलने करण्यात आली. वाहतूक नीट करण्यासाठी सदरील भुयारी मार्ग भोंगळे मार्गाला जोडणे अत्यावश्यक आहे. परंतु या कामात मटण मार्केटच्या इमारतीचा अडथळा निर्माण होत आहे.

तसेच सदरील ओटे सन २००९ पासून कोणताही करारनामा न करता मासिक भाडेतत्त्वावर व्यवसायासाठी देण्यात आले होते. ही जागा नगर परिषदेच्या मालकीची असून, नागरिकांच्या सोयीसाठी रस्ता बनविणे आवश्यक असल्याने ओटेखाली करून द्यावे, असे नोटिसीत नमूद केले आहे.

इन्फो...

इमारतीमध्ये २१ ओटेधारक व ६ गाळेधारक असून, इमारतीमध्ये व्यवसाय करणाऱ्यांबरोबर कोणताही करार नगर परिषदेने केला नव्हता. इमारतीमधील व्यावसायिकांना सध्या तात्पुरत्या स्वरूपात व नंतर कायमस्वरूपी गाळे/ओटे देण्याची तजवीज नगर परिषद प्रशासनाला करावी लागणार आहे.