शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
3
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
4
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
5
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
6
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
7
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
8
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
9
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
10
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
11
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
12
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
13
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
14
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
15
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
16
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
17
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
18
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
19
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
20
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू

नवीन रुग्णसंख्येत नाशिक राज्यातच नव्हे देशात अव्वल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:13 IST

नाशिक : जिल्ह्यात नवीन रुग्ण दाखल होण्याच्या वेगात एप्रिलच्या प्रारंभापासून कमालीची वाढ झाली आहे. एका पाहणीनुसार दर दहा लाख ...

नाशिक : जिल्ह्यात नवीन रुग्ण दाखल होण्याच्या वेगात एप्रिलच्या प्रारंभापासून कमालीची वाढ झाली आहे. एका पाहणीनुसार दर दहा लाख लोकसंख्येमागे असलेल्या रुग्णसंख्येच्या निकषात नाशिकमधील रुग्णवाढीने गत महिनाभरात राजधानी मुंबईसह उपराजधानी नागपूर तसेच देशाची राजधानी दिल्लीलादेखील मागे टाकले आहे. या निकषानुसार नाशिकला गत महिन्यात प्रति दशलक्ष नागरिकांमागे ४६ हजार ५० रुग्ण बाधित तर महिनाभरात तब्बल ९७ हजार ७६५ रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

या पाहणीनुसार देशातील अव्वल पाच बाधित रुग्णसंख्या वाढीमध्ये नाशिक जिल्हा हा सगळ्यात पुढे आहे. त्यात नाशिक पाठोपाठ नागपूर, पुणे, मुंबई आणि लखनौ या पाच शहरांचा क्रम आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार १६ मार्च ते १५ एप्रिल या महिनाभराच्या कालावधीत नागपूरला प्रति दशलक्ष नागरिकांमागे ४५ हजार ८५६ रुग्ण बाधित, पुण्याला त्याच निकषानुसार ३६ हजार ३५९ तर मुंबईला त्याच निकषानुसार १७ हजार ९४६ इतकी तर लखनौला ११ हजार ९८७ एवढी प्रति दशलक्ष वाढ असल्याचे दिसून येत आहे. त्यापाठोपाठ बेंगळुरु, भोपाळ, इंदोर, दिल्ली आणि पटना या संख्येचा समावेश आहे. इतकी विदारक परिस्थिती असूनही जिल्ह्यात मनमुक्तपणे भटकणाऱ्या नागरिकांवर कारवाई का होत नाही, कठोर उपायांची अंमलबजावणी का होत नाही असाच सवाल नागरिकांकडून विचारला जाऊ लागला आहे.

इन्फो

महिनाभरात जिल्ह्यात १ लाख १६ हजारांवर वाढ

जिल्ह्यात मार्च महिन्यापासून रुग्णसंख्या वाढीने मोठा वेग पकडला. त्यातदेखील १५ मार्चपासून कोरोनावाढ सातत्याने ३ ते ४ हजारांवर कायम राहिली. त्यामुळेच १६ मार्च ते १५ एप्रिल या कालावधीत नाशिकमध्ये तब्बल १ लाख १६ हजारांवर वाढ नोंदवली गेली आहे. त्यामुळेच आतापर्यंत जिल्ह्यात किमान चार-पाच घरांमागे किमान एक व्यक्ती बाधित असे चित्र दिसू लागले आहे.

इन्फो

महिनाभरात तब्बल ६७३ बळी

जिल्ह्यात मार्च महिन्याच्या मध्यापासून कोरोनाबळींच्या संख्येतदेखील मोठी वाढ होऊ लागली. १६ मार्चला जिल्ह्यातील एकूण बळींची संख्या २१८४ झाली होती तर १६ एप्रिलला एकूण बळीसंख्या तब्बल २८५७ वा पोहोचली आहे. म्हणजेच या महिनाभराच्या कालावधीत जिल्ह्यात तब्बल ६७३ नागरिकांचा बळी कोरोनाने गेला आहे.