शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
4
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
5
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
6
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
7
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
8
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
9
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
10
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
11
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
13
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
14
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
15
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
16
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
17
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
18
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
19
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश

केवळ सहानुभूती नको, कायद्याची अंमलबजावणी हवी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:14 IST

बदलणे, महिलांना अधिकार आणि कायद्याची जाणीव करून देणे, राजकीय हस्तक्षेपाशिवाय एखाद्या घटनेचा तपास करून गुन्हेगारांना कडक शासन करणे गरजेचे ...

बदलणे, महिलांना अधिकार आणि कायद्याची जाणीव करून देणे, राजकीय हस्तक्षेपाशिवाय एखाद्या घटनेचा तपास करून गुन्हेगारांना कडक शासन करणे गरजेचे आहे. महाराष्ट्राची पुरोगामी प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी महिला सुरक्षित असणे गरजेचे आहे, असे मत महिलांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. डोंबिवलीत १४ वर्षीय मुलीवर ३० जणांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे. यापूर्वी गत आठवड्यात मुंबईतील साकी नाका परिसरातील एक महिला अत्याचाराची शिकार ठरली. कल्याणमध्ये एक आठ वर्षीय बालिकेवर शिक्षकाने अत्याचार केल्याची घटना घडल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

----

महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यास प्रामुख्याने पुरुषी मानसिकता जबाबदार आहे. अशा प्रकारच्या घटना

रोखण्यासाठी सर्वप्रथम मानसिकतेत बदल आणि प्रबोधनाची गरज आहे. त्याचबरोबर प्रत्येक घटनेची सखोल, निष्पक्ष चौकशीची आवश्यकता

आहे. महिलांविषयीच्या कायद्यात बदल आणि त्यांची अंमलबजावणी देखील तितकीच गरजेची आहे.

- ॲड. विजया माहेश्वर,

मानव अधिकार कौन्सिल, महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष

-----

राज्यात महिला अत्याचाराचे किळसवाणे प्रकार घडत असताना शासन बघ्याची भूमिका घेत आहे. महिलांचे संरक्षण करणारा शक्ती कायदा

रखडला आहे. महिला आयोगाला अध्यक्ष नाही. राज्य सरकारला महिलांचे संरक्षण करता येत नसेल, तर जिजाऊ ब्रिगेडला अधिकार प्रदान करावेत.

अशा प्रकारच्या घटना पुरोगामी महाराष्ट्राला कलंक लावणाऱ्या आहे.

- माधुरी भदाणे,

प्रदेशाध्यक्ष, जिजाऊ ब्रिगेड

-----

महिला, बालिकांवर घडणाऱ्या अत्याचाराच्या घटना धक्कादायक आणि चिंतादायक आहे. या घटनांवर केवळ बाेलून किंवा नुसता निषेध व्यक्त

करून काहीही होणार नाही, तर कृती करण्याची गरज आहे. मुलींना शालेय वयापासून स्वसंरक्षणाचे धडे देऊन प्रतिकार करणे शिकवले पाहिजे.

त्याचबरोबर नुसते कायदे करून उपयोग नाही, तर त्यांची अंमलबजावणी देखील तितक्याच प्रभावी पद्धतीने झाली पाहिजे.

- आसावरी देशपांडे,

समन्वयक, प्रवरा मेडिकल ट्रस्ट

----

महिला सुरक्षा हा राजकारणाचा विषय नाही. ती सर्वांची जबाबदारी असून प्रत्येकाने ती पार पाडलीच पाहिजे. घटना घडल्यानंतर सर्वजण एकत्र

येऊन निषेध करतात, मग संरक्षणासाठी अशी एकजूट का होत नाही, हा खरा प्रश्न आहे. अशा प्रकारचे निंदनीय आणि किळसवाणे प्र्रकार

करणाऱ्यांना धडा शिकवणे हा यावरील प्रभावी उपाय ठरू शकतो.

- सरला चव्हाण, अध्यक्ष

आई तुळजाभवानी महिला बचतगट

---

आपल्याकडे महिलांचे संरक्षण करणारे अनेक कायदे आणि ते राबवण्यासाठी यंत्रणा आहे, मग असे प्रकार घडतात कसे, यावर विचार करण्याची

गरज आहे. सद्य स्थितीत अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. गुन्हेगारी प्रवृत्तीवर वचक निर्माण केल्याशिवाय या घटना थांबणार

नाहीत. सद्य स्थितीत असणाऱ्या कायद्यांची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच नवीन कायदे आणण्याची देखील गरज आहे.

- शिल्पा जेऊघाले, कार्याध्यक्ष

आई फाउंडेशन, नाशिक

------- प्रतिक्रियांचे फोटो : आर ला आहे. --------