शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नवीन रुग्णसंख्येत नाशिक राज्यातच नव्हे देशात अव्वल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:13 IST

नाशिक : जिल्ह्यात नवीन रुग्ण दाखल होण्याच्या वेगात एप्रिलच्या प्रारंभापासून कमालीची वाढ झाली आहे. एका पाहणीनुसार दर दहा लाख ...

नाशिक : जिल्ह्यात नवीन रुग्ण दाखल होण्याच्या वेगात एप्रिलच्या प्रारंभापासून कमालीची वाढ झाली आहे. एका पाहणीनुसार दर दहा लाख लोकसंख्येमागे असलेल्या रुग्णसंख्येच्या निकषात नाशिकमधील रुग्णवाढीने गत महिनाभरात राजधानी मुंबईसह उपराजधानी नागपूर तसेच देशाची राजधानी दिल्लीलादेखील मागे टाकले आहे. या निकषानुसार नाशिकला गत महिन्यात प्रति दशलक्ष नागरिकांमागे ४६ हजार ५० रुग्ण बाधित तर महिनाभरात तब्बल ९७ हजार ७६५ रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

या पाहणीनुसार देशातील अव्वल पाच बाधित रुग्णसंख्या वाढीमध्ये नाशिक जिल्हा हा सगळ्यात पुढे आहे. त्यात नाशिक पाठोपाठ नागपूर, पुणे, मुंबई आणि लखनौ या पाच शहरांचा क्रम आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार १६ मार्च ते १५ एप्रिल या महिनाभराच्या कालावधीत नागपूरला प्रति दशलक्ष नागरिकांमागे ४५ हजार ८५६ रुग्ण बाधित, पुण्याला त्याच निकषानुसार ३६ हजार ३५९ तर मुंबईला त्याच निकषानुसार १७ हजार ९४६ इतकी तर लखनौला ११ हजार ९८७ एवढी प्रति दशलक्ष वाढ असल्याचे दिसून येत आहे. त्यापाठोपाठ बेंगळुरु, भोपाळ, इंदोर, दिल्ली आणि पटना या संख्येचा समावेश आहे. इतकी विदारक परिस्थिती असूनही जिल्ह्यात मनमुक्तपणे भटकणाऱ्या नागरिकांवर कारवाई का होत नाही, कठोर उपायांची अंमलबजावणी का होत नाही असाच सवाल नागरिकांकडून विचारला जाऊ लागला आहे.

इन्फो

महिनाभरात जिल्ह्यात १ लाख १६ हजारांवर वाढ

जिल्ह्यात मार्च महिन्यापासून रुग्णसंख्या वाढीने मोठा वेग पकडला. त्यातदेखील १५ मार्चपासून कोरोनावाढ सातत्याने ३ ते ४ हजारांवर कायम राहिली. त्यामुळेच १६ मार्च ते १५ एप्रिल या कालावधीत नाशिकमध्ये तब्बल १ लाख १६ हजारांवर वाढ नोंदवली गेली आहे. त्यामुळेच आतापर्यंत जिल्ह्यात किमान चार-पाच घरांमागे किमान एक व्यक्ती बाधित असे चित्र दिसू लागले आहे.

इन्फो

महिनाभरात तब्बल ६७३ बळी

जिल्ह्यात मार्च महिन्याच्या मध्यापासून कोरोनाबळींच्या संख्येतदेखील मोठी वाढ होऊ लागली. १६ मार्चला जिल्ह्यातील एकूण बळींची संख्या २१८४ झाली होती तर १६ एप्रिलला एकूण बळीसंख्या तब्बल २८५७ वा पोहोचली आहे. म्हणजेच या महिनाभराच्या कालावधीत जिल्ह्यात तब्बल ६७३ नागरिकांचा बळी कोरोनाने गेला आहे.